शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
6
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
7
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
8
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
9
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
10
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
11
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
12
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
13
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
14
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
15
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
16
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
17
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
18
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
19
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
20
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग १८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 17:48 IST

आपण जन्माला येतो तेव्हापासून आपला प्रवास सुरू होतो त्यात आपल्याला जे ज्ञान मिळाले पाहिजे, जी शिकवण मिळाली पाहिजे, जे संस्कार मिळाले पाहिजेत ते मिळत नाहीत व भलतेच संस्कार मिळतात व आपली जीवनाची गाडी चुकते.

- सदगुरू श्रीवामनराव पै

धर्मांतर हे अज्ञानाचेच लक्षण आहे.

आपण जन्माला येतो तेव्हापासून आपला प्रवास सुरू होतो त्यात आपल्याला जे ज्ञान मिळाले पाहिजे, जी शिकवण मिळाली पाहिजे, जे संस्कार मिळाले पाहिजेत ते मिळत नाहीत व भलतेच संस्कार मिळतात व आपली जीवनाची गाडी चुकते. मी हिंदू आहे  असे म्हटले म्हणजे आपली गाडी चुकली.मी मुस्लिम आहे असे म्हणतो तेव्हा आपली गाडी चुकते.ही गाडी चुकलेली आहे हे देखील आपल्या लक्षात येत नाही.प्रत्येकाला आपला धर्म श्रेष्ठ वाटतो.तुझा धर्म श्रेष्ठ बरोबर आहे पण आमचा धर्म आम्हांला श्रेष्ठ आहे.आमची आई आम्हांला बरी तुमची आई तुम्हांला बरी.नाही माझी आईच चांगली आहे तू तुझ्या आईला सोड व माझ्या आईकडे ये असे म्हटले तर चालेल का? असे म्हटले तर तो म्हणेल तुझी आई चांगली आहे हे ठीक आहे पण माझी आई जशी आहे तशी मला प्रिय आहे.या ठिकाणी वाद करण्याचा प्रश्नच येत नाही.हा हट्ट कशाला की तू आमच्या धर्मात आले पाहिजे.धर्मांतर हे अज्ञानाचेच लक्षण आहे.मानव ही एकच जात आहे व माणूसकी हा एकच धर्म आहे.पण हे कुठे सांगितले जात नाही.कुठे शिकविले जात नाही.आपल्याला चुकलेल्या गाडीत बसविण्याची जी एक सवय झालेली आहे त्यामुळे आपला प्रवास असा खडतर होतो, कष्टाचा होतो, दु:खाचा होतो.त्यासाठी जीवनविद्येच्या ज्ञानाला पर्याय नाही.माणूस दु:खी का होतो याचे कारण शोधून काढणे आवश्यक आहे ज्याला आपण निदान म्हणतो हे निदान होणे आवश्यक आहे.डॉक्टर जसे रोगाचे परिक्षण करतो व त्याचे परिक्षण जर चुकले तर रोगाचे निदान देखील चुकते व रोग बरा होण्याऐवजी तो बळावत जातो व रोगी मरण्याची शक्यता असते.तसे मानवजातीचे झालेले आहे.मी मानवजात म्हणतो तेव्हा हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन असे कोणीही नाही तर अखिल मानवजात डोळ्यासमोर ठेवून माझे प्रबोधन करतो हे लक्षात ठेवा.अखिल मानवजात ही आज दु:खाच्या खाईत आहे असे आपल्या लक्षांत येईल.आपण जर दहशतवाद, दंगेधोपे, तंटेबखेडे, बॉम्बस्फोट हे सर्व पाहिले तर लोक दु:खाच्या खाईत ढकलले गेलेले आहेत हे तुमच्या लक्षात येईल.याचे प्रमुख कारण आपण शोधून काढत नाही तोपर्यंत हे बदलणे कठीण आहे.त्यासाठी अचूक निदान होणे गरजेचे आहे.माणसाच्या सर्व दु:खाचे कारण अज्ञान आहे.हे अज्ञान म्हणजे तरी काय हे अज्ञान वेगवेगळ्या प्रकारचे असते.माणसाला व्यवहारिक ज्ञान नसेल तर तो फसेल.तो बुवाबाबाकडे जातो व फसतो कारण अज्ञान.शेतकरी सावकाराकडे जातात व सावकार त्यांना फसवतो कारण अज्ञान.माणसाला मनशांती मिळत नाही त्याला कारण अज्ञान.