शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भय हेच संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 04:47 IST

देव आणि अध्यात्म यामधलं नातं मोठं गहन आहे. ज्याला देव मानसशास्त्राच्या उंचीवरून कळला त्यांच्याचसाठी तो गहन आहे.

- विजयराज बोधनकरदेव आणि अध्यात्म यामधलं नातं मोठं गहन आहे. ज्याला देव मानसशास्त्राच्या उंचीवरून कळला त्यांच्याचसाठी तो गहन आहे. अन्यथा तो चिंतेचा विषय आहे. ‘कारे भुललाशी वरलीया रंगा’ ही म्हण देव-धर्मासाठीसुद्धा लागू पडते. कारण ज्या मानसशास्त्राच्या आधाराने देव या संकल्पनेची रचना केली गेली ती संकल्पनाच लुप्त होत जाऊन त्या जागी कर्मकांड आले. नाशिक किंवा ओंकारेश्वर किंवा इतर धार्मिक ठिकाणी नदीच्या काठावर जी धार्मिक कर्मकांडे चाललेली असतात त्यामागे श्रद्धेपेक्षा एक पारंपरिक भय जास्त लपलेले दिसते. ही काही आताचीच परंपरा नसून हजारो वर्षांपासून या प्रथा चालूच राहिल्या आणि आजही सुरूच आहेत. साधारण बाराव्या शतकातल्या प्रथा जरी बघितल्या तरी आपल्या लक्षात येईल की यातली आजही कुठली कर्मकांडे सुरू आहेत. यज्ञयाग, होमहवन, प्राणिबळी, सतीप्रथा, व्रतवैकल्ये, नवस, उपासतापास, उद्यापने, जपतप, अन्नसत्रे, तीर्थयात्रा, मावंदे, प्रायश्चित्त विधी, अशा विविध प्रथा होत्या. या सर्व फलप्राप्तीसाठी केल्या जात होत्या. त्यातल्या आजही अनेक प्रथा या विज्ञानयुगात सुरूच आहेत. इष्टकामनापूर्तीसाठी मोठ्या श्रद्धेने जरी या प्रथा निर्माण झाल्या होत्या तरी यामागे भयतत्त्व लपले गेले होते. या सर्व प्रथा परंपरांना चोख उत्तर मिळतं ते पातंजल योगशास्त्रात. मनाचे शेकडो विकार मानवस्वभावाच्या विकृत वागणुकीतून जन्माला आलेले असतात. मानवी मन हे जितकं हळवं, नाजूक तितकंच पशुवत हिंस्र आहे. मानव जातीनेच मानवाचं कल्याणही केलं आहे आणि मानवाचा विध्वंसही त्यानेच घडवून आणला आहे. परंतु काही अनिष्ट घडलं तरी ते ईश्वराच्या कोपाने घडलं आणि चांगलं घडलं तरी ईश्वराच्या कृपाप्रसादे घडलं असा मोठा भास निर्माण करण्यात बराच मोठा काळ यशस्वी होत आल्यामुळे त्याची पाळेमुळे खोलवर रूजून, समाजाला या परंपरांनी सतत भयापोटी कार्यरत ठेवल्याचं अनेकदा लक्षात येत राहतं. चमत्कार आणि साक्षात्कार यावर पुराणांची हजारो पाने खर्ची पडतात. साधाभोळा समाज या पुराणकथांच्या पूर्णपणे स्वाधीन होत राहिल्यामुळे भयाच्या स्वामित्वाचे हक्क आजही समाज राखून आहे. परंतु आजची नवी पिढी मात्र विज्ञानाच्या निकषावरून याकडे पाहू लागल्यामुळे हळूहळू का होईना भयमुक्त होत चाललेली आहे. माणसाच्या बेशुद्ध अवस्थेतल्या जगण्यावागण्यामुळेच संकटे निर्माण होत राहतात. भोळ्या भाबड्या परिवाराच्या अवतीभवती अनेक संकटे दबा धरून बसलेली असतात. परंतु बुद्धिमान, जागृत, शक्तिमान परिवाराच्या अवतीभवती मात्र एक विश्वासू शक्तीची आभा, वलय तयार झाल्यामुळे संकटे तिकडे फिरकण्याची शक्यता कमीच असते. धन आणि बुद्धी जिथे वास्तव्याला नसते तिथे अडचणींचा डोंगर प्रत्येकाच्या डोक्यावर जाऊन बसलेला असतो आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी भयग्रस्त समाजाला धार्मिक कर्मकांडाशिवाय दुसरा पर्यायच राहत नाही. त्यासाठी भयमुक्त होत गेल्यानेच या काल्पनिक कर्मकांडातून सुटका होऊ शकते. म्हणून भयाबद्दल द्वैत-अद्वैत यामागची विचारधारा समाजाने अभ्यासणे गरजेचे आहे आणि किमान सुखी होण्यासाठी संतांचे श्लोक, अभंग, फुले अक्षता न वाहता अभ्यासून मनाला, बुद्धीला सामर्थ्यवान बनविणे आजची गरज आहे. अन्यथा आपलेच भय आपल्याला संपविण्यास कारणीभूत ठरू शकेल.