शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

आनंद तरंग - विचारे दृढता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 06:23 IST

मराठीत प्रथमच वचनं जन्माला आली. विचाराने विकारावर मात केली

बा.भो. शास्त्री‘आचारे योग्यता विचारे दृढता’ हे श्रीचक्रधरांचं वचन आहे. त्याचा आकार लहान पण आशय महान असतो. ज्याच्या ज्याच्या शब्दात अल्पाक्षरी असंदिग्ध हे त्याचं लक्षण आहे. आचाराने योग्यता व विचाराने स्थैर्य प्राप्त होतंं. हाच त्याचा मथितार्थ. हे सूत्र माणसाला संंत करतं. अयोग्याला योग्य करतं आणि अस्थिरतेला स्थिर करतं. असंताला संंत करतं. संंत हे आधी माणूसच असतात. हिरा आधी कोळसाच असतो. तूप आधी दूधच असतं. विस्तार हा संकोचच असतो. माणसात गुणदोष असतात तर संत हे निर्दोष व शुद्ध अंंत:करणाचे असतात. पण माणसाकडून संतत्वाकडचा प्रवास कशाने होतो, यावर प्रस्तुत सूत्राने प्रकाश टाकला आहे. ज्ञानेश्वरी पूर्वी याच सूत्रांनी माणसं घडविली.

मराठीत प्रथमच वचनं जन्माला आली. विचाराने विकारावर मात केली. म्हाइंभटाचा अहंकार व नागदेवाचा क्रोध मावळला. ज्ञान बदललंं की क्रिया बदलत असते. मार्ग बदलतो. दृष्टी बदलते रित्या माणसात दैवी गुण येतात. शब्द साधे असले तरी त्यांंच्यात मंंत्राचंं बळ येतं. याच सूत्रांनी त्या काळात व्यक्तिमत्त्व घडवलं. चारित्र्य धवल केलं. आचार व विचार या मानवी नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यातली एक बाजू घासली तर समाज त्या नीतिशून्य अविचारी मानवी नाण्याला पूर्ण स्वीकारत नाही. घराला किंवा जगाला नेहमी दोन गोष्टींची गरज असते. एक आचार व दुसरा विचार, हे दोन्हीही संसार व परमार्थाला पूरक आहेत. प्रथम आपल्याला आचाराचाच विचार करावयाचा आहे. शुद्ध झाल्याशिवाय बुद्ध होता येत नाही. आचाराच्या पायावरच विचाराची इमारत उभी राहते. समृद्ध आचाराने उच्चार बदलतात. डोळ्यात समता व हृदयात ममता नांदते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक