शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

आनंदाचे उद्गार चिन्ह!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 22:09 IST

काही वर्षांपूर्वी एक अप्रतिम हिंदी चित्रपट येऊन गेला होता. त्याची मध्यवर्ती कल्पनाच होती ‘आनंद’.

- रमेश सप्रे

काही वर्षांपूर्वी एक अप्रतिम हिंदी चित्रपट येऊन गेला होता. त्याची मध्यवर्ती कल्पनाच होती ‘आनंद’. तेच त्या चित्रपटाचं नावही होतं. जीवनातील कोणत्याही गोष्टीचा आनंदानं स्वीकार हा संदेश तर त्यात होताच; पण जीवन जसं आपल्याला शोधत येईल, आपल्या भेटीला येईल तसा त्याचा स्वीकार हाही महत्त्वाचा. इंग्रजीत म्हटलंय ना ‘मीट लाईफ अ‍ॅज इट सिक्स यू’ कशाबद्दल म्हणजे अगदी कशबद्दल तक्रार न करणारी व्यक्ती आनंदी असते. ‘आनंद’ चित्रपटातील एक मार्मिक प्रसंग पाहू या.

आनंदचा डॉक्टर मित्र त्याच्या रक्त वगैरेच्या तपासण्यांचे रिपोर्टस पाहून गंभीर होतो. ते पाहून आनंद विचारतो, ‘मला काय झालंय?’ डॉक्टर सांगतो. ‘कॅन्सर!’

आनंद यावर हसत म्हणतो, ‘शक्यच नाही. एवढा छोटा रोग मला होणं शक्यच नाही. याच्यापेक्षा इन्फ्लूएंझा-टायफाईड हे रोग मोठे वाटतात. डॉक्टर, तुझ्या भाषेत सांग माझ्या रोगाचं नाव.’ यावर डॉक्टरचं उत्तर ‘लिंफोसर्कोमा आॅफ् द इंटेस्टाईन (आतड्याचा कर्करोग)’ हे ऐकून टाळी वाजवत आनंद म्हणतो ‘ये हुई ना बात! कैसा किंगसाईज रोग है!’

काय वृत्ती आहे ही! मूर्तीमंत आनंद! ही सारी उद्गारचिन्हं पाहून एक विचार मनात आला की आनंदाचं विरामचिन्ह कोणतं? पूर्णविराम नाहीच. कारण आनंद सततच उसळत असतो. स्वल्पविरामही नाही. कारण आनंदाचे तुकडे पाडता येत नाहीत. प्रश्चचिन्हही नाही. आनंदाचं विरामचिन्ह उद्गारवाचकच असतं. निसर्गातल्या सूक्ष्म जीवांपासून महाकाय प्राण्यापर्यंत, जीवनातल्या लहान घटनेपासून महान घटनेपर्यंत, बदलणाऱ्या ऋतूतील प्रत्येक दृश्यात मग तो कोसळून चिंब भिजणारा पाऊस असो किंवा नयनमनोहर इंद्रधनुष्य असो, अंधाºया रात्री आकाशात चमचमणारे असंख्य तारे असोत की सर्द थंडीतलं आंधळं बनवणारं धुकं असो साºया अनुभवात दडलेला असतो एक उद्गार... तो आनंदाचाच असतो; पण त्यासाठी आपण संवेदनाक्षम असायला हवं.

लहान मुलं आनंदाच्या मूर्ती असतात. असं म्हणतात की लहान मुलं स्वर्गीय आनंदाचा उपभोग घेत असतात कारण त्यांच्या अवतीभवतीच स्वर्ग पसरलेला असतो. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची जिवंत जिज्ञासा आणि कधीही न कोमेजणारं कुतूहल. लहान मुलं विचारत असलेल्या असंख्य प्रश्नात त्यांची केवळ ज्ञान मिळवण्याची इच्छा नसते तर आजूबाजूच्या अनेक गोष्टीत दडलेल्या रहस्याचं अनावरण झालेलं त्यांना हवं असतं. यात वैचारिक, वैज्ञानिक संशोधनापेक्षा गुपितांच्या शोधातून मिळणारा आनंद असतो.

असं बालमन आपल्याला मिळालं तर आनंद सागरावर अखंड पोहत राहणं अवघड नाही. यालाच म्हणतात ‘प्रौढत्वी निजशैशवास जपणं’ म्हणजेच वय वाढलं तरी आपल्या आतलं लहान मूल जिवंत ठेवायचं. गंमत म्हणजे बालपणी जी कल्पनाशक्ती मनाच्या मोकळ्या आकाशात आनंदाचा प्रकाश भरून टाकते तीच कल्पनाशक्ती मोठेपणी चिंता-काळजीचं ग्रहण आनंदाला लावते. याला जबाबदार आपणच या कल्पनाशक्तीला विचारशक्तीची त्याहूनही विवेकाची जोड दिली तर संसारसागर तरुण जाणं अगदी सुलभ होतं. ज्ञानोबा माउलीची एक प्रसिद्ध ओवी आहे.

मज हृदयी सद्गुरु। जेणे तारिलो हा संसारपूरु।म्हणोनि विशेषे अत्यादरु। विवेकावरी।।

संसारात घडणाºया घटना या भवसागरावरच्या लाटा समजल्या तर त्या तरुन जाण्यासाठी तारून नेणारा (भवतारक) सद्गुरु आपल्याला विवेकशक्ती देतो. त्यामुळे प्रत्येक घटनाप्रसंगाचा सकारात्मक अर्थ लावता येतो आणि आनंदाचा अक्षय अनुभव घेता येतो.कवयित्री बहिणाबाई चौधरींचे सुपुत्र सोपानदेव चौधरी. यांच्या जीवनातला एक हृद्य प्रसंग आपल्याला आनंदाचं सूत्र सांगून अंतर्मुख करतो. त्यांना जेव्हा कॅन्सर झाल्याचं डॉक्टर सांगतात तेव्हा ते आनंदानं उद्गारतात कॅन्सर! म्हणजे नो आन्सर! (कॅन्सरला उत्तर नाही. उपाय नाही) ज्यावेळी डॉक्टर रक्ताचा कॅन्सर (ल्युकेमिया) झालाय म्हणून सांगतात तेव्हा सोपानदेवांचे हजरजबाबी उद्गार असतात. ‘रक्ताचा कॅन्सर! व्वा! जीवन म्हणतंय आता तरी विरक्त व्हा!’ कमालीची आनंदी वृत्ती आहे ना ही!

एकूण काय आनंद मिळवणं, आनंदी राहणं बिल्कुल अवघड नाही. अवघड आहे ती आनंद मिळवण्यासाठी आवश्यक ती दृष्टी नि वृत्ती. एकदा हे जमलं की आपली नि इतरांची प्रत्येक कृती आनंदाची खाण बनून जाईल. यासाठी हवं सद्ग्रंथांचे वाचन-मनन नि चिंतन. तसंच सदाचरण नि त्याला पूरक पोषक सत्संगती. म्हटलं तर हे आपल्याला सहज शक्य आहे नाही?

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक