शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोमल वाणी दे रे रामा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 02:51 IST

काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात वाचले होते की एका श्रीमंत व प्रतिष्ठित गृहस्थाच्या घरचा चौकीदार दोन दिवस कामावर आला नाही त्यामुळे सदर गृहस्थ त्याच्यावर खूप रागावले, चिडले, वाटेल तसे त्याला बोलले.

- प्रा. डॉ. संदीप ताटेवारकाही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात वाचले होते की एका श्रीमंत व प्रतिष्ठित गृहस्थाच्या घरचा चौकीदार दोन दिवस कामावर आला नाही त्यामुळे सदर गृहस्थ त्याच्यावर खूप रागावले, चिडले, वाटेल तसे त्याला बोलले. चौकीदार बोलणे सहन करू शकला नाही व त्याने त्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. त्या गृहस्थाला अटक झाली व पुढे तुरुंगात रवानगी झाली. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात.कोमल वाणी दे रे रामा ।विमल करणी दे रे रामा ।।संत तुकाराम महाराज म्हणतात,बोलावे बरे । बोलावे खरे ।कोणाच्याही मनावर । पाडू नये चरे ।।म्हणजेच बोलताना शब्दाबाबत आपण अत्यंत जागरूक असणे आवश्यक असते. बरेचदा जीवनात घटना खूप क्षुल्लक असतात, पण आपण त्याला धारधार शब्दांनी चिघळून टाकतो. शब्दाला धार नसावी तर शब्द हे आधार देणारे असावेत कारण धारधार शब्द मन कापतात तर आधार देणारे शब्द मन जोडतात. जेव्हा आपण धारधार शब्द वारंवार बोलण्यात वापरतो तेव्हा ते आपल्या संस्काराचा भाग बनतात मग थोडंसुद्धा मनाविरुद्ध झालं की आपोआप धारधार शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतात. त्यामुळे आपली इच्छा जरी चांगले शब्द वापरण्याची असेल तरी ते वापरणे आपल्या नियंत्रणात राहत नाही मग आपण म्हणतो की मला चांगलंच बोलायचं होत. पण माझ्या मुखातून वाईटच शब्द बाहेर पडतात. आपण या सवयीचे एवढे आहारी जातो की घरी व दारी असेच शब्द वापरायला लागतो. त्यामुळे आपले व परके असे सर्वच संबंध धारधार शब्दांमुळे संपुष्टात येतात. बरेचदा शब्द हे कृतीपेक्षाही जास्त घायाळ करतात. जेव्हा आपण दुसऱ्याला आपल्या शब्दांनी किंवा कृतींनी दु:खी करतो तेव्हा आपल्यात मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती निर्माण होते व ती आपल्याला स्वत:ला घातक ठरते. समर्थ रामदास स्वामी म्हणतात,विचारेंविण बोलों नये । विवंचनेविण चालों नये ।मर्यादेविण हालों नये । कांहीं येक ॥म्हणजेच सारासार विचार केल्याशिवाय बोलू नये. कार्य सुरू करताना सर्वांगीण बाजूंचा विचार केल्याशिवाय कार्य सुरू करू नये. नीती अनीतीचा विचार केल्याशिवाय हालचाल करू नये.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक