शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

ईश्वर प्रेमस्वरूप; तो फक्त भावपूर्ण प्रेमानेच बांधला जातो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 15:33 IST

प्रेम ही भावाची पहिली अवस्था. भाव म्हणजे प्रेम..! अंतःकरणांत शुद्धसत्वगुण असणे हे भावाचे लक्षण आहे.

- ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी (बीड)

मागील लेखात आपण भाव म्हणजे काय..? या प्रश्नापर्यंत आलो होतो तर भक्तीरसायन सिंधुकार भावाची व्याख्या करतांना म्हणतात -

प्रेमणस्तु प्रथमावस्था भाव इत्युच्यते बुधैः ।शुद्धसत्व विशेषात्मा प्रेम सूर्यांशु साम्यभाक् ।रुचिभिश्चित्त मासृण्य कृदसौ भाव उच्यते ॥

प्रेम ही भावाची पहिली अवस्था. भाव म्हणजे प्रेम..!अंतःकरणांत शुद्धसत्वगुण असणे हे भावाचे लक्षण आहे.प्रेमरुपी सूर्याच्या किरणाप्रमाणे, भगवद्भक्तीच्या तीव्र अभिलाषेने, चित्तात उत्पन्न झालेली जी आर्द्रता, जो स्नेह, जे प्रेम, त्या प्रेमालाच 'भाव' असे म्हणतात. तात्पर्य, भाव म्हणजे प्रेम..!भगवद्भक्तीत जर प्रेम नसेल तर भक्तीचे फळ मिळणार नाही कारण देव तर फक्त भावानेच, प्रेमानेच बद्ध होतो, बांधला जातो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये म्हणतात -

भावबळे आकळे । येरव्ही ना कळे ॥करतळी आवळे । तैसा हरि ॥

ईश्वराबद्दल परमप्रेम असणं म्हणजेच भक्ती. ईश्वर हा प्रेमस्वरुप असल्यामुळे तो फक्त भावानेच, प्रेमानेच बांधला जातो. आमचे महर्षि नारद भक्तीसूत्रामध्ये म्हणतात -

सा तु अस्मिन् परमप्रेमरुपा । अमृत स्वरुपा च ॥

भक्तीसाधनेमध्ये नुसतं प्रेम असून चालत नाही तर परमप्रेम असणं आवश्यक आहे. प्रेमाला 'परम' हे विशेषण दिलंय.

व्यवहारात प्रेम हा शब्द आपण वारंवार वापरतो परंतु या व्यावहारिक प्रेमात इतरांना गुलाम करण्याची महत्वाकांक्षा असते पण परमप्रेमात मात्र असा भावच नसतो. परमप्रेमात आपल्या स्वतःच्या इच्छा, आकांक्षा सर्वकाही बाजूला ठेवायच्या असतात. परमप्रेमात स्वतःचा विचारचं नसतो तिथे स्वतःचं अस्तित्व नष्ट करण्याची तयारी लागते. आचार्य ओशो रजनीश परमप्रेमाचं अतिशय बहारदार वर्णन करतात -

प्रेम खोज़ने की कला नहीं । प्रेम तो खोने की कला हैं ।प्रेम ज़ीनें की कला नहीं । प्रेम तो मरनें की कला हैं ।प्रेम में स्वयं को बचानें की कोशिश करतें हैं - वे मिट जातें हैं ।औरजो मरमिटनें के लिए हमेशा तैय्यार होतें हैं - वे बच जातें हैं ।प्रेम बेहोष प्रार्थना हैं...!प्रेम लेन नहीं, प्रेम तो देन हैं ।प्रेम माँग नहीं, प्रेम तो दान हैं ।प्रेम भीख़ नहीं, प्रेम तो स्वयं का समर्पण हैं ।बुद्धीवान लोग प्रेम नहीं कर सकते, केवल पागल लोग ही प्रेम कर सकते हैं ।क्यों की -प्रेम के लिए दीवानगी चाहिए ॥

तर असा हा भाव, असं हे परमप्रेम ईश्वरभक्तीत अपेक्षित आहे..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी  8793030303 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक