शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

आनंद तरंग: स्पंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 04:13 IST

मनुष्याचे जीवन अनेकानेक परिस्थितीचे भलेमोठे जाळे बनले आहे. एका समस्येतून बाहेर पडतो न पडतो तोच दुसरी परिस्थिती सामोरी उभी राहते.

ब्रह्मकुमारीमनुष्याचे जीवन अनेकानेक परिस्थितीचे भलेमोठे जाळे बनले आहे. एका समस्येतून बाहेर पडतो न पडतो तोच दुसरी परिस्थिती सामोरी उभी राहते. त्या परिस्थितीमधलाच एक भाग आहे ‘संबंध’. मनुष्य एक सामाजिक प्राणी आहे. अनेकानेक संबंधांमध्ये गुरफटलेला. हे जाळे जितके विस्तारावे तितके कमीच. काही वर्षांपूर्वीचा काळ थोडा वेगळा होता. आज शैक्षणिक स्तर वाढत असला तरी मनाची नाती खूप दुरावलेली दिसून येतात. एका छताखाली आज पती-पत्नींना एकत्र राहणेसुद्धा मुश्कील. हा बदल का? शरीराची प्रकृती जशी खालावत चालली आहे तसेच मनही कमजोर होत आहे. आत्म्यामध्ये असलेले गुण व शक्ती यांचा ऱ्हास होत चालला आहे. सहन करणे, समजून घेणे, सामावून घेणे यांची कमी आज जाणवून येते. व्यक्ती पहिले आपल्या संबंधांना महत्त्व द्यायचा, त्यासाठी काहीही करण्याची मनामध्ये ताकद असायची, पण आज भौतिक वस्तू, पद, धन यांचे महत्त्व वाढत चालले आहे. थॉमस एडिसन यांनी बल्बचा शोध लावला. त्यांच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला जातो की, खूप प्रयत्न करून जेव्हा बल्ब तयार होतो व तो परीक्षणासाठी नेणाऱ्या व्यक्तीच्या हातून काही कारणाने फुटला. त्या वेळी एडिसन यांनी कोणतीही वाईट प्रतिक्रिया न देता त्याकडे दुर्लक्ष केले. दुसऱ्या वेळी पुन्हा जेव्हा तो बल्ब परीक्षणासाठी घेऊन जायचा होता तेव्हा त्यांच्या आसपास असणाऱ्यांनी विशेष त्या व्यक्तीच्या हातात न देण्याचा सल्ला एडिसन यांना दिला. तेव्हा त्यांनी सुंदर उत्तर दिले की, ‘बल्ब तुटला फुटला तरी मला चालेल, पण त्यांचे मन तुटलेले मला चालणार नाही.’ सांगण्याचे तात्पर्य हे की, संबंधांमध्ये विश्वास ठेवणे खूप आवश्यक आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक