शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

कोमल वाणी दे रे रामा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 02:51 IST

काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात वाचले होते की एका श्रीमंत व प्रतिष्ठित गृहस्थाच्या घरचा चौकीदार दोन दिवस कामावर आला नाही त्यामुळे सदर गृहस्थ त्याच्यावर खूप रागावले, चिडले, वाटेल तसे त्याला बोलले.

- प्रा. डॉ. संदीप ताटेवारकाही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात वाचले होते की एका श्रीमंत व प्रतिष्ठित गृहस्थाच्या घरचा चौकीदार दोन दिवस कामावर आला नाही त्यामुळे सदर गृहस्थ त्याच्यावर खूप रागावले, चिडले, वाटेल तसे त्याला बोलले. चौकीदार बोलणे सहन करू शकला नाही व त्याने त्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. त्या गृहस्थाला अटक झाली व पुढे तुरुंगात रवानगी झाली. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात.कोमल वाणी दे रे रामा ।विमल करणी दे रे रामा ।।संत तुकाराम महाराज म्हणतात,बोलावे बरे । बोलावे खरे ।कोणाच्याही मनावर । पाडू नये चरे ।।म्हणजेच बोलताना शब्दाबाबत आपण अत्यंत जागरूक असणे आवश्यक असते. बरेचदा जीवनात घटना खूप क्षुल्लक असतात, पण आपण त्याला धारधार शब्दांनी चिघळून टाकतो. शब्दाला धार नसावी तर शब्द हे आधार देणारे असावेत कारण धारधार शब्द मन कापतात तर आधार देणारे शब्द मन जोडतात. जेव्हा आपण धारधार शब्द वारंवार बोलण्यात वापरतो तेव्हा ते आपल्या संस्काराचा भाग बनतात मग थोडंसुद्धा मनाविरुद्ध झालं की आपोआप धारधार शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतात. त्यामुळे आपली इच्छा जरी चांगले शब्द वापरण्याची असेल तरी ते वापरणे आपल्या नियंत्रणात राहत नाही मग आपण म्हणतो की मला चांगलंच बोलायचं होत. पण माझ्या मुखातून वाईटच शब्द बाहेर पडतात. आपण या सवयीचे एवढे आहारी जातो की घरी व दारी असेच शब्द वापरायला लागतो. त्यामुळे आपले व परके असे सर्वच संबंध धारधार शब्दांमुळे संपुष्टात येतात. बरेचदा शब्द हे कृतीपेक्षाही जास्त घायाळ करतात. जेव्हा आपण दुसऱ्याला आपल्या शब्दांनी किंवा कृतींनी दु:खी करतो तेव्हा आपल्यात मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती निर्माण होते व ती आपल्याला स्वत:ला घातक ठरते. समर्थ रामदास स्वामी म्हणतात,विचारेंविण बोलों नये । विवंचनेविण चालों नये ।मर्यादेविण हालों नये । कांहीं येक ॥म्हणजेच सारासार विचार केल्याशिवाय बोलू नये. कार्य सुरू करताना सर्वांगीण बाजूंचा विचार केल्याशिवाय कार्य सुरू करू नये. नीती अनीतीचा विचार केल्याशिवाय हालचाल करू नये.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक