शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

सुखी, समाधानी व्हायचंय?; विचारांचा उपवास करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 04:10 IST

मनामध्ये सतत विचारांचे वारे वाहत असतात, पण जर हे विचार नकारात्मक किंवा व्यर्थ असतील, तर त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर, तसेच जीवनावर ही होतो.

- ब्रह्मकुमारी नितामनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे. तो अनेकानेक सुख-सुविधांनी स्वत:ला संपन्न करण्यासाठी कार्यशील असतो. प्रत्येक जण संपन्नतेची इच्छा बाळगतो. या इच्छांना अंत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की, लगेच दुसरी जन्म घेते. कधी-कधी खूप कष्ट करून इच्छा पूर्ण केल्या जातात, तर काही ईश्वराच्या दारी पूर्ण व्हाव्या, अशी इच्छा असते. ईश्वराने त्या पूर्ण कराव्या, या अट्टहासापोटी आपण उपवास करतो. कधी सोळा सोमवार तर कधी अकरा मंगळवार, तर कधी आणि काही... खरंच असे उपवास करून आपल्या या इच्छा पूर्ण होऊ शकतात का? उपवास म्हणजे काय? तो कोणत्या प्रकारचा असावा, हे जाणून घेणे गरजेचे आहे.काही गोष्टी परंपरागत चालत आल्या. त्या आपण स्वीकारल्या. आजही काही श्रद्धाळू माणसे, उपवास म्हणजे काही खाद्यपदार्थ तसेच पेयाचा त्याग असेच समजतात. हे शरीर एक मशिन आहे. त्यालाही विश्रांतीची गरज आहे. जसे पिठाची गिरणीही आठवड्यातून एक दिवस बंद ठेवतात, तसेच आपल्या पोटालाही एक दिवस विश्रांती मिळावी, या हेतूने उपवास केला जायचा. जेणेकरून, या शरीररूपी मशिनचे ऑइलिंग आणि क्लिनिंग होऊ शकेल. मनोविज्ञानात सांगितले जाते की, जर एखाद्या गोष्टीवर सतत आपण लक्ष्य केंद्रित केले, तर ती गोष्ट मिळू शकते. ज्याला आपण संकल्पशक्ती असेसुद्धा म्हणू शकतो. आज थोडा वेळ काढून जर आपण आपल्या मनाची तपासणी केली, तर हे प्रकर्षाने जाणवते की, हे मन काही क्षणासाठीसुद्धा स्थिर राहत नाही. एकाग्रतेची कमतरता असल्याचे दिसून येते. मनामध्ये सतत विचारांचे वारे वाहत असतात, पण जर हे विचार नकारात्मक किंवा व्यर्थ असतील, तर त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर, तसेच जीवनावर ही होतो. जर स्वत:ला भाग्यशाली किंवा सुखी-समाधानी बनवू इच्छित असाल, तर विचारांचा उपवास करणे आवश्यक आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक