शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

अनुमान प्रमाणानें ईश्वर अस्तित्व..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 14:51 IST

माणसाची बुद्धी ही चिकित्सक असल्याने दिसेल त्याचा कार्यकारण भाव शोधणारी आहे

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

ईश्वर हा अव्यक्त, निराकार, अतींद्रिय असल्यामुळे स्थूल इद्रिंयांना तो अगोचर आहे मग त्याचे अस्तित्व कसे सिद्ध करावयाचे.? उपनिषदकार असे म्हणतात -

न तत्र चक्षुर्गच्छति न वाक् न मनः ।

तो डोळ्यांना दिसणार नाहीच.! नामदेव महाराज म्हणतात -

कसे बोटाने दाखवू तुला । घे अनुभव गुरुच्या मुला ॥

पण माणसाची बुद्धी ही चिकित्सक असल्याने दिसेल त्याचा कार्यकारण भाव शोधणारी आहे पण आपण ईश्वराचा शोध हा अनुमान प्रमाणानें करु शकतो. हे अफाट विश्व आपण बघतो. या विश्वात सूर्य, चंद्र, अनंत तारें, उल्का, समुद्र, वनस्पती, प्राणी, पर्वत आहेत. विश्वाचा हा अफाट पसारा बघितला म्हणजे तुम्हाला असे वाटत नाही का की हे सर्व कुणी निर्माण केले..? कारण या जगात निर्मात्याशिवाय एकही वस्तू निर्माण होऊच शकत नाही. जरी निर्माता आपल्याला दिसला नाही तरी तो आपण मानतोच ना..? शास्त्रकार सांगतात -

विश्वस्य गोप्ता भुवनस्य कर्ता ।

या विश्वाला कर्ता असलाच पाहिजे. निर्माण केलेले विश्व किती गणिती पद्धतीत बांधलेले आहे.१) दिलेल्या वेळेलाच सूर्य उगवतो व मावळतो.२) समुद्राची भरती ओहोटी बिनचूक वेळच्या वेळीच होते. 

कुणाच्या आज्ञेने हे कार्य होते..? तर सज्जनहो.! हे सर्व कार्य त्याच ईश्वरीशक्तीने होते.संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात -

वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता ।राहिली अहंता मग कोठे ॥

अहो..! इतकंच काय पण वारा त्याच्याच धाकाने वाहतो, सूर्य त्याच्याच भीतीने उष्णता देतो, इंद्र पाऊस पाडतो व अग्नी त्याच्याच भीतीने जाळण्याचे काम करतो.

श्रीमद्भागवतकार म्हणतात -

यद् भयाद् वाति वातोयं सूर्यस्तपति यद् भयाद् ।वर्षतीन्द्रो दहत्यग्नि: मृत्यूश्चरति स पंचमः ॥

संतसम्राट ज्ञानेश्वर महाराज सुंदर चिंतन मांडतात -

तरी मीचि एक सर्वा । या जगा जन्म पांडवां ॥मजचि पासून आघवा । निर्वाह यांचा ॥कल्लोळ माळा अनेगा । जन्म जळीची पैगा ॥आणि तया जळचि आश्रय तरंगा । जीवनहि जळ ॥

ज्याप्रमाणे तरंगाची उत्पत्ती जळापासून होते त्याप्रमाणे विश्वाची उत्पत्ती माझ्यापासूनच झाली आहे.तुकाराम महाराज अनुमान प्रमाणाने विचारतात हे माणसा.!

फुटे तरुवर उष्णकाळ मासी ।जीवन तयासी कोण घाली ॥कोणे केली बाळा दुग्धाची उत्पत्ती ।वाढवी श्रीपती सवे दोन्ही ॥

हे कार्य ज्याअर्थी चालू आहे त्याअर्थी तो देव आहेच.अनुमान प्रमाणाने सांगावयाचे झाल्यास -

अयं पर्वतो वन्हिमान् धूमत्वात् ।

या समोरच्या पर्वतावर अग्नी असलाच पाहिजे कारण त्या पर्वतावर धूर दिसत आहे. हा जो निष्कर्ष किंवा तर्क त्यालाच अनुमान असे म्हणतात. कार्यावरुन कारणाविषयीचा तर्क म्हणजेच अनुमान होय..!

( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्र. ९४२१३४४९६० ) 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक