शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
4
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
5
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
6
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
7
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
8
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
9
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
10
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
11
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
12
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
13
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
14
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
15
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
16
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
17
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
18
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
19
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
20
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा आत्महत्या नको...तू फक्त विश्वास ठेव पिकेल धरणी माय !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 14:10 IST

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी मानवी देहाला आलो तर, सत्कर्म करीत जगा. इतर देहात फक्त आहार निद्रा, भय ,आणि मैथून ...

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी

मानवी देहाला आलो तर, सत्कर्म करीत जगा. इतर देहात फक्त आहार निद्रा, भय ,आणि मैथून एवढाच विचार आहे. परंतु मानवी देहात सत्कर्म करीत देहातून देवा पर्यंत जाता येते. असे. मानवाचा  दुर्लभ आहे. पाप पुण्याचे पारडे समसमान होते, त्यावेळी मनुष्य जन्म प्राप्त होतो.

प.पू. पारनेरकर महाराज म्हणाले -जगावे जगावे नेटाने जगावे.. मरावे मरावे हितालागी..!

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात -आता तरी पुढे हाचि उपदेश.. नका करु नाश आयुष्याचा..! 

ही संतवचने माणसाला  जगण्याची प्रेरणा देतात. जगतांना सत्कर्म करण्याचा उपदेश करतात. आजश शेतकरीकर्जबाजारी होतो, एवढ्या क्षुल्लक कारणासाठी  सोन्यापेक्षाही मूल्यवान असणारा मनुष्य देह अविवेकानेनष्ट करतो. खरं तर, अध्यात्म  शास्त्रात असं सांगितलं आहे की -

आत्महत्येसारखं दुसरं पाप नाही. या पापातून मुक्त होता येत नाही. तो अतृप्त आत्मा त्याच देहात भरकटत राहतो. त्याला गती नाही. आपण मात्र अविचाराने हे पाप करत असतो. एक माणूस सोडून दिला तर, कुठलाही प्राणी कधीच आत्महत्या करीत नाही. वादळी वारे येते, कधी जल प्रलय होतो, अशा आपत्तीत कोणता प्राणी जीवन संपवतो..?                 

घरटे उडते वादळात.. वारुळात पाणी शिरते..!कोणती मुंगी, कोणते पाखरु सांगा आत्महत्या करते..? निर्धाराने जिंकू आपण.. पुन्हा यशाचा गड..!

कुणीही आत्महत्या करू नका. हा सोन्यापेक्षाही मूल्यवान असणारा मनुष्य देह अविवेकाने नष्ट करू नका. हा देह परत मिळणार नाही. आलेले दिवस निघून जातील, धरणी माता परत पिकेल, फुलेल पण गेलेला देह पुन्हा मिळेल का...? त्यामुळे विवेकाने जगा...!

समर्थ रामदास स्वामी म्हणतात -जीवनाचे सार विवेक विचार. दुजा आविष्कार नाही काही.!

संतांनी आम्हाला आनंदाने जगण्याचा मूलमंत्र शिकवला.     

निर्धाराच्या वाटेवर.. टाक निर्भीडपणे पाय..!तू फक्त विश्वास ठेव पिकेल धरणी माय!! 

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत.) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक