शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 7

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:32 IST

शास्त्रज्ञांची दुर्बिण जसजशी मोठी मोठी होत आहे तसतसे त्यांना हे विश्व किती अफाट व अचाट आहे त्याची जाणिव होते आहे.अनंत कोटी ब्रम्हांडात जिथे आपल्या पृथ्वीला स्थान नाही तिथे आपल्या मुंबईला काय स्थान असणार?

- सदगुरू श्री वामनराव पैअचूक मार्गदर्शन मिळण्यासाठी भाग्य लागतेशास्त्रज्ञांची दुर्बिण जसजशी मोठी मोठी होत आहे तसतसे त्यांना हे विश्व किती अफाट व अचाट आहे त्याची जाणिव होते आहे. अनंत कोटी ब्रम्हांडात जिथे आपल्या पृथ्वीला स्थान नाही तिथे आपल्या मुंबईला काय स्थान असणार? त्या मुंबईत रहाणा-या माणसाला काय स्थान असणार? व त्याने केलेल्या कुठल्यातरी नवसाची देवाला काय किंमत असणार? लोक उपवास करतात तेव्हा आम्ही त्यांना सांगतो अरे उपवास कशाला करता? तर ते म्हणतात, “उपवास केला नाहीतर देवाचा कोप होईल” अरे देवाला काय पडले आहे तू उपवास कर नाहीतर चार वेळा जेव.नाहीतर निर्जळी उपवास करतात.लोकांचा एक समज झालेला आहे की आपण उपवास केला नाहीतर देवाचा कोप होईळ, देवाचा रोष होईल आणि हे वारंवार बजावून सांगणारे लोक देखील समजामध्ये आहेत.बुवाबाबा, काही महाराज, देवऋषी हे या लोकांना या गोष्टी बजावून सांगतात.त्यामुळे लोक आज या भितीने ग्रस्त झालेले आहेत.आज लोकांसमोर इतक्या समस्या आहेत, इतके प्रश्न आहेत, इतकी संकटे आहेत की त्यातून बाहेर कसे पडायचे हे लोकांना समजत नाही व त्यांना अचूक मार्गादर्शन कुणीच करत नाही.आग लागलेली आहे रामेश्वरी व बंब चाललेले आहेत सोमेश्वरी असा प्रकार आज होतो आहे.रोग झालेला आहे रेडयाला व इंजेक्शन देतात पखालीला असे केले तर रेडा कसा बरा होणार? दु:ख माणसाच्या वाटयाला का येते याचा जर आपण विचार केला तर माणसावर जे संस्कार झालेले आहेत त्या संस्कारांचा पगडा इतका माणसाच्या मनावर घट्ट झाला आहे की तो  त्यामुळे भितीग्रस्त झालेला आहे.त्यात परिस्थिती देखील फार भयानक आहे.परिस्थिती भयानक होण्याची कारणे देखील मी सांगितली.याचे पहिले कारण म्हणजे लोकसंख्येमध्ये वाढ, दुसरे कारण भ्रष्टाचार, तिसरे कारण रोगराई, चौथे कारण दारिद्रय व या सर्वातून बाहेर पडण्यासाठी अचूक मार्गदर्शन करणारे लोक आज दुर्मिळ झालेले आहेत.खरंतर अचूक मार्गदर्शन मिळण्यासाठी भाग्य लागते.अरे बाबा, तुझ्या दु:खाला कारण तूच आहेस  अन्य कुणीही नाही.तुझ्या सुखाला कारण तूच आहेस अन्य कुणी नाही. हे तू लक्षांत घेशील, तू परिक्षण करशील, निरीक्षण करशील, विश्लेषण करशील| तर तुला माझ्यात काय दोष आहेत, ही परिस्थिती माझ्यावर का आली, कशामुळे माझ्या जीवनांत प्राब्लेम्स निर्माण होतात हे तुझ्या लक्षात येईल.“पहावे आपणासी आपण” हा परमार्थातला विषय मी आता सांगत नाही कारण तो फार गहन आहे.साध्या जीवनात देखील माणसे आपल्यात काय देाष आहेत,आपल्यात गुण काय आहेत याचा विचार करीत नाहीत.माणसे इतरांचा विचार करतात,इतरांचे गुण काय, दोष काय याचे चांगले विश्लेषण करतील पण आपल्या गुणदोषांकडे कधी पहातच नाहीत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात “कासयासी वानू आणिकांचे दोष मज उणे काय कमी असे”|