शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

‘उपासनेची पाऊलवाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 02:47 IST

डोंगर रांगांमधून नागमोडी वळणाची पाऊलवाट जाते तेव्हा पांथस्थ, वाटसरू सांभाळून मार्गक्रमण करतात. सावधपणानं सर्वत्र नजर फिरवून दूरवर चालत गेलं की मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत जाणं शक्य होतं.

- कौमुदी गोडबोलेडोंगर रांगांमधून नागमोडी वळणाची पाऊलवाट जाते तेव्हा पांथस्थ, वाटसरू सांभाळून मार्गक्रमण करतात. सावधपणानं सर्वत्र नजर फिरवून दूरवर चालत गेलं की मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत जाणं शक्य होतं. बेसावध, गाफील राहिलं की गडबड होते. वर, खाली, उंच, सखल भागातून जाणारी पाऊलवाट माणसाला खूप शिकवून जाते. वळणा-वळणाची वाट जीवनाला वळण लावण्यास सहायक ठरते. सजग, जागृत राहिलं की चालताना खाली पडण्याचा, घसरण्याचा धोका संभवत नाही.मोहाचे, लोभाचे क्षण सांभाळले की पाऊलवाट देखील योग्य ध्येयापर्यंत घेऊन जाते. प्रत्येकाला प्रशस्त मार्ग प्राप्त होईल असं नाही. कधी कधी छोट्याशा पाऊलवाटेनं चालणं क्रमप्राप्त असतं. ही वाट त्रस्त न करता माणसाला आश्वस्त करते. त्यामुळे अस्वस्थता दूर निघून जाते. उमेदीनं, उल्हासानं, उत्साहानं मार्गक्रमण केलं जातं. मग अडचणी, अडथळे यांचा बाऊ वाटत नाही. ऐन उन्हामध्ये देखील थंडावा प्राप्त होतो. अडखळलं, ठेचकाळलं तरी त्यामुळे होणाºया जखमांची तमा बाळगली जात नाही.उंच जाताना धाप लागत नाही. प्रतिकूल वातावरणाचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही. ध्येयावर अविचल श्रद्धा असली तर पाऊलवाटही उपयुक्त ठरते. वाटेतल्या काट्यांची फुलं होतात. टोकदार दगड मखमली होऊन जातात. आजूबाजूची हिरवळ मनाला उभारी देते. झाडांच्या फांद्या थंडगार वारा घालू लागतात. रात्रीच्या अंध:कारात चांदण्यांचा चमचमता प्रकाश पाऊलवाटेवर पसरतो. त्यामुळे संकटाचं, अंधाराचं भय संपून जातं. माथ्यावर निळेशार आकाश, चंद्राची कोर, तारकांच्या माळा जीवन प्रवास सुखकर करतात. अशा छोट्याशा पाऊलवाटेवर भक्तीची भक्कम पावलं टाकली जातात. परमात्म्याच्या शक्तीवर अविचल निष्ठा असली की कठीण प्रवास सोपा होतो. निष्ठेसह जीवन प्रवास करताना निर्धार पक्का होत जातो. निष्ठा व निर्धार हातात हात घालून वाटचाल करतात तेव्हा निर्भयता येते. भीतीचा लवलेशही उरत नाही. आता पावलांना वेग येतो. भगवंत, भक्त, भक्ती यांची त्रयी त्रिविधता याला जुमानत नाही. मग ‘भवताप’ तरी कसा त्रस्त करू शकेल?उपासनेची सश्रद्ध पाऊलवाट प्रकाशवाट होऊन जाते. विश्वात्मक शक्तीची मदत मिळू लागते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक