शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
2
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
3
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
4
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
5
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
6
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
7
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
8
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
9
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
10
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
12
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
13
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
14
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
15
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
16
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
17
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
18
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
19
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
20
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 3

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:14 IST

दारिद्रय हे आपल्या देशात कमालीचे आहे. घरोघरी जीवनविद्या जावी व लोक सुखी व्हावेत ही आमच्या जीवनविद्या मिशनचे ध्येय तर घरोघरी दारू पोहचली जावी व सर्व लोक दारू पिणारे व्हावेत हे दारूबाज तळीरामांचे ध्येय असते.

- सदगुरू श्री वामनराव पैदारिद्रय हे आपल्या देशात कमालीचे आहे. घरोघरी जीवनविद्या जावी व लोक सुखी व्हावेत ही आमच्या जीवनविद्या मिशनचे ध्येय तर घरोघरी दारू पोहचली जावी व सर्व लोक दारू पिणारे व्हावेत हे दारूबाज तळीरामांचे ध्येय असते. गंमत अशी की जे गडक-यांनी विनोदाने लिहिले ती आज वस्तुस्थिती झालेली आहे.नाटक सिनेमामध्ये दारूला फार प्रतिष्ठा देण्यात येत आहे. टीव्हीवर मी एक नाटक पाहिले त्यांत दारू पिताना तो अभिनेता एका पेगने काय होते आहे असे म्हणतो व त्याला इतर देखील दुजोरा देतात.ही गोष्ट किती भयानक आहे याची जाणिव लोकांना आज नाही.ज्यांना खायला अन्न मिळत नाही,रहायला घर नाही ज्यांना शिक्षण मिळत नाही व ज्यांना वैद्यकिय मदत मिळत नाही ती मंडळी जीवनात खरेच दु:खी आहेत असे मी म्हणेन.खरी दु:खी कोण तर ही मंडळी खरी दु:खी आहेत.त्यांच्या दु:खाचे कारण म्हणजे दारिद्रय.हे दारिद्रय का आले हे आपण नंतर  पूढे पाहूया.दारिद्रय हे आपल्या देशात कमालीचे आहे.कोटयावधी माणसे आज जेमतेम एक वेळ जेवून जगतात.अर्थात हयाला कोण जबाबदार आहे? तर याला हयाला माणसे जबाबदार आहेत तसे सरकार देखील जबाबदार आहे.ही माणसे का जबाबदार आहेत तर लोकसंख्या किती वाढवायची.चीनची लोकसंख्या आज आपल्यापेक्षा जास्त आहे पण थोडयाच दिवसांत आपण चीनच्या पुढे जावू असे सांगितले जात आहे.नको त्या बाबतीत आपण पुढे जात आहोत.मी हे सर्व का सांगतो आहे.तर चीनमध्ये एका मुलापेक्षा जास्त मुले होऊ नयेत असा त्यांनी कायदाच केलेला आहे.एकापेक्षा जास्त मुले झाली तर त्यांच्या सवलती काढून घेतल्या जातात.सांगायचा मुद्दा आपल्या देशात असे होत नाही.आपल्याकडे हे बोलण्याचे धाडस देखील कुणी करीत नाही.कायदा करण्याचे तर सोडाच पण हा विषय काढण्याचे धाडस भल्याभल्यांमध्ये नाही.तुम्हांला जर मुलांना पोसता येत नाही तरी तुम्ही त्यांना जन्माला घालता याला जबाबदार कोण.मग आम्ही म्हणतो ही माणसे दरिद्री आहेत पण हयाला जबाबदार तीच माणसे आहेत.ही परिस्थिती ज्यांनी ओढवून आणली व ज्यांच्यामुळे ओढवली गेली हे दोघेही गुन्हेगार आहेत.तुम्ही मुलांना जन्म दिलात मग त्यांचे लालनपालन शिक्षण संवर्धन या सर्व गोष्टींची जबाबदारी देखील तुमचीच आहे.हे तुम्हांला करता येत असेल तर तुम्ही मुलांना जन्म द्या व हे करता येत नसेल आणि जर तरिही तुम्ही त्यांना जन्म दिला तर ती मुले उद्या तुम्हांला दोष देतील.मुलांना जर जन्म द्यायचा असेल तर त्यांचे लालनपालन शिक्षण सर्व तुम्हांला करता आले पाहिजे तरच त्यांना जन्म द्या अन्यथा मुलांना जन्म न दिलेला बरा असे आमचे स्पष्ट मत आहे.