शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आनंद तरंग - विचारे दृढता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 06:23 IST

मराठीत प्रथमच वचनं जन्माला आली. विचाराने विकारावर मात केली

बा.भो. शास्त्री‘आचारे योग्यता विचारे दृढता’ हे श्रीचक्रधरांचं वचन आहे. त्याचा आकार लहान पण आशय महान असतो. ज्याच्या ज्याच्या शब्दात अल्पाक्षरी असंदिग्ध हे त्याचं लक्षण आहे. आचाराने योग्यता व विचाराने स्थैर्य प्राप्त होतंं. हाच त्याचा मथितार्थ. हे सूत्र माणसाला संंत करतं. अयोग्याला योग्य करतं आणि अस्थिरतेला स्थिर करतं. असंताला संंत करतं. संंत हे आधी माणूसच असतात. हिरा आधी कोळसाच असतो. तूप आधी दूधच असतं. विस्तार हा संकोचच असतो. माणसात गुणदोष असतात तर संत हे निर्दोष व शुद्ध अंंत:करणाचे असतात. पण माणसाकडून संतत्वाकडचा प्रवास कशाने होतो, यावर प्रस्तुत सूत्राने प्रकाश टाकला आहे. ज्ञानेश्वरी पूर्वी याच सूत्रांनी माणसं घडविली.

मराठीत प्रथमच वचनं जन्माला आली. विचाराने विकारावर मात केली. म्हाइंभटाचा अहंकार व नागदेवाचा क्रोध मावळला. ज्ञान बदललंं की क्रिया बदलत असते. मार्ग बदलतो. दृष्टी बदलते रित्या माणसात दैवी गुण येतात. शब्द साधे असले तरी त्यांंच्यात मंंत्राचंं बळ येतं. याच सूत्रांनी त्या काळात व्यक्तिमत्त्व घडवलं. चारित्र्य धवल केलं. आचार व विचार या मानवी नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यातली एक बाजू घासली तर समाज त्या नीतिशून्य अविचारी मानवी नाण्याला पूर्ण स्वीकारत नाही. घराला किंवा जगाला नेहमी दोन गोष्टींची गरज असते. एक आचार व दुसरा विचार, हे दोन्हीही संसार व परमार्थाला पूरक आहेत. प्रथम आपल्याला आचाराचाच विचार करावयाचा आहे. शुद्ध झाल्याशिवाय बुद्ध होता येत नाही. आचाराच्या पायावरच विचाराची इमारत उभी राहते. समृद्ध आचाराने उच्चार बदलतात. डोळ्यात समता व हृदयात ममता नांदते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक