शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

पहाटेची निरामय शांतता जगण्याला ऊर्जा देते

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 09:15 IST

विचार करायच्या सवयीने दिवस उजाडतो ही खरी पहाट आहे. पहाटेचे ताजेपण आनंद देते.

विचार करायच्या सवयीने दिवस उजाडतो ही खरी पहाट आहे. पहाटेचे ताजेपण आनंद देते. पहाटेची सुरुवात अनुभवणे ही एक आत्मस्फूर्ती ऊर्जा असते. ती शब्दात मांडता येत नाही. पक्ष्यांची किलबिल मनाला प्रसन्न करते. मनाचा ताजेतवाणा अनुभवणे ही एक आत्मानंदाची पर्वणीच होय. त्यावेळेस आपला अनुभव आकाशाशी एकरूप होतो. आपणच आपल्या अनुभवांना साद घालतो. स्वात्मसुखाच्या वाटा शोधतो. त्या उजळून निघाल्यासारख्या वाटतात. अरुणोदयाने कर्तृत्वाच्या प्रकाशवाटा उजाडतात. पहाटेच्या वातावरणात अखंड चैतन्याच्या लहरी असतात.

त्या सर्वांना आनंद देतात. पहाटेच्या चिंतनातून आपल्या जगण्याला बळ मिळते. मनातले संकल्प, विकल्प पारखता येतात, योग्य कार्याची निवड करता येते. त्यामुळे क्रियात्मक शक्तीला वजन लाभते. मनात निरपेक्ष आनंदाची पहाट निर्माण होते. मनात सत्यनिष्ठा वाढते. विवेकातली सत्कृती जागृत होते. म्हणून संतांनी पहाटेच्या काकड आरतीला विशेष महत्त्व दिले. पहाटेच्या मांगल्याप्रसंगी आत्मरंग पालटून जाते. क्षणभरासाठी का होईना दु:ख विसरून जातो. त्यावेळेस मनाला अलभ्य लाभ होतो. मनाचा ताजेपणा पहाटेच्या सुरात असतो. अमृतानुभव मांडता येतो. मनाला सौंदर्याची मोहर घालता येते. मन प्रफुल्लित होते. स्वात्मसाधनेला बळकटी येते. मनाचा हिरवेगारपणा त्यातून दिसतो. प्रसन्नतेची पहाट उजाडली जाते.

त्या पहाटेच्या अमृतवलयात आपण न्हाऊन निघतो. मनाला लाभत असलेली निरामय शांतता आपल्या जगण्याला ऊर्जा देते. पहाटेच्या कुशीत दु:ख रात्रींनी वेढलेल्या मनात सुखाचा मोहर फुटतो. त्यात आपण बागडतो. निसर्गाशी एकरूप होतो. अखंड चैतन्याचा अनुभव घेतो. मग सत्वर उच्चार अंगी येतो, जगणे अर्थपूर्ण होते. त्या अनुभवांशी आपली मैत्री घट होते. तो अनुभव कधी मिटत नाही, शिळा होत नाही. अखंड शब्दांच्या चैतन्यात तो स्फुरण पावतो, त्यातून त्याच्या अंगी आत्मचिंतनाचे बळ येते. अभ्यासाची पहाट उजाडते. सत्कर्माचे द्वार खुले होते. मन ताळ्यावर येते. मनातले दुर्गुण नाहीसे होतात. अंत:करणात बदल घडतो. सत्कर्म घडू लागते. त्यामुळे आपल्या जाणिवांची खोली लक्षात येते. वृत्ती विश्वात्मक बनू लागते. मनाला सत्कर्माचा पोत समजतो. पहाटेची आनंदमयी ऊर्जा सकारात्मकता वाढवते. खरंच विचारांची पहाट अनुभवास येते.डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)