शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग १८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 17:48 IST

आपण जन्माला येतो तेव्हापासून आपला प्रवास सुरू होतो त्यात आपल्याला जे ज्ञान मिळाले पाहिजे, जी शिकवण मिळाली पाहिजे, जे संस्कार मिळाले पाहिजेत ते मिळत नाहीत व भलतेच संस्कार मिळतात व आपली जीवनाची गाडी चुकते.

- सदगुरू श्रीवामनराव पै

धर्मांतर हे अज्ञानाचेच लक्षण आहे.

आपण जन्माला येतो तेव्हापासून आपला प्रवास सुरू होतो त्यात आपल्याला जे ज्ञान मिळाले पाहिजे, जी शिकवण मिळाली पाहिजे, जे संस्कार मिळाले पाहिजेत ते मिळत नाहीत व भलतेच संस्कार मिळतात व आपली जीवनाची गाडी चुकते. मी हिंदू आहे  असे म्हटले म्हणजे आपली गाडी चुकली.मी मुस्लिम आहे असे म्हणतो तेव्हा आपली गाडी चुकते.ही गाडी चुकलेली आहे हे देखील आपल्या लक्षात येत नाही.प्रत्येकाला आपला धर्म श्रेष्ठ वाटतो.तुझा धर्म श्रेष्ठ बरोबर आहे पण आमचा धर्म आम्हांला श्रेष्ठ आहे.आमची आई आम्हांला बरी तुमची आई तुम्हांला बरी.नाही माझी आईच चांगली आहे तू तुझ्या आईला सोड व माझ्या आईकडे ये असे म्हटले तर चालेल का? असे म्हटले तर तो म्हणेल तुझी आई चांगली आहे हे ठीक आहे पण माझी आई जशी आहे तशी मला प्रिय आहे.या ठिकाणी वाद करण्याचा प्रश्नच येत नाही.हा हट्ट कशाला की तू आमच्या धर्मात आले पाहिजे.धर्मांतर हे अज्ञानाचेच लक्षण आहे.मानव ही एकच जात आहे व माणूसकी हा एकच धर्म आहे.पण हे कुठे सांगितले जात नाही.कुठे शिकविले जात नाही.आपल्याला चुकलेल्या गाडीत बसविण्याची जी एक सवय झालेली आहे त्यामुळे आपला प्रवास असा खडतर होतो, कष्टाचा होतो, दु:खाचा होतो.त्यासाठी जीवनविद्येच्या ज्ञानाला पर्याय नाही.माणूस दु:खी का होतो याचे कारण शोधून काढणे आवश्यक आहे ज्याला आपण निदान म्हणतो हे निदान होणे आवश्यक आहे.डॉक्टर जसे रोगाचे परिक्षण करतो व त्याचे परिक्षण जर चुकले तर रोगाचे निदान देखील चुकते व रोग बरा होण्याऐवजी तो बळावत जातो व रोगी मरण्याची शक्यता असते.तसे मानवजातीचे झालेले आहे.मी मानवजात म्हणतो तेव्हा हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन असे कोणीही नाही तर अखिल मानवजात डोळ्यासमोर ठेवून माझे प्रबोधन करतो हे लक्षात ठेवा.अखिल मानवजात ही आज दु:खाच्या खाईत आहे असे आपल्या लक्षांत येईल.आपण जर दहशतवाद, दंगेधोपे, तंटेबखेडे, बॉम्बस्फोट हे सर्व पाहिले तर लोक दु:खाच्या खाईत ढकलले गेलेले आहेत हे तुमच्या लक्षात येईल.याचे प्रमुख कारण आपण शोधून काढत नाही तोपर्यंत हे बदलणे कठीण आहे.त्यासाठी अचूक निदान होणे गरजेचे आहे.माणसाच्या सर्व दु:खाचे कारण अज्ञान आहे.हे अज्ञान म्हणजे तरी काय हे अज्ञान वेगवेगळ्या प्रकारचे असते.माणसाला व्यवहारिक ज्ञान नसेल तर तो फसेल.तो बुवाबाबाकडे जातो व फसतो कारण अज्ञान.शेतकरी सावकाराकडे जातात व सावकार त्यांना फसवतो कारण अज्ञान.माणसाला मनशांती मिळत नाही त्याला कारण अज्ञान.