शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

। आनंदाचा पूर ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:36 IST

‘पुण्य फळले बहुत दिवसा। भाग्य उदयाचा ठसा।।’ असं बहुत दिवसांचं पुण्य फळाला आलं म्हणून आम्हाला या वारीचा अनुभव घेता आला.

-इंद्रजित देशमुख-

‘पुण्य फळले बहुत दिवसा।भाग्य उदयाचा ठसा।।’असं बहुत दिवसांचं पुण्य फळाला आलं म्हणून आम्हाला या वारीचा अनुभव घेता आला. त्यातही या भाग्याची पूर्णावस्था आज अनुभवायला मिळणार आहे, कारण आज आमची ज्ञानेश्वर माउली भंडीशेगावहूुन निघून, तर आमचे तुकोबाराय पिराच्या कुरोलीतून निघून वाखरीत पोहोचणार आहेत. या दोन्ही आणि इतरही कितीतरी संतांच्या पालख्या वाखरीत येणार आहेत. समुद्राला मिळण्याअगोदर गंगेने जे विस्तीर्ण रूप धारण केलंय नेमकं तसचं पंढरपुरात पोहोचण्याअगोदर हा वैष्णवांचा महापूर वखरीत विसावणार आहे आणि जगद्गुरू तुकोबारायांच्या‘जन्मोजन्मीचे संचित।भेटी झाली अकस्मात ।।’या वचनाप्रमाणे डोळ्यांचेच काय, सबंध देहाचे पारणे फेडणारे क्षण आम्ही आज अनुभवणार आहोत.आजच्या या सोहळ्यात आनंदाचा अक्षरश: पूर आलाय. पंढरपूर अगदी जवळ आलंय. ज्याच्या भेटीसाठी इतके दिवस चालत चालत कितीतरी वेळा पदरी आलेल्या अव्यवस्थेला व्यवस्था समजून जे चालणं झालं. प्रत्येक क्षणाला ज्याचा आठव या बुद्धीला स्पर्श करायचा आणि भेटीची हुरहूर नव्या उत्तेजनेने चाळवून जायचा. ज्याच्या भेटीच्या आसेने मन व्याकूळ झालंय, तो आमचा पांडुरंग परमात्मा आता आम्हाला भेटणार यामुळे हर्ष आणि उल्हास यांचा मिलाफ आमच्या अंगोअंगी उसळतोय. आजच्या क्षणाचं वर्णन करताना आमचे तुकोबाराय म्हणतात,‘पूर आला आनंदाचा।लाटा उसळती प्रेमाच्या।।बांधू विठ्ठल संगडी।पोहून जाऊ पैलथडी।।अवघेजण गडी।घाला उडी भाईनो।।हे तो नाही सर्वकाळ।अमूप आनंदाचे जळ।।तुका म्हणे थोरा पुण्ये।ओघ आला पंथे येणे।।’महाराज इथे आनंदाचा पूर आलाय म्हणतात. वास्तविक, सामान्य जगणं जगताना आमच्या अवतीभोवती निव्वळ आणि निव्वळ दु:खच किंवा निराशाच असते. अपेक्षा सुखाची किंवा आनंदाची असते आणि प्राप्ती मात्र दु:खाचीच असते. अगदी महाराजांच्याच भाषेत सांगायच झालं तर,‘संसार दु:खमूळ चहुकडे इंगळ।विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ।।’असं जगावं लागतं; पण इथं मात्र अंत:करणात आंनदाचं भरत आलेले तुकोबाराय आनंदाच्या पुराचं वर्णन करतात. आनंदाचा पूर आलेला आणि त्यावर उसळणाऱ्या प्रेमाच्या लाटा, म्हणजेच वारीत आंनद आहे. अगदी आंनदाचा पूर आहे; पण त्यातही प्रेमाचं आधिस्थान आहे कारण आमच्या जीवनात बºयाचदा आंनद निर्माण झाला की, त्या आंनदासोबत मद निर्माण होतो आणि त्यातूनच परत अपपरभाव किंवा परतिरस्कार भाव वाढतो. थोडक्यात काय, या सगळ्यातून संकुचितताच वाढीस लागते; पण इथे वारीत आलेला आनंदाचा पूर त्यावर उसळणाºया प्रेमाच्या लाटा हे सगळं सहजीवी आणि परसुखसंतोषी भावातून निर्माण होणार आहे म्हणूनच महाराज सगळ्यांना सांगतात की, ‘विठ्ठल नामाची सांगड बांधूया आणि सगळेचजण हा भवसागर तरुन जाऊया. याचसाठी सगळेजण या आनंदात उडी घ्या. वेगळे राहू नका. वरचेवर असा अमूप आंनद सोहळा आपल्याला अनुभवता येणार नाही. कदाचित आपली पुण्याईच थोर जेणेकरून हा आंनदपुराचा ओघ आपल्या वाटेत आलाय. या, यात न्हाऊया, मंगल बनूया.’आज दुपारी ज्यावेळी माउलींच्या आणि तुकोबारायांच्या अश्वांचे गोल आणि उभे रिंगण इथे संपन्न होईल ते सगळं शब्दात रेखाटता येणारच नाही. ते पताकाधारकांचं धावणं, विणेकºयांचं धावणं, माउलींच्या अश्वाचं धावणं हे सारं जन्मजन्मांतरासाठी हृदयात साठवावं आणि प्राण ओठात आणून आजन्म ही वारी माझ्याकडून कधीच चुकू देऊ नको, असं मागणं त्या पांडुरंगाकडे भरल्या डोळ्यांनी ओरडून घाय मोकलून मागावं, असं वाटतंय.माउलींच्या अश्वाच्या टपेखालची माती उचलून आपल्या भाळी लावताना जग जिंकल्यानंतर सुद्धा जी धन्यता आमच्या चेहºयावर दिसणार नाही, तो आंनद या वारकºयांंच्या चेहºयावर उमटतोय. या नि:स्सीम भक्तीने ओथंबलेल्या वारकºयांंच्या पायाखालची पायधूळ भाळी लावून धन्य व्हावं आणि या आनंदात स्वत:ला पूर्णपणे विरघळवून घ्यावं असंच वाटतंय.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)