शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

आनंद तरंग - स्वत:वरील कृपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 06:35 IST

पुराणकाळापासून दुर्योधन नावाची वृत्ती कशी काय अजूनही कार्यरत आहे.

विजयराज बोधनकर

आपल्या अवतीभवती पूर्णपणे आनंद भरला असताना वृत्तीने माणसं कौरवांसारखी का वागतात आणि जिथे मानवनिर्मित दु:खाची निर्मिती होते तिथे संस्कार, कृ ती, ज्ञान या आधारे काम करून जी माणसे गौरवाच्या योग्य ठरतात, ती माणसे का तशी असतात? हा संशोधनाचा विषय आहे. आताची अस्ताव्यस्त जीवनशैली कुणी निर्माण केली? अस्ताव्यस्त वागणं एक व्यसन असतं ते कशामुळे लागतं आणि या अस्ताव्यस्त विचारधारेमुळे स्वत:चं आणि समाजाचं किती नुकसान होत राहतं, हे लोकांच्या लक्षात कसं येत नाही? अगदी

पुराणकाळापासून दुर्योधन नावाची वृत्ती कशी काय अजूनही कार्यरत आहे. इतकी वर्षं भगवतगीतेचं पठण करूनही वृत्तीचं दमन का होत नाही? शैक्षणिक क्षेत्रात कॉर्पोरेट वृत्तीची बिनचेहऱ्याची माणसं शिरलीत आणि संस्कारमय शिक्षणाचा तेजोमहाल कसा निस्तेज करून टाकला, याही क्षेत्रात दुर्योधन वृत्तीने धुडगूस कुठल्या कारणामुळे सुरू केला? जीवनाला आधार आणि आकार देणारी विचारधारा जाऊन आर्थिक विकार आणि बाजारू शिक्षणाचा कल कशामुळे वाढला? आपल्याच मातृभाषेचं खच्चीकरण करून इंग्रजीच भाषा कशी व्यावसायिक जीवनाला उपयुक्त आहे ही विचारधारणा कुठल्या पोकळीतून जन्माला आली? विशीच्या आत असलेल्या वयोगटाला आपलीच मातृभाषा निट वाचतासुद्धा येत नाही आणि म्हणून भारतीय जीवनशैलीचं, परंपरेचं इतकं खच्चीकरण होत चाललंय हे अजूनही अनेकांच्या लक्षात का येत नाही? असे शेकडो प्रश्न अनेकांच्या चर्चेतून ऐकायला मिळतात. म्हणजे बºयापैकी अनेकांची मने आतून धुमसत असताना दिसत मात्र असते. एका तेवीस वर्षांच्या तरुणाला कामाच्या अतिताणामुळे ब्रेनस्ट्रोक आला. ही जीवघेणी आर्थिक स्पर्धा वाढीस लागली आणि या मोहमायेच्या जगापासून वैचारिक अध्यात्म हळूहळू दूर चालल्याची भावना पुन्हा निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागलीत. निसर्गापासून दूर गेलेली आणि सिमेंटच्या थंडगार कृत्रिम वातावरणात वाढणारी पिढी धिम्या पावलाने का होईना शांतीच्या शोधाकडे आकर्षित होऊ लागलीत. अती लोभामुळेच महाभारताचं युद्ध पुकारलं जाऊन कौरववृत्तीचा नायनाट आणि शेवटी विचारांच्या गौरवशाली परंपरेला आधार देणाºयांचा विजय झाला. असत्याच्या मार्गावरून माणूस कितीही दूर गेला तरी यू टर्न घ्यावाच लागतो आणि शांतीच्या महाद्वारात उभं राहावंच लागतं. म्हणूनच काही वर्षांपूर्वीच तुकोबारायांनी अभंग रचला. ते म्हणातात, ‘अरे फजितखोर मना किती तूज सांगो, नको लागू कुणा मागे मागे’ या अभंगातूनच खूप काही शिकण्यासारखं मात्र नक्कीच आहे. शापित वृत्तीच्या महामार्गावरून कमविलेली धनराशी शेवटी शापितच ठरते. त्या धनातून उभारलेले महाल, बंगले शेवटी ढासळून पडतात, उद्ध्वस्त होतातच. भ्रष्टाचार अंधाराला घेऊन चालत राहतो तर आचारविचार नेहमीच प्रकाशाला घेऊन चालत असतो. मनाला भुरळ पाडणारी चमकती मयसभाही शेवटी एक दिवस उद्ध्वस्त होते. त्या खोट्या जीवनशैलीपासून दूर राहण्यासाठीच थोडा वेळ तरी निसर्ग तत्त्वासोबत ध्यानमग्न अवस्थेत राहिलं की सत्य-असत्याचा नकळत खुलासा होत जातो. स्वत:चीच स्वत:वर कृपा होणं म्हणजे शांतीच्या महाद्वारात परतण्यासारखं आहे आणि समाजाने ती पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक