शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 7

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:32 IST

शास्त्रज्ञांची दुर्बिण जसजशी मोठी मोठी होत आहे तसतसे त्यांना हे विश्व किती अफाट व अचाट आहे त्याची जाणिव होते आहे.अनंत कोटी ब्रम्हांडात जिथे आपल्या पृथ्वीला स्थान नाही तिथे आपल्या मुंबईला काय स्थान असणार?

- सदगुरू श्री वामनराव पैअचूक मार्गदर्शन मिळण्यासाठी भाग्य लागतेशास्त्रज्ञांची दुर्बिण जसजशी मोठी मोठी होत आहे तसतसे त्यांना हे विश्व किती अफाट व अचाट आहे त्याची जाणिव होते आहे. अनंत कोटी ब्रम्हांडात जिथे आपल्या पृथ्वीला स्थान नाही तिथे आपल्या मुंबईला काय स्थान असणार? त्या मुंबईत रहाणा-या माणसाला काय स्थान असणार? व त्याने केलेल्या कुठल्यातरी नवसाची देवाला काय किंमत असणार? लोक उपवास करतात तेव्हा आम्ही त्यांना सांगतो अरे उपवास कशाला करता? तर ते म्हणतात, “उपवास केला नाहीतर देवाचा कोप होईल” अरे देवाला काय पडले आहे तू उपवास कर नाहीतर चार वेळा जेव.नाहीतर निर्जळी उपवास करतात.लोकांचा एक समज झालेला आहे की आपण उपवास केला नाहीतर देवाचा कोप होईळ, देवाचा रोष होईल आणि हे वारंवार बजावून सांगणारे लोक देखील समजामध्ये आहेत.बुवाबाबा, काही महाराज, देवऋषी हे या लोकांना या गोष्टी बजावून सांगतात.त्यामुळे लोक आज या भितीने ग्रस्त झालेले आहेत.आज लोकांसमोर इतक्या समस्या आहेत, इतके प्रश्न आहेत, इतकी संकटे आहेत की त्यातून बाहेर कसे पडायचे हे लोकांना समजत नाही व त्यांना अचूक मार्गादर्शन कुणीच करत नाही.आग लागलेली आहे रामेश्वरी व बंब चाललेले आहेत सोमेश्वरी असा प्रकार आज होतो आहे.रोग झालेला आहे रेडयाला व इंजेक्शन देतात पखालीला असे केले तर रेडा कसा बरा होणार? दु:ख माणसाच्या वाटयाला का येते याचा जर आपण विचार केला तर माणसावर जे संस्कार झालेले आहेत त्या संस्कारांचा पगडा इतका माणसाच्या मनावर घट्ट झाला आहे की तो  त्यामुळे भितीग्रस्त झालेला आहे.त्यात परिस्थिती देखील फार भयानक आहे.परिस्थिती भयानक होण्याची कारणे देखील मी सांगितली.याचे पहिले कारण म्हणजे लोकसंख्येमध्ये वाढ, दुसरे कारण भ्रष्टाचार, तिसरे कारण रोगराई, चौथे कारण दारिद्रय व या सर्वातून बाहेर पडण्यासाठी अचूक मार्गदर्शन करणारे लोक आज दुर्मिळ झालेले आहेत.खरंतर अचूक मार्गदर्शन मिळण्यासाठी भाग्य लागते.अरे बाबा, तुझ्या दु:खाला कारण तूच आहेस  अन्य कुणीही नाही.तुझ्या सुखाला कारण तूच आहेस अन्य कुणी नाही. हे तू लक्षांत घेशील, तू परिक्षण करशील, निरीक्षण करशील, विश्लेषण करशील| तर तुला माझ्यात काय दोष आहेत, ही परिस्थिती माझ्यावर का आली, कशामुळे माझ्या जीवनांत प्राब्लेम्स निर्माण होतात हे तुझ्या लक्षात येईल.“पहावे आपणासी आपण” हा परमार्थातला विषय मी आता सांगत नाही कारण तो फार गहन आहे.साध्या जीवनात देखील माणसे आपल्यात काय देाष आहेत,आपल्यात गुण काय आहेत याचा विचार करीत नाहीत.माणसे इतरांचा विचार करतात,इतरांचे गुण काय, दोष काय याचे चांगले विश्लेषण करतील पण आपल्या गुणदोषांकडे कधी पहातच नाहीत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात “कासयासी वानू आणिकांचे दोष मज उणे काय कमी असे”|