शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

आनंद तरंग - सुख-दु:खाचे समत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 05:02 IST

संसारिकामधील जीवनमुक्त योगी जनक राजाच्या सुख-दु:खाच्या समत्व भावाबद्दल एक प्रसंग नेहमी सांगितला जातो. एकदा म्हणे, राजा जनकाच्या लाकडी महालाने पेट घेतला.

प्रा. शिवाजीराव भुकेलेसंसारिकामधील जीवनमुक्त योगी जनक राजाच्या सुख-दु:खाच्या समत्व भावाबद्दल एक प्रसंग नेहमी सांगितला जातो. एकदा म्हणे, राजा जनकाच्या लाकडी महालाने पेट घेतला. या वेळी राजा जनक न्याय-निवाड्याच्या ठिकाणी प्रजेशी संवाद साधत होते. शक्य होईल त्यांना समत्वभावाने न्याय देत होते. एवढ्यात एक सेवक ओरडतच जनकाजवळ आला आणि सांगू लागला, ‘महाल जळालायं! चला उठा.’ राजा जनकावर या नोकराच्या ओरडण्याचा काहीच परिणाम झाला नाही. उलट जनक म्हणाले, अरे वेड्या! माझा राजवाडा जळालाय. मी ऊर बडवून ओरडायला हवे होते; पण जो राजवाडा मी येथे येताना बरोबर आणला नव्हता व जाताना बरोबर नेणार नाही त्याच्यासाठी एवढा मोठा शोक काय म्हणून व्यक्त करू? राजा जनकाचे उत्तर ऐकून सेवकाने या संसारिकातील संतासमोर अक्षरश: लोटांगण घातले. खरंच, प्रत्येक घटनेकडे साक्षी भावनेने पाहणे व नियतीचे फासे अनुकूल पडले तर हुरळून न जाणे व प्रतिकूल पडले तर कोमेजून न जाणे ही खूप मोठी तपस्या आहे. चिखलात राहूनसुद्धा आपल्या पाकळ्यांना व सुगंधाला चिखल लागू न देणाऱ्या कमळाच्या फुलाप्रमाणे अनेक स्थितप्रज्ञ पुरुष संसाराच्या चिखलात राहतात; पण वेळ आल्यानंतर त्यापासून चटकन बाजूला होतात, तर दुसºया बाजूला कमळाच्या फूल संभाराच्या तळातील चिखलात राहणारे बेडूक चिखल खाण्यातच धन्यता मानते. घडलेल्या व घडणाºया प्रत्येक घटनेबद्दल शोक व्यक्त न करणाºयास पंडित संबोधताना श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे,

अशोच्यानन्व षोचस्त्वं प्रज्ञावादांस्य भावसे।गतासुन गतासुंनष्च, नानुषोचन्ति पंडित:।। 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक