शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

आनंद तरंग - दु:खाचा स्वीकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 06:20 IST

मानवी कर्माचे जसे गणित आहे तसेच गणित मानवी विचारांचे आहे.

विजयराज बोधनकरसुखदु:खाचा खरा मेळ म्हणजेच खरं जीवन. दु:खाला डावलून आयुष्य पूर्णत्वाकडे जाऊच शकत नाही. फक्त सुखाचीच इच्छा मानवी मनात असेल तर ते अर्धसत्य असेल. रात्र काळी व दिवस प्रकाशमान हे जसे परिमाण आहे़ तसेच सुखानंतर दु:ख आणि दु:खानंतर सुखाचे गणित ठरलेले असते. जो नोकरीत खडतर कष्ट घेतो, सुखाच्या क्षणांचा त्याग करतो त्याच्या जीवनप्रवासात पुढे सुखाचा प्रकाश दिसतो. विद्यार्थी अवस्थेत जो सर्व सुखांचा त्याग करून फक्त अभ्यास आणि चिंतनात मनबुद्धी रमवितो त्याचे फळ त्याला परीक्षेतल्या उत्तम मार्कात किंवा यशात परावर्तीत झालेले आपण पाहतो. म्हणजेच त्याच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश येत राहतो.

मानवी कर्माचे जसे गणित आहे तसेच गणित मानवी विचारांचे आहे. दोन प्रकारचे विचार माणूस सतत करीत राहतो. एखादा विद्यार्थी मनातल्या मनात म्हणतो की मला निसर्गाने बुद्धीचे वरदान दिले आहे, त्याचा वापर करून मोठ्या प्रमाणावर परीक्षेत यश मिळविणारच. या निश्चयाने तो अभ्यासाच्या प्रक्रियेला लागतो आणि खरोखरच यश प्राप्त करून दाखवितो. परंतु एखादा विद्यार्थी निराशाजनक विचार करून मनातल्या मनात विचार करतो आणि स्वत:लाच सांगतो की हा अभ्यास माझ्या आवाक्याबाहेर असल्याने मला यश मिळविणे शक्य होणार नाही; आणि त्याचे पडसाद असे उमटतात की त्याच्या नकारार्थी विचारसरणीमुळे त्याच्या पदरी अपयशच पडते. म्हणजेच जसा संकल्प असतो तसेच फळ पदरी पडते. प्रथम त्यागाची भूमिका स्वीकारली की भोगाची सर्व लक्षणे गळून पडतात; आणि त्यानंतर सत्शील कृतीचे मार्ग आपल्यासाठी सहजरीत्या खुले होतात. म्हणजेच सुखदु:खाचा मेळ असल्याशिवाय किंवा स्वीकारल्याशिवाय खऱ्या जीवनाला प्रारंभच होऊ शकत नाही. तात्पर्य काय तर प्रथम दु:खाचा स्वीकार म्हणजेच सुखाला आकार प्राप्त करून घेणे होय़ 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक