शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
3
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
4
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
5
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
6
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
7
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
8
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
9
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
10
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
12
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
13
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
14
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
15
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
16
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
17
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
18
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
19
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन

'या' सर्व गोष्टींवरचा विश्वास टिकवून ठेवणे ही मोठी कला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 04:49 IST

डोळे बंद करून समाज अशा व्यक्तींवर विश्वास ठेवतो. झाडे आपल्या फळांचा, फुलांचा दर्जा सहज टिकवून ठेवू शकतात त्यामुळेच त्यांची जग काळजी घेत राहते.

- विजयराज बोधनकरअनेक जण नाती जोडतात आणि नात्यांना शेवटपर्यंत टिकविण्यासाठी काळजी घेतात. अनेक मंडळी दिलेला शब्द पाळतात आणि विश्वास टिकवतात. व्यवसाय उभारतात आणि तो टिकवतात, अशी अनेक उदाहरणे देता येतील. हीच ‘टिकविण्याची कला’ सहावी कला होय. व्यक्तिमत्त्व निर्मितीसाठी तारतम्य ठेवून, भान ठेवून, जागृत राहून आपली समाजातली नेमकी भूमिका काय आणि ती भूमिका कशी टिकवायची याचे जो सतत चिंतन करीत राहतो तोच प्रगतशील मार्गावरून उत्तम प्रवास करू शकतो. उत्तम विचार, उत्तम गुणवंत माणसे, उत्तम आठवणी, सतत उत्तमच वागणे, उत्तम विचार जगाला देत राहणे, कामाचा दर्जा शेवटपर्यंत उत्तमरीत्या संभाळणे, आई-वडिलांचे शाश्वत संस्कार आणि समाजाचा या सर्व गोष्टींवरचा विश्वास टिकवून ठेवणे ही मोठी आणि महत्त्वाची कला आहे. अशी माणसे कधीच वादग्रस्त ठरत नाहीत. डोळे बंद करून समाज अशा व्यक्तींवर विश्वास ठेवतो. झाडे आपल्या फळांचा, फुलांचा दर्जा सहज टिकवून ठेवू शकतात त्यामुळेच त्यांची जग काळजी घेत राहते.ज्याप्रमाणे शकुनीमामाने द्यूतात विश्वास टिकविला नाही, कर्णाने दुर्योधनाची सोबत करून सत्याचा मार्ग टिकविला नाही, अशा प्रकारची माणसे समाजमनातून कायमची उतरतात आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाला कायमचा डाग लावून घेतात; आणि जी माणसे या टिकविण्याची वृत्ती जोपासत या मार्गावरून चालत राहतात त्यांच्या आयुष्याचा शेवट अतिशय सुखात आणि आनंदात होतो. इतिहासात ज्यांनी म्हणून दगाफटका केला, सत्याचे अस्तित्व टिकविले नाही त्यांच्या नशिबी फक्त अंधारच आला; कारण त्यांनी सत्य टिकविले नाही, काचेच्या भांड्याला काळजीने सांभाळून ठेवले तरच ते टिकते तसे हे माणसाचे जगणे आहे, उत्तम संस्कार टिकविणे म्हणजेच देशाला प्रगतीच्या मार्गावरून चालविणे होय.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक