शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

लोभ हा आनंदाचा शत्रू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 08:11 IST

ज्याचे मन पवित्र आहे तोच सर्व सुखाचा अधिकारी आहे. ज्यांचे मन अपवित्र आहे तो सुख भोगू शकत नाही.

ज्याचे मन पवित्र आहे तोच सर्व सुखाचा अधिकारी आहे. ज्यांचे मन अपवित्र आहे तो सुख भोगू शकत नाही. मनाची प्रसन्नता हीच सर्व सुखाची गुरूकिल्ली आहे. आपले कर्म चांगले असले की मन पवित्रतेत रमते अन् तेव्हा मनाचा आनंद मनालाच घेता येतो. स्वार्थी मानव या जगात आनंद भोगू शकत नाही. तो लोभयुक्त अंत:करणाने भरलेला असतो. लोभ हा मनुष्याच्या आनंदाचा शत्रू आहे. लोभी मनुष्य जास्त काळ सुखी राहू शकत नाही. पापाचा बाप लोभ आहे. लोभी माणूस नेहमी चिंताग्रस्त असतो. तो कष्टी होतो. लोभ हा तुम्हाला सर्वकाळ आनंदी ठेवू शकत नाही. लोभामुळे मनात मलिनता येते. त्यामुळे तो वासनेच्या आहारी जाऊन आपले जीवन संपवतो.

लोभच मनुष्याच्या जीवनाचा अंत करू शकतो. लोभ पूर्ण झाला नाही की क्रोध येतो. क्रोध हा अत्यंत विनाशकारी व कष्टदायक आहे. क्रोधामुळे हिंसाचार वाढतो. क्रोध हा मनुष्याचा शत्रू आहे. ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासून अग्नी तयार होतो अन् पुन्हा तोच अग्नी त्या लाकडाला जाळतो तसा शरीरातूनच क्रोध उत्पन्न होतो व त्यालाच संपवतो. मनाची लय-गती बिगडवतो. मनाला शांत ठेवायचे असेल, प्रसन्न ठेवायचे असेल तर क्रोध व लोभ या दोन शत्रूंवर मात करावी. शांत मन क्रोध-लोभाला मारू शकते. क्लेशदायक क्रोध शांत मनाला त्रास देतो, परंतु मनाची प्रसन्नता कायम असेल तर क्रोधावर विजय मिळवता येतो. क्रोधावर विजय प्राप्त करा मग मन:शांती मिळेल. शांत मन प्रसन्न राहते. प्रसन्न मन सर्व सुखाची अनुभूती देते. मनाला सुखाची अनुभूती आली की मनात संदेह उत्पन्न होत नाही. अहंकार येत नाही. कठीण प्रसंगाला शांतपणे हाताळता येते. मनात सात्त्विक भाव निर्माण होतात. प्राणीमात्राबाबत दया उत्पन्न होते. मोह-मायात अडकत नाही. विकारवश मन दु:ख देते. तसे प्रसन्न मन विकारुपी शत्रूचे खंडन करते. कोणत्याही गोष्टीचा ते खेद करीत नाही. आत्मसुखाचा अनुभव घेते. विषयासक्त होत नाही.

लोभी, क्रोधी मनुष्य कधीच मनावर विजय मिळवू शकत नाही. प्रसन्न मन मोहात अडकत नाही. म्हणून म्हणतो, मन या सर्व गोष्टीला मुख्य कारण आहे. कारण पवित्र मन ठेवण्यासाठी कर्म शुध्द करावे लागेल. आपल्या कल्याणासाठी आपले मन पवित्र ठेवा. मन पवित्र झाले की सर्व देवता तुमच्या जवळच आहेत. मन शुध्द असले की आचरण शुध्द होते. आचरण शुध्द असले की कर्म चांगले घडते. चांगले कर्म घडले की, मनुष्य स्वत:चे कल्याण करून घेतो.- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक