शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
2
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
3
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
4
‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
5
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
6
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
7
३ वर्षांपूर्वी बिसनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
9
'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्...
10
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
11
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
12
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
13
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
14
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
15
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
16
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
17
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
18
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
19
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
20
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 

प्रपंचातील आसक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 05:31 IST

भगवंतांनी आपल्या सर्वच भक्तांना सांगितले आहे की, जो भगवंतांची अनन्यभाव अर्पण करून, सतत त्याच्याच नामाच्या सहवासात आपल्या अंत:करणातली भक्ती तेजोमय करतो, त्या परमभक्तावर भगवंत आपल्या कृपेचा अखंडपणे वर्षाव करतात.

- वामन देशपांडेभगवंतांनी आपल्या सर्वच भक्तांना सांगितले आहे की, जो भगवंतांची अनन्यभाव अर्पण करून, सतत त्याच्याच नामाच्या सहवासात आपल्या अंत:करणातली भक्ती तेजोमय करतो, त्या परमभक्तावर भगवंत आपल्या कृपेचा अखंडपणे वर्षाव करतात. अशा परमभक्तांपाशी समत्व बुद्धी नांदत असते, तीच भगवदकृपा असते. अशा श्रेष्ठ परमभक्तांच्या मनात मर्त्य विषयाचा कोलाहल चुकूनही उत्पन्न होत नाही. कारण एकच. भगवंतांचे नाम मर्त्य विचारांना कधीच थारा देत नाही. अशाच श्रेष्ठ परमभक्तांना जणू एक सिद्धी प्राप्त झालेली असते आणि ती म्हणजे त्यांना शास्त्रवचनांच्या गडद छायेत वावरता, वा मनन-चिंतनाच्या अक्षय फेऱ्यात न अडकता, भगवंत स्वत: त्यांना तत्त्वज्ञानाचे अक्षय भरलेले कुंभ प्रेमाने देतो. असे परमभक्त जे जे काही प्रगट करतात, तो इतरांसाठी तत्त्वबोध होतो. जणू भगवंतच त्या आपल्या लाडक्या परमभक्तांच्या मुखातून सर्वसामान्य माणसांना तत्त्व समजावून सांगत असतो. भागवतात श्रीकृष्णांनी उद्धवाला उपदेश केला होता की,प्रायेण भक्तियोगेन सत्सडेग विनोद्धव।नोपायो विद्यते सध्येङ्प्रायणं हि सतामहम।। भागवत ११:११:४८।।उद्धवा, सत्संग आणि हृदयस्थ शुद्ध प्रवाही परमभक्ती हीच माझ्या प्राप्तीची सर्वोत्तम साधना आहे. योग, सांख्य, जप-जाप्य, व्रतवैकल्य, तीर्थाटणे मला विशेष प्रसन्न करीत नाहीत. केवळ ऋषीमुनींच्या सत्संगात माझी प्राप्ती निश्चितणे होते, हे तू लक्षात घे.भगवंतांनी आपले भक्तीरहस्य उलगडून सांगताना आपल्या अत्यंत लाडक्या शिष्याला अतिशय हळुवार शब्दात समजावले होते की,समोहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योस्ति न प्रिय :।ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम।।पार्था, आपल्या डोईवरील निळेभोर पसरलेले आकाश सर्वत्र सारखेच असते ना, तसा मी परमेश्वर सर्वत्र सारखाच आहे. चराचरात मी अखंडपणे व्यापून आहे. संपूर्ण जीवसृृष्टीमध्ये मी समानच आहे. आकाश जसे मानवी सुखदु:खांपासून पूर्णपणे अलिप्त असते, त्याप्रमाणे मीसुद्धा मानवी सुखदु:खांपासून अलिप्त आहे. मी कुठल्याही जीवाचा द्वेष करीत नाही की कुठल्याही जीवात प्रेमभावनेनं गुंतत नाही. परंतु जो माझा परमभक्त माझ्याच भजन-कीर्तनात सदैव दंग असतो, ते परमभक्त माझ्या प्रेमाचा विषय होतात. मी परमेश्वर त्याच माझ्या परमभक्ताच्या हृदयगाभाºयात स्थिर होतो. ते माझे होऊन जातात आणि मी त्यांचा होतो. हे माझे भक्तीरहस्य तू ध्यानात ठेव. त्याचे महत्त्वाचे कारण हे आहे की, ते माझे परमभक्त, करीत असलेल्या प्रपंचात आसक्त नसतात. त्यांचा शरीरभाव यत्किंचितही सळसळत नसतो. ते माझे परभक्त सदैव माझ्या अस्तित्वात विरघळून जाण्याचा प्रयत्न करीत फक्त माझी प्रसन्नता मिळवतात. पार्था ते खरे आत्म्याच्या साक्षीने जगत असतात...भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सर्वच परमभक्तांना अत्यंत पे्रमाने भक्तीसंदेश देतात की,मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरू।मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायण।।भक्तश्रेष्ठ अर्जुन हा भगवंतांचा अत्यंत लाडका भक्त होता म्हणून भगवंतांनी आपल्या अंत:करणातले गुह्यतम ज्ञान अर्जुनापाशी प्रगट केले. महत्वाचे कारण हे होते की, अर्जुन हा ‘अनसूयवे’ म्हणजे दोषदृष्टिरहित होता. भगवंतांनी स्वत:च्या दिव्य अस्तित्वाचा महिमा, फक्त अर्जुनालाच वर्णन करून सांगितला होता.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक