शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

स्वामी विवेकानंदजींचा प्रभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 01:53 IST

विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका यांची स्वामी विवेकानंद यांच्यावर नितांत श्रद्धा होती़ गोएंका म्हणतात, स्वामी विवेकानंद यांनी आपल्या जीवनाच्या अंतिम दिवसातील काही दिवस बोधगयातील बोधीवृक्षाखाली ध्यान केले होते़ त्यांनी बोधीवृक्षाखाली कोणती साधना केली हे माहिती नाही.

- फरेदुन भुजवाला

विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका यांची स्वामी विवेकानंद यांच्यावर नितांत श्रद्धा होती़ गोएंका म्हणतात, स्वामी विवेकानंद यांनी आपल्या जीवनाच्या अंतिम दिवसातील काही दिवस बोधगयातील बोधीवृक्षाखाली ध्यान केले होते़ त्यांनी बोधीवृक्षाखाली कोणती साधना केली हे माहिती नाही. मात्र त्यांनी विपश्यना केली नव्हती़ कारण तेव्हा भारतात विपश्यनेचे पुनरागमन झाले नव्हते़ तरीही भगवान गौतम बुद्ध यांचे स्वामी विवेकानंद यांनी अगदी सुंदर शब्दात वर्णन केले आहे़ स्वामी विवेकानंद म्हणतात, एक हजार वर्षांपर्यंत ज्या विशाल तरंगांनी संपूर्ण भारताला सिंचित केले होते, त्याच्या सर्वाेच्च शिखरावर एक आणखी महामहीम मूर्तीला पाहतो, ते आमचे शाक्य मुनी गौतम आहेत़ बुद्ध संसारात श्रेष्ठ चरित्रवान व्यक्ती आहे़ नैतिकतेचा एवढा मोठा साहसी प्रचारक संसारात पुन्हा उत्पन्न झाला नाही़ तो बुद्ध होता, ज्याच्याजवळ अभीष्ट मस्तिष्क, अभीष्ट शक्ती आणि विस्तीर्ण आकाशाएवढे अभीष्ट ह्रदय होते़ भगवान कर्मयोगाचे ज्वलंत आदर्श स्वरूप होते आणि ते ज्या उच्च अवस्थेला पोहोचले होते, त्यावरून असे ज्ञात होते की कर्मशक्तीद्वारा आम्ही सुद्धा उच्चतम आध्यात्मिक स्थिती प्रात्प करू शकतो़ असे अनेक महापुरूष होते जे स्वत:ला ईश्वराचे अवतार म्हणत होते आणि विश्वास देत होते की जे त्यांच्यावर श्रद्धा ठेवतील ते स्वर्ग प्रात्प करू शकतील़ पण बुद्धांच्या ओठावर अंतिम क्षणापर्यंत हेच शब्द होते, आपली उन्नती आपल्याच प्रयत्नाने होईल़ दुसरा कोणी त्यामध्ये तुमचा सहायक होऊ शकत नाही़ स्वत: आपली मुक्ती प्रात्प करा़ स्वामी विवेकांनद यांचे भगवान गौतम बुद्ध यांच्याविषयी असे गौरवउद्गार असले तरी याबाबत गोएंका म्हणतात, एवढे सर्व असूनही विवेकांनद यांच्या उपदेशात कोठे काही चूक होती, कोठे काही कमी होती, ज्यामुळेच विवेकानंद यांना म्हणावे लागले, मी बुद्धांचा भक्त राहिलो़ पण त्यांच्या सिद्धांताचा नाही़

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक