शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

आनंदाचा कल्पतरू जगभर शोधूनही सापडणार नाही; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 17:17 IST

माणसाची कामधेनूसारखी आणखी एक वेडी कल्पना आहे. कल्पतरू! असं एक झाड की ज्याच्याखाली बसलं नि मनात कोणतीही कल्पना केली की ती पुरी होते.

- रमेश सप्रे 

माणसाची कामधेनूसारखी आणखी एक वेडी कल्पना आहे. कल्पतरू! असं एक झाड की ज्याच्याखाली बसलं नि मनात कोणतीही कल्पना केली की ती पुरी होते. अशा झाडाच्या कल्पवृक्षाच्या शोधात जगभर नि जीवनभर जरी फिरलो तरी त्याचा शोध लागलाच नाही. कसा लागणार कारण असा कल्पवृक्ष बाहेर नाहीच तर आपल्या आतच आहे. 

‘सकारात्मक विचारसरणी’ नि त्यानुसार जीवनसरणी म्हणजे राहणी-करणी-वाणी हाच तो कल्पवृक्ष. पण अशी जीवनशैली किती जणांची असते?

या संदर्भात एक मार्मिक गोष्ट आहे. मनोरंजक असल्याने ती अनेकदा सांगितली, ऐकली जाते; पण म्हणतात ना पालथ्या घडय़ावर पाणी. तसं होतं आपलं. कळतं पण वळत नाही. म्हणून ते जीवनात फळत नाही. हा सर्वाचा अनुभव आहे. 

एकदा एक व्यापारी दुस-या गावाहून आपल्या गावाकडे येताना वाटेतल्या रानात वाट चुकला. अंधारात काही दिसत नव्हतं. रात्र कुठं तरी सुरक्षित काढावी नि उद्या उजडल्यावर पुढं जावं या विचारानं झुडूपांच्यामध्ये असलेल्या एका झाडाखाली तो बसला. जरा वेळानं त्याच्या मनात कल्पनाचक्र गरगरू लागलं. 

आता घरी असतो तर गरम गरम जेवण मिळालं असतं. ही कल्पना मनात उठताच जमिनीतून एक ताट वरती आलं. अनेक सुग्रास पदार्थानी भरलेलं. मागचा पुढचा विचार न करता त्या भुकेल्या प्रवाशानं सारं चाटून पुसून खाल्लं. आता थंडगार पाणी मिळालं तर असा विचार मनात येतो न येतो तोच जमिनीतून एक सुगंधीशील जल भरलेला लोटा वर आला. गटागटा पाणी प्यायल्यावर साहजिकच झोपेचा विचार मनात येताच एक मऊ मऊ गादी पांघरूणासकट जमिनीतून वर आली. तिच्यावर पडल्यावर अंग दिवसभरच्या श्रमानं नि भटकण्यानं दुखत असल्याची जाणीव झाली. घरी असतो तर कुणाकडून तरी अंग चोपून घेतलं असतं ही कल्पना मनात उठते ना उठते तोच एक सुंदर स्त्री हातात पंखा घेऊन जमिनीतून वर आली नि तिनं त्याचे पाय चेपण्यास सुरुवात केली. काहीवेळा त्याला स्वर्गीय सुखाचा अनुभव आला; पण लगेच त्याच्या मनात कल्पना आली, अरे, मनात विचार करू ते सारे मिळतंय, म्हणजे इथं भुताटकी वगैरे तर नाही. एखादं भूत आलं नि आपल्याला खाऊन टाकलं तर?’ आणि अशी कल्पना येते न येते तोच एक भूत आलं नि त्याला त्या भुतानं खाऊनही टाकलं.

तो ज्या झाडाखाली झोपला होता,आस:यासाठी थांबला होता ते झाड होतं ‘कल्पवृक्ष’. मनात कल्पना आली की लगेच ती सत्यात घडते किंवा पुरवली जाते असा कल्पतरू. तो समजा असेल तर कुणाच्या दाराबाहेर? अर्थातच एक तर ज्यांच्या सर्व कल्पना शांत झाल्या आहेत. ज्यांना कल्पनेच्या पलिकडे (कल्पनातीत) असलेल्या सत्याचा अनुभव आलाय अशांच्या दारात. घराच्या मागच्या परसात असा कल्पवृक्ष असतो असंही नाही. ते ज्या झाडाखाली बसतात ते झाडच बनतं कल्पवृक्ष!

त्यांच्या मनात सतत सकारात्मक कल्पना असतात, जगाच्या कल्याणासाठी विधायक कल्पना असतात, नवसर्जनाच्या म्हणजे नवनिर्मितीच्या कल्पना असतात. त्या पु-या करण्यासाठी सारी सृष्टी-समष्टी (निसर्ग नि समाज) त्यांना अनुकूल होतात. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती। देह कष्टवीती उपकारे’ यात महत्त्वाचा भाग अशा कल्पवृक्षाखाली बसण्याचाच असतो. ज्ञानोबा माउली यालाच म्हणते 

‘चला कल्पतरुंचे आरव’.

म्हणजे संत म्हणजे चालते बोलते कल्पतरू! नुसते कल्पतरू नव्हेत तर कल्पवृक्षांच्या बागा. असे ते संत कल्पतरू आपल्याकडे आपणहून येतात ते आपल्या कल्पना पु-या करायला नव्हे, तर कल्पना जर स्वार्थी, संकुचित असतील तर त्या दूर करून त्याऐवजी ‘भूतां परस्परे जडो मैत्र जिवांचे’ अशी सर्व प्राणीमात्राशी स्नेहसंबंध जोडण्याची जीवनशैली शिकवायला येतात. काही लोकांच्या तर सा-या कल्पना संपवून त्यांना निर्विकल्प समाधीचा अनुभव देतात. 

समर्थ रामदासांचा अशा पोकळ नकारात्मक कल्पनांना मोठा आक्षेप आहे ते म्हणतात, 

‘मना, कल्पना कल्पिता कल्पकोटी।

नव्हे रे, नव्हे सर्वथा रामभेटी।।

सच्चिदानंद परमेश्वराचा अनुभव हा सत्य, प्रत्यक्ष असतो. काल्पनिक नसतो. स्वप्नातला दृष्टांत अन् प्रत्यक्ष परमेश्वराचा स्पर्श, अनुभूती या दोन निराळ्या गोष्टी आहेत. 

दोन शब्द आहेत. काल्पनिकता नि कल्पकता. काल्पनिकतेतून कदाचित काव्य, एखादी कलाकृती जन्माला येईल; पण कल्पकतेतून विज्ञानातले शोध लागतात. निसर्गातली रहस्यं उलगडली जातात. मुख्य म्हणजे स्वत:च्या व इतरांच्या जीवनात आनंद भरून टाकता येतो. 

कल्पनेतून निर्माण होते नवनिर्मितीची प्रतिभा (क्रिएटिव्हिटी) आनंदाला भारक, कल्पनेचा उगम असतो जीवनाच्या अनिश्चितेत, अनियमिततेत, अनपेक्षितपणे घडणा-या घटनांत. यासाठी जीवन घडवणा-या, जीवनाला तारक अशा कल्पवृक्षाचा शोध बाहेर न घेता आतच घेऊ या. कारण तो आपल्या चांगल्या कल्पनांना आशीर्वाद देणारा आनंदाचा कल्पवृक्ष आतच आहे. पु. गोंदवलेकर महाराज हेच सांगतात

परेपासूनि (नाभीपासून) उठे श्वास। तो उभा कल्पवृक्ष।

त्याची अमृतफळे सुरस। श्रीरामा अर्पिली।।

याच्याच जोडीनं त्यांचं असंही सांगणं असे की अखंड आनंदात राहायचंय ना? मग नाम जपा. श्वासोच्छश्वास श्वासाश्वासावर नाम घेऊन ईश्वर स्मरण ठेवून जगलं तर कल्पवृक्षाच्या छायेत निरंतर आनंद लाभेल. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक