शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

ईश्वर प्रेमस्वरूप; तो फक्त भावपूर्ण प्रेमानेच बांधला जातो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 15:33 IST

प्रेम ही भावाची पहिली अवस्था. भाव म्हणजे प्रेम..! अंतःकरणांत शुद्धसत्वगुण असणे हे भावाचे लक्षण आहे.

- ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी (बीड)

मागील लेखात आपण भाव म्हणजे काय..? या प्रश्नापर्यंत आलो होतो तर भक्तीरसायन सिंधुकार भावाची व्याख्या करतांना म्हणतात -

प्रेमणस्तु प्रथमावस्था भाव इत्युच्यते बुधैः ।शुद्धसत्व विशेषात्मा प्रेम सूर्यांशु साम्यभाक् ।रुचिभिश्चित्त मासृण्य कृदसौ भाव उच्यते ॥

प्रेम ही भावाची पहिली अवस्था. भाव म्हणजे प्रेम..!अंतःकरणांत शुद्धसत्वगुण असणे हे भावाचे लक्षण आहे.प्रेमरुपी सूर्याच्या किरणाप्रमाणे, भगवद्भक्तीच्या तीव्र अभिलाषेने, चित्तात उत्पन्न झालेली जी आर्द्रता, जो स्नेह, जे प्रेम, त्या प्रेमालाच 'भाव' असे म्हणतात. तात्पर्य, भाव म्हणजे प्रेम..!भगवद्भक्तीत जर प्रेम नसेल तर भक्तीचे फळ मिळणार नाही कारण देव तर फक्त भावानेच, प्रेमानेच बद्ध होतो, बांधला जातो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये म्हणतात -

भावबळे आकळे । येरव्ही ना कळे ॥करतळी आवळे । तैसा हरि ॥

ईश्वराबद्दल परमप्रेम असणं म्हणजेच भक्ती. ईश्वर हा प्रेमस्वरुप असल्यामुळे तो फक्त भावानेच, प्रेमानेच बांधला जातो. आमचे महर्षि नारद भक्तीसूत्रामध्ये म्हणतात -

सा तु अस्मिन् परमप्रेमरुपा । अमृत स्वरुपा च ॥

भक्तीसाधनेमध्ये नुसतं प्रेम असून चालत नाही तर परमप्रेम असणं आवश्यक आहे. प्रेमाला 'परम' हे विशेषण दिलंय.

व्यवहारात प्रेम हा शब्द आपण वारंवार वापरतो परंतु या व्यावहारिक प्रेमात इतरांना गुलाम करण्याची महत्वाकांक्षा असते पण परमप्रेमात मात्र असा भावच नसतो. परमप्रेमात आपल्या स्वतःच्या इच्छा, आकांक्षा सर्वकाही बाजूला ठेवायच्या असतात. परमप्रेमात स्वतःचा विचारचं नसतो तिथे स्वतःचं अस्तित्व नष्ट करण्याची तयारी लागते. आचार्य ओशो रजनीश परमप्रेमाचं अतिशय बहारदार वर्णन करतात -

प्रेम खोज़ने की कला नहीं । प्रेम तो खोने की कला हैं ।प्रेम ज़ीनें की कला नहीं । प्रेम तो मरनें की कला हैं ।प्रेम में स्वयं को बचानें की कोशिश करतें हैं - वे मिट जातें हैं ।औरजो मरमिटनें के लिए हमेशा तैय्यार होतें हैं - वे बच जातें हैं ।प्रेम बेहोष प्रार्थना हैं...!प्रेम लेन नहीं, प्रेम तो देन हैं ।प्रेम माँग नहीं, प्रेम तो दान हैं ।प्रेम भीख़ नहीं, प्रेम तो स्वयं का समर्पण हैं ।बुद्धीवान लोग प्रेम नहीं कर सकते, केवल पागल लोग ही प्रेम कर सकते हैं ।क्यों की -प्रेम के लिए दीवानगी चाहिए ॥

तर असा हा भाव, असं हे परमप्रेम ईश्वरभक्तीत अपेक्षित आहे..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी  8793030303 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक