शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - स्वत:वरील कृपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 06:35 IST

पुराणकाळापासून दुर्योधन नावाची वृत्ती कशी काय अजूनही कार्यरत आहे.

विजयराज बोधनकर

आपल्या अवतीभवती पूर्णपणे आनंद भरला असताना वृत्तीने माणसं कौरवांसारखी का वागतात आणि जिथे मानवनिर्मित दु:खाची निर्मिती होते तिथे संस्कार, कृ ती, ज्ञान या आधारे काम करून जी माणसे गौरवाच्या योग्य ठरतात, ती माणसे का तशी असतात? हा संशोधनाचा विषय आहे. आताची अस्ताव्यस्त जीवनशैली कुणी निर्माण केली? अस्ताव्यस्त वागणं एक व्यसन असतं ते कशामुळे लागतं आणि या अस्ताव्यस्त विचारधारेमुळे स्वत:चं आणि समाजाचं किती नुकसान होत राहतं, हे लोकांच्या लक्षात कसं येत नाही? अगदी

पुराणकाळापासून दुर्योधन नावाची वृत्ती कशी काय अजूनही कार्यरत आहे. इतकी वर्षं भगवतगीतेचं पठण करूनही वृत्तीचं दमन का होत नाही? शैक्षणिक क्षेत्रात कॉर्पोरेट वृत्तीची बिनचेहऱ्याची माणसं शिरलीत आणि संस्कारमय शिक्षणाचा तेजोमहाल कसा निस्तेज करून टाकला, याही क्षेत्रात दुर्योधन वृत्तीने धुडगूस कुठल्या कारणामुळे सुरू केला? जीवनाला आधार आणि आकार देणारी विचारधारा जाऊन आर्थिक विकार आणि बाजारू शिक्षणाचा कल कशामुळे वाढला? आपल्याच मातृभाषेचं खच्चीकरण करून इंग्रजीच भाषा कशी व्यावसायिक जीवनाला उपयुक्त आहे ही विचारधारणा कुठल्या पोकळीतून जन्माला आली? विशीच्या आत असलेल्या वयोगटाला आपलीच मातृभाषा निट वाचतासुद्धा येत नाही आणि म्हणून भारतीय जीवनशैलीचं, परंपरेचं इतकं खच्चीकरण होत चाललंय हे अजूनही अनेकांच्या लक्षात का येत नाही? असे शेकडो प्रश्न अनेकांच्या चर्चेतून ऐकायला मिळतात. म्हणजे बºयापैकी अनेकांची मने आतून धुमसत असताना दिसत मात्र असते. एका तेवीस वर्षांच्या तरुणाला कामाच्या अतिताणामुळे ब्रेनस्ट्रोक आला. ही जीवघेणी आर्थिक स्पर्धा वाढीस लागली आणि या मोहमायेच्या जगापासून वैचारिक अध्यात्म हळूहळू दूर चालल्याची भावना पुन्हा निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागलीत. निसर्गापासून दूर गेलेली आणि सिमेंटच्या थंडगार कृत्रिम वातावरणात वाढणारी पिढी धिम्या पावलाने का होईना शांतीच्या शोधाकडे आकर्षित होऊ लागलीत. अती लोभामुळेच महाभारताचं युद्ध पुकारलं जाऊन कौरववृत्तीचा नायनाट आणि शेवटी विचारांच्या गौरवशाली परंपरेला आधार देणाºयांचा विजय झाला. असत्याच्या मार्गावरून माणूस कितीही दूर गेला तरी यू टर्न घ्यावाच लागतो आणि शांतीच्या महाद्वारात उभं राहावंच लागतं. म्हणूनच काही वर्षांपूर्वीच तुकोबारायांनी अभंग रचला. ते म्हणातात, ‘अरे फजितखोर मना किती तूज सांगो, नको लागू कुणा मागे मागे’ या अभंगातूनच खूप काही शिकण्यासारखं मात्र नक्कीच आहे. शापित वृत्तीच्या महामार्गावरून कमविलेली धनराशी शेवटी शापितच ठरते. त्या धनातून उभारलेले महाल, बंगले शेवटी ढासळून पडतात, उद्ध्वस्त होतातच. भ्रष्टाचार अंधाराला घेऊन चालत राहतो तर आचारविचार नेहमीच प्रकाशाला घेऊन चालत असतो. मनाला भुरळ पाडणारी चमकती मयसभाही शेवटी एक दिवस उद्ध्वस्त होते. त्या खोट्या जीवनशैलीपासून दूर राहण्यासाठीच थोडा वेळ तरी निसर्ग तत्त्वासोबत ध्यानमग्न अवस्थेत राहिलं की सत्य-असत्याचा नकळत खुलासा होत जातो. स्वत:चीच स्वत:वर कृपा होणं म्हणजे शांतीच्या महाद्वारात परतण्यासारखं आहे आणि समाजाने ती पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक