शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

आनंद तरंग - दु:खाचा स्वीकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 06:20 IST

मानवी कर्माचे जसे गणित आहे तसेच गणित मानवी विचारांचे आहे.

विजयराज बोधनकरसुखदु:खाचा खरा मेळ म्हणजेच खरं जीवन. दु:खाला डावलून आयुष्य पूर्णत्वाकडे जाऊच शकत नाही. फक्त सुखाचीच इच्छा मानवी मनात असेल तर ते अर्धसत्य असेल. रात्र काळी व दिवस प्रकाशमान हे जसे परिमाण आहे़ तसेच सुखानंतर दु:ख आणि दु:खानंतर सुखाचे गणित ठरलेले असते. जो नोकरीत खडतर कष्ट घेतो, सुखाच्या क्षणांचा त्याग करतो त्याच्या जीवनप्रवासात पुढे सुखाचा प्रकाश दिसतो. विद्यार्थी अवस्थेत जो सर्व सुखांचा त्याग करून फक्त अभ्यास आणि चिंतनात मनबुद्धी रमवितो त्याचे फळ त्याला परीक्षेतल्या उत्तम मार्कात किंवा यशात परावर्तीत झालेले आपण पाहतो. म्हणजेच त्याच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश येत राहतो.

मानवी कर्माचे जसे गणित आहे तसेच गणित मानवी विचारांचे आहे. दोन प्रकारचे विचार माणूस सतत करीत राहतो. एखादा विद्यार्थी मनातल्या मनात म्हणतो की मला निसर्गाने बुद्धीचे वरदान दिले आहे, त्याचा वापर करून मोठ्या प्रमाणावर परीक्षेत यश मिळविणारच. या निश्चयाने तो अभ्यासाच्या प्रक्रियेला लागतो आणि खरोखरच यश प्राप्त करून दाखवितो. परंतु एखादा विद्यार्थी निराशाजनक विचार करून मनातल्या मनात विचार करतो आणि स्वत:लाच सांगतो की हा अभ्यास माझ्या आवाक्याबाहेर असल्याने मला यश मिळविणे शक्य होणार नाही; आणि त्याचे पडसाद असे उमटतात की त्याच्या नकारार्थी विचारसरणीमुळे त्याच्या पदरी अपयशच पडते. म्हणजेच जसा संकल्प असतो तसेच फळ पदरी पडते. प्रथम त्यागाची भूमिका स्वीकारली की भोगाची सर्व लक्षणे गळून पडतात; आणि त्यानंतर सत्शील कृतीचे मार्ग आपल्यासाठी सहजरीत्या खुले होतात. म्हणजेच सुखदु:खाचा मेळ असल्याशिवाय किंवा स्वीकारल्याशिवाय खऱ्या जीवनाला प्रारंभच होऊ शकत नाही. तात्पर्य काय तर प्रथम दु:खाचा स्वीकार म्हणजेच सुखाला आकार प्राप्त करून घेणे होय़ 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक