शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

आनंद तरंग - दु:खाचा स्वीकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 06:20 IST

मानवी कर्माचे जसे गणित आहे तसेच गणित मानवी विचारांचे आहे.

विजयराज बोधनकरसुखदु:खाचा खरा मेळ म्हणजेच खरं जीवन. दु:खाला डावलून आयुष्य पूर्णत्वाकडे जाऊच शकत नाही. फक्त सुखाचीच इच्छा मानवी मनात असेल तर ते अर्धसत्य असेल. रात्र काळी व दिवस प्रकाशमान हे जसे परिमाण आहे़ तसेच सुखानंतर दु:ख आणि दु:खानंतर सुखाचे गणित ठरलेले असते. जो नोकरीत खडतर कष्ट घेतो, सुखाच्या क्षणांचा त्याग करतो त्याच्या जीवनप्रवासात पुढे सुखाचा प्रकाश दिसतो. विद्यार्थी अवस्थेत जो सर्व सुखांचा त्याग करून फक्त अभ्यास आणि चिंतनात मनबुद्धी रमवितो त्याचे फळ त्याला परीक्षेतल्या उत्तम मार्कात किंवा यशात परावर्तीत झालेले आपण पाहतो. म्हणजेच त्याच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश येत राहतो.

मानवी कर्माचे जसे गणित आहे तसेच गणित मानवी विचारांचे आहे. दोन प्रकारचे विचार माणूस सतत करीत राहतो. एखादा विद्यार्थी मनातल्या मनात म्हणतो की मला निसर्गाने बुद्धीचे वरदान दिले आहे, त्याचा वापर करून मोठ्या प्रमाणावर परीक्षेत यश मिळविणारच. या निश्चयाने तो अभ्यासाच्या प्रक्रियेला लागतो आणि खरोखरच यश प्राप्त करून दाखवितो. परंतु एखादा विद्यार्थी निराशाजनक विचार करून मनातल्या मनात विचार करतो आणि स्वत:लाच सांगतो की हा अभ्यास माझ्या आवाक्याबाहेर असल्याने मला यश मिळविणे शक्य होणार नाही; आणि त्याचे पडसाद असे उमटतात की त्याच्या नकारार्थी विचारसरणीमुळे त्याच्या पदरी अपयशच पडते. म्हणजेच जसा संकल्प असतो तसेच फळ पदरी पडते. प्रथम त्यागाची भूमिका स्वीकारली की भोगाची सर्व लक्षणे गळून पडतात; आणि त्यानंतर सत्शील कृतीचे मार्ग आपल्यासाठी सहजरीत्या खुले होतात. म्हणजेच सुखदु:खाचा मेळ असल्याशिवाय किंवा स्वीकारल्याशिवाय खऱ्या जीवनाला प्रारंभच होऊ शकत नाही. तात्पर्य काय तर प्रथम दु:खाचा स्वीकार म्हणजेच सुखाला आकार प्राप्त करून घेणे होय़ 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक