शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - विचारे दृढता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 06:23 IST

मराठीत प्रथमच वचनं जन्माला आली. विचाराने विकारावर मात केली

बा.भो. शास्त्री‘आचारे योग्यता विचारे दृढता’ हे श्रीचक्रधरांचं वचन आहे. त्याचा आकार लहान पण आशय महान असतो. ज्याच्या ज्याच्या शब्दात अल्पाक्षरी असंदिग्ध हे त्याचं लक्षण आहे. आचाराने योग्यता व विचाराने स्थैर्य प्राप्त होतंं. हाच त्याचा मथितार्थ. हे सूत्र माणसाला संंत करतं. अयोग्याला योग्य करतं आणि अस्थिरतेला स्थिर करतं. असंताला संंत करतं. संंत हे आधी माणूसच असतात. हिरा आधी कोळसाच असतो. तूप आधी दूधच असतं. विस्तार हा संकोचच असतो. माणसात गुणदोष असतात तर संत हे निर्दोष व शुद्ध अंंत:करणाचे असतात. पण माणसाकडून संतत्वाकडचा प्रवास कशाने होतो, यावर प्रस्तुत सूत्राने प्रकाश टाकला आहे. ज्ञानेश्वरी पूर्वी याच सूत्रांनी माणसं घडविली.

मराठीत प्रथमच वचनं जन्माला आली. विचाराने विकारावर मात केली. म्हाइंभटाचा अहंकार व नागदेवाचा क्रोध मावळला. ज्ञान बदललंं की क्रिया बदलत असते. मार्ग बदलतो. दृष्टी बदलते रित्या माणसात दैवी गुण येतात. शब्द साधे असले तरी त्यांंच्यात मंंत्राचंं बळ येतं. याच सूत्रांनी त्या काळात व्यक्तिमत्त्व घडवलं. चारित्र्य धवल केलं. आचार व विचार या मानवी नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यातली एक बाजू घासली तर समाज त्या नीतिशून्य अविचारी मानवी नाण्याला पूर्ण स्वीकारत नाही. घराला किंवा जगाला नेहमी दोन गोष्टींची गरज असते. एक आचार व दुसरा विचार, हे दोन्हीही संसार व परमार्थाला पूरक आहेत. प्रथम आपल्याला आचाराचाच विचार करावयाचा आहे. शुद्ध झाल्याशिवाय बुद्ध होता येत नाही. आचाराच्या पायावरच विचाराची इमारत उभी राहते. समृद्ध आचाराने उच्चार बदलतात. डोळ्यात समता व हृदयात ममता नांदते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक