शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

प्रपंचातील आसक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 05:31 IST

भगवंतांनी आपल्या सर्वच भक्तांना सांगितले आहे की, जो भगवंतांची अनन्यभाव अर्पण करून, सतत त्याच्याच नामाच्या सहवासात आपल्या अंत:करणातली भक्ती तेजोमय करतो, त्या परमभक्तावर भगवंत आपल्या कृपेचा अखंडपणे वर्षाव करतात.

- वामन देशपांडेभगवंतांनी आपल्या सर्वच भक्तांना सांगितले आहे की, जो भगवंतांची अनन्यभाव अर्पण करून, सतत त्याच्याच नामाच्या सहवासात आपल्या अंत:करणातली भक्ती तेजोमय करतो, त्या परमभक्तावर भगवंत आपल्या कृपेचा अखंडपणे वर्षाव करतात. अशा परमभक्तांपाशी समत्व बुद्धी नांदत असते, तीच भगवदकृपा असते. अशा श्रेष्ठ परमभक्तांच्या मनात मर्त्य विषयाचा कोलाहल चुकूनही उत्पन्न होत नाही. कारण एकच. भगवंतांचे नाम मर्त्य विचारांना कधीच थारा देत नाही. अशाच श्रेष्ठ परमभक्तांना जणू एक सिद्धी प्राप्त झालेली असते आणि ती म्हणजे त्यांना शास्त्रवचनांच्या गडद छायेत वावरता, वा मनन-चिंतनाच्या अक्षय फेऱ्यात न अडकता, भगवंत स्वत: त्यांना तत्त्वज्ञानाचे अक्षय भरलेले कुंभ प्रेमाने देतो. असे परमभक्त जे जे काही प्रगट करतात, तो इतरांसाठी तत्त्वबोध होतो. जणू भगवंतच त्या आपल्या लाडक्या परमभक्तांच्या मुखातून सर्वसामान्य माणसांना तत्त्व समजावून सांगत असतो. भागवतात श्रीकृष्णांनी उद्धवाला उपदेश केला होता की,प्रायेण भक्तियोगेन सत्सडेग विनोद्धव।नोपायो विद्यते सध्येङ्प्रायणं हि सतामहम।। भागवत ११:११:४८।।उद्धवा, सत्संग आणि हृदयस्थ शुद्ध प्रवाही परमभक्ती हीच माझ्या प्राप्तीची सर्वोत्तम साधना आहे. योग, सांख्य, जप-जाप्य, व्रतवैकल्य, तीर्थाटणे मला विशेष प्रसन्न करीत नाहीत. केवळ ऋषीमुनींच्या सत्संगात माझी प्राप्ती निश्चितणे होते, हे तू लक्षात घे.भगवंतांनी आपले भक्तीरहस्य उलगडून सांगताना आपल्या अत्यंत लाडक्या शिष्याला अतिशय हळुवार शब्दात समजावले होते की,समोहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योस्ति न प्रिय :।ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम।।पार्था, आपल्या डोईवरील निळेभोर पसरलेले आकाश सर्वत्र सारखेच असते ना, तसा मी परमेश्वर सर्वत्र सारखाच आहे. चराचरात मी अखंडपणे व्यापून आहे. संपूर्ण जीवसृृष्टीमध्ये मी समानच आहे. आकाश जसे मानवी सुखदु:खांपासून पूर्णपणे अलिप्त असते, त्याप्रमाणे मीसुद्धा मानवी सुखदु:खांपासून अलिप्त आहे. मी कुठल्याही जीवाचा द्वेष करीत नाही की कुठल्याही जीवात प्रेमभावनेनं गुंतत नाही. परंतु जो माझा परमभक्त माझ्याच भजन-कीर्तनात सदैव दंग असतो, ते परमभक्त माझ्या प्रेमाचा विषय होतात. मी परमेश्वर त्याच माझ्या परमभक्ताच्या हृदयगाभाºयात स्थिर होतो. ते माझे होऊन जातात आणि मी त्यांचा होतो. हे माझे भक्तीरहस्य तू ध्यानात ठेव. त्याचे महत्त्वाचे कारण हे आहे की, ते माझे परमभक्त, करीत असलेल्या प्रपंचात आसक्त नसतात. त्यांचा शरीरभाव यत्किंचितही सळसळत नसतो. ते माझे परभक्त सदैव माझ्या अस्तित्वात विरघळून जाण्याचा प्रयत्न करीत फक्त माझी प्रसन्नता मिळवतात. पार्था ते खरे आत्म्याच्या साक्षीने जगत असतात...भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सर्वच परमभक्तांना अत्यंत पे्रमाने भक्तीसंदेश देतात की,मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरू।मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायण।।भक्तश्रेष्ठ अर्जुन हा भगवंतांचा अत्यंत लाडका भक्त होता म्हणून भगवंतांनी आपल्या अंत:करणातले गुह्यतम ज्ञान अर्जुनापाशी प्रगट केले. महत्वाचे कारण हे होते की, अर्जुन हा ‘अनसूयवे’ म्हणजे दोषदृष्टिरहित होता. भगवंतांनी स्वत:च्या दिव्य अस्तित्वाचा महिमा, फक्त अर्जुनालाच वर्णन करून सांगितला होता.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक