शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

सुखी, समाधानी व्हायचंय?; विचारांचा उपवास करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 04:10 IST

मनामध्ये सतत विचारांचे वारे वाहत असतात, पण जर हे विचार नकारात्मक किंवा व्यर्थ असतील, तर त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर, तसेच जीवनावर ही होतो.

- ब्रह्मकुमारी नितामनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे. तो अनेकानेक सुख-सुविधांनी स्वत:ला संपन्न करण्यासाठी कार्यशील असतो. प्रत्येक जण संपन्नतेची इच्छा बाळगतो. या इच्छांना अंत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की, लगेच दुसरी जन्म घेते. कधी-कधी खूप कष्ट करून इच्छा पूर्ण केल्या जातात, तर काही ईश्वराच्या दारी पूर्ण व्हाव्या, अशी इच्छा असते. ईश्वराने त्या पूर्ण कराव्या, या अट्टहासापोटी आपण उपवास करतो. कधी सोळा सोमवार तर कधी अकरा मंगळवार, तर कधी आणि काही... खरंच असे उपवास करून आपल्या या इच्छा पूर्ण होऊ शकतात का? उपवास म्हणजे काय? तो कोणत्या प्रकारचा असावा, हे जाणून घेणे गरजेचे आहे.काही गोष्टी परंपरागत चालत आल्या. त्या आपण स्वीकारल्या. आजही काही श्रद्धाळू माणसे, उपवास म्हणजे काही खाद्यपदार्थ तसेच पेयाचा त्याग असेच समजतात. हे शरीर एक मशिन आहे. त्यालाही विश्रांतीची गरज आहे. जसे पिठाची गिरणीही आठवड्यातून एक दिवस बंद ठेवतात, तसेच आपल्या पोटालाही एक दिवस विश्रांती मिळावी, या हेतूने उपवास केला जायचा. जेणेकरून, या शरीररूपी मशिनचे ऑइलिंग आणि क्लिनिंग होऊ शकेल. मनोविज्ञानात सांगितले जाते की, जर एखाद्या गोष्टीवर सतत आपण लक्ष्य केंद्रित केले, तर ती गोष्ट मिळू शकते. ज्याला आपण संकल्पशक्ती असेसुद्धा म्हणू शकतो. आज थोडा वेळ काढून जर आपण आपल्या मनाची तपासणी केली, तर हे प्रकर्षाने जाणवते की, हे मन काही क्षणासाठीसुद्धा स्थिर राहत नाही. एकाग्रतेची कमतरता असल्याचे दिसून येते. मनामध्ये सतत विचारांचे वारे वाहत असतात, पण जर हे विचार नकारात्मक किंवा व्यर्थ असतील, तर त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर, तसेच जीवनावर ही होतो. जर स्वत:ला भाग्यशाली किंवा सुखी-समाधानी बनवू इच्छित असाल, तर विचारांचा उपवास करणे आवश्यक आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक