शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
5
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
7
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
8
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
9
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
10
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
11
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
12
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
13
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
14
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
15
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
16
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
17
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

सुखी, समाधानी व्हायचंय?; विचारांचा उपवास करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 04:10 IST

मनामध्ये सतत विचारांचे वारे वाहत असतात, पण जर हे विचार नकारात्मक किंवा व्यर्थ असतील, तर त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर, तसेच जीवनावर ही होतो.

- ब्रह्मकुमारी नितामनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे. तो अनेकानेक सुख-सुविधांनी स्वत:ला संपन्न करण्यासाठी कार्यशील असतो. प्रत्येक जण संपन्नतेची इच्छा बाळगतो. या इच्छांना अंत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की, लगेच दुसरी जन्म घेते. कधी-कधी खूप कष्ट करून इच्छा पूर्ण केल्या जातात, तर काही ईश्वराच्या दारी पूर्ण व्हाव्या, अशी इच्छा असते. ईश्वराने त्या पूर्ण कराव्या, या अट्टहासापोटी आपण उपवास करतो. कधी सोळा सोमवार तर कधी अकरा मंगळवार, तर कधी आणि काही... खरंच असे उपवास करून आपल्या या इच्छा पूर्ण होऊ शकतात का? उपवास म्हणजे काय? तो कोणत्या प्रकारचा असावा, हे जाणून घेणे गरजेचे आहे.काही गोष्टी परंपरागत चालत आल्या. त्या आपण स्वीकारल्या. आजही काही श्रद्धाळू माणसे, उपवास म्हणजे काही खाद्यपदार्थ तसेच पेयाचा त्याग असेच समजतात. हे शरीर एक मशिन आहे. त्यालाही विश्रांतीची गरज आहे. जसे पिठाची गिरणीही आठवड्यातून एक दिवस बंद ठेवतात, तसेच आपल्या पोटालाही एक दिवस विश्रांती मिळावी, या हेतूने उपवास केला जायचा. जेणेकरून, या शरीररूपी मशिनचे ऑइलिंग आणि क्लिनिंग होऊ शकेल. मनोविज्ञानात सांगितले जाते की, जर एखाद्या गोष्टीवर सतत आपण लक्ष्य केंद्रित केले, तर ती गोष्ट मिळू शकते. ज्याला आपण संकल्पशक्ती असेसुद्धा म्हणू शकतो. आज थोडा वेळ काढून जर आपण आपल्या मनाची तपासणी केली, तर हे प्रकर्षाने जाणवते की, हे मन काही क्षणासाठीसुद्धा स्थिर राहत नाही. एकाग्रतेची कमतरता असल्याचे दिसून येते. मनामध्ये सतत विचारांचे वारे वाहत असतात, पण जर हे विचार नकारात्मक किंवा व्यर्थ असतील, तर त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर, तसेच जीवनावर ही होतो. जर स्वत:ला भाग्यशाली किंवा सुखी-समाधानी बनवू इच्छित असाल, तर विचारांचा उपवास करणे आवश्यक आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक