शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 3

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:14 IST

दारिद्रय हे आपल्या देशात कमालीचे आहे. घरोघरी जीवनविद्या जावी व लोक सुखी व्हावेत ही आमच्या जीवनविद्या मिशनचे ध्येय तर घरोघरी दारू पोहचली जावी व सर्व लोक दारू पिणारे व्हावेत हे दारूबाज तळीरामांचे ध्येय असते.

- सदगुरू श्री वामनराव पैदारिद्रय हे आपल्या देशात कमालीचे आहे. घरोघरी जीवनविद्या जावी व लोक सुखी व्हावेत ही आमच्या जीवनविद्या मिशनचे ध्येय तर घरोघरी दारू पोहचली जावी व सर्व लोक दारू पिणारे व्हावेत हे दारूबाज तळीरामांचे ध्येय असते. गंमत अशी की जे गडक-यांनी विनोदाने लिहिले ती आज वस्तुस्थिती झालेली आहे.नाटक सिनेमामध्ये दारूला फार प्रतिष्ठा देण्यात येत आहे. टीव्हीवर मी एक नाटक पाहिले त्यांत दारू पिताना तो अभिनेता एका पेगने काय होते आहे असे म्हणतो व त्याला इतर देखील दुजोरा देतात.ही गोष्ट किती भयानक आहे याची जाणिव लोकांना आज नाही.ज्यांना खायला अन्न मिळत नाही,रहायला घर नाही ज्यांना शिक्षण मिळत नाही व ज्यांना वैद्यकिय मदत मिळत नाही ती मंडळी जीवनात खरेच दु:खी आहेत असे मी म्हणेन.खरी दु:खी कोण तर ही मंडळी खरी दु:खी आहेत.त्यांच्या दु:खाचे कारण म्हणजे दारिद्रय.हे दारिद्रय का आले हे आपण नंतर  पूढे पाहूया.दारिद्रय हे आपल्या देशात कमालीचे आहे.कोटयावधी माणसे आज जेमतेम एक वेळ जेवून जगतात.अर्थात हयाला कोण जबाबदार आहे? तर याला हयाला माणसे जबाबदार आहेत तसे सरकार देखील जबाबदार आहे.ही माणसे का जबाबदार आहेत तर लोकसंख्या किती वाढवायची.चीनची लोकसंख्या आज आपल्यापेक्षा जास्त आहे पण थोडयाच दिवसांत आपण चीनच्या पुढे जावू असे सांगितले जात आहे.नको त्या बाबतीत आपण पुढे जात आहोत.मी हे सर्व का सांगतो आहे.तर चीनमध्ये एका मुलापेक्षा जास्त मुले होऊ नयेत असा त्यांनी कायदाच केलेला आहे.एकापेक्षा जास्त मुले झाली तर त्यांच्या सवलती काढून घेतल्या जातात.सांगायचा मुद्दा आपल्या देशात असे होत नाही.आपल्याकडे हे बोलण्याचे धाडस देखील कुणी करीत नाही.कायदा करण्याचे तर सोडाच पण हा विषय काढण्याचे धाडस भल्याभल्यांमध्ये नाही.तुम्हांला जर मुलांना पोसता येत नाही तरी तुम्ही त्यांना जन्माला घालता याला जबाबदार कोण.मग आम्ही म्हणतो ही माणसे दरिद्री आहेत पण हयाला जबाबदार तीच माणसे आहेत.ही परिस्थिती ज्यांनी ओढवून आणली व ज्यांच्यामुळे ओढवली गेली हे दोघेही गुन्हेगार आहेत.तुम्ही मुलांना जन्म दिलात मग त्यांचे लालनपालन शिक्षण संवर्धन या सर्व गोष्टींची जबाबदारी देखील तुमचीच आहे.हे तुम्हांला करता येत असेल तर तुम्ही मुलांना जन्म द्या व हे करता येत नसेल आणि जर तरिही तुम्ही त्यांना जन्म दिला तर ती मुले उद्या तुम्हांला दोष देतील.मुलांना जर जन्म द्यायचा असेल तर त्यांचे लालनपालन शिक्षण सर्व तुम्हांला करता आले पाहिजे तरच त्यांना जन्म द्या अन्यथा मुलांना जन्म न दिलेला बरा असे आमचे स्पष्ट मत आहे.