शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

बळीराजा आत्महत्या नको...तू फक्त विश्वास ठेव पिकेल धरणी माय !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 14:10 IST

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी मानवी देहाला आलो तर, सत्कर्म करीत जगा. इतर देहात फक्त आहार निद्रा, भय ,आणि मैथून ...

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी

मानवी देहाला आलो तर, सत्कर्म करीत जगा. इतर देहात फक्त आहार निद्रा, भय ,आणि मैथून एवढाच विचार आहे. परंतु मानवी देहात सत्कर्म करीत देहातून देवा पर्यंत जाता येते. असे. मानवाचा  दुर्लभ आहे. पाप पुण्याचे पारडे समसमान होते, त्यावेळी मनुष्य जन्म प्राप्त होतो.

प.पू. पारनेरकर महाराज म्हणाले -जगावे जगावे नेटाने जगावे.. मरावे मरावे हितालागी..!

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात -आता तरी पुढे हाचि उपदेश.. नका करु नाश आयुष्याचा..! 

ही संतवचने माणसाला  जगण्याची प्रेरणा देतात. जगतांना सत्कर्म करण्याचा उपदेश करतात. आजश शेतकरीकर्जबाजारी होतो, एवढ्या क्षुल्लक कारणासाठी  सोन्यापेक्षाही मूल्यवान असणारा मनुष्य देह अविवेकानेनष्ट करतो. खरं तर, अध्यात्म  शास्त्रात असं सांगितलं आहे की -

आत्महत्येसारखं दुसरं पाप नाही. या पापातून मुक्त होता येत नाही. तो अतृप्त आत्मा त्याच देहात भरकटत राहतो. त्याला गती नाही. आपण मात्र अविचाराने हे पाप करत असतो. एक माणूस सोडून दिला तर, कुठलाही प्राणी कधीच आत्महत्या करीत नाही. वादळी वारे येते, कधी जल प्रलय होतो, अशा आपत्तीत कोणता प्राणी जीवन संपवतो..?                 

घरटे उडते वादळात.. वारुळात पाणी शिरते..!कोणती मुंगी, कोणते पाखरु सांगा आत्महत्या करते..? निर्धाराने जिंकू आपण.. पुन्हा यशाचा गड..!

कुणीही आत्महत्या करू नका. हा सोन्यापेक्षाही मूल्यवान असणारा मनुष्य देह अविवेकाने नष्ट करू नका. हा देह परत मिळणार नाही. आलेले दिवस निघून जातील, धरणी माता परत पिकेल, फुलेल पण गेलेला देह पुन्हा मिळेल का...? त्यामुळे विवेकाने जगा...!

समर्थ रामदास स्वामी म्हणतात -जीवनाचे सार विवेक विचार. दुजा आविष्कार नाही काही.!

संतांनी आम्हाला आनंदाने जगण्याचा मूलमंत्र शिकवला.     

निर्धाराच्या वाटेवर.. टाक निर्भीडपणे पाय..!तू फक्त विश्वास ठेव पिकेल धरणी माय!! 

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत.) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक