शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

सुखी, समाधानी व्हायचंय?; विचारांचा उपवास करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 04:10 IST

मनामध्ये सतत विचारांचे वारे वाहत असतात, पण जर हे विचार नकारात्मक किंवा व्यर्थ असतील, तर त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर, तसेच जीवनावर ही होतो.

- ब्रह्मकुमारी नितामनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे. तो अनेकानेक सुख-सुविधांनी स्वत:ला संपन्न करण्यासाठी कार्यशील असतो. प्रत्येक जण संपन्नतेची इच्छा बाळगतो. या इच्छांना अंत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की, लगेच दुसरी जन्म घेते. कधी-कधी खूप कष्ट करून इच्छा पूर्ण केल्या जातात, तर काही ईश्वराच्या दारी पूर्ण व्हाव्या, अशी इच्छा असते. ईश्वराने त्या पूर्ण कराव्या, या अट्टहासापोटी आपण उपवास करतो. कधी सोळा सोमवार तर कधी अकरा मंगळवार, तर कधी आणि काही... खरंच असे उपवास करून आपल्या या इच्छा पूर्ण होऊ शकतात का? उपवास म्हणजे काय? तो कोणत्या प्रकारचा असावा, हे जाणून घेणे गरजेचे आहे.काही गोष्टी परंपरागत चालत आल्या. त्या आपण स्वीकारल्या. आजही काही श्रद्धाळू माणसे, उपवास म्हणजे काही खाद्यपदार्थ तसेच पेयाचा त्याग असेच समजतात. हे शरीर एक मशिन आहे. त्यालाही विश्रांतीची गरज आहे. जसे पिठाची गिरणीही आठवड्यातून एक दिवस बंद ठेवतात, तसेच आपल्या पोटालाही एक दिवस विश्रांती मिळावी, या हेतूने उपवास केला जायचा. जेणेकरून, या शरीररूपी मशिनचे ऑइलिंग आणि क्लिनिंग होऊ शकेल. मनोविज्ञानात सांगितले जाते की, जर एखाद्या गोष्टीवर सतत आपण लक्ष्य केंद्रित केले, तर ती गोष्ट मिळू शकते. ज्याला आपण संकल्पशक्ती असेसुद्धा म्हणू शकतो. आज थोडा वेळ काढून जर आपण आपल्या मनाची तपासणी केली, तर हे प्रकर्षाने जाणवते की, हे मन काही क्षणासाठीसुद्धा स्थिर राहत नाही. एकाग्रतेची कमतरता असल्याचे दिसून येते. मनामध्ये सतत विचारांचे वारे वाहत असतात, पण जर हे विचार नकारात्मक किंवा व्यर्थ असतील, तर त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर, तसेच जीवनावर ही होतो. जर स्वत:ला भाग्यशाली किंवा सुखी-समाधानी बनवू इच्छित असाल, तर विचारांचा उपवास करणे आवश्यक आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक