शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग १८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 17:48 IST

आपण जन्माला येतो तेव्हापासून आपला प्रवास सुरू होतो त्यात आपल्याला जे ज्ञान मिळाले पाहिजे, जी शिकवण मिळाली पाहिजे, जे संस्कार मिळाले पाहिजेत ते मिळत नाहीत व भलतेच संस्कार मिळतात व आपली जीवनाची गाडी चुकते.

- सदगुरू श्रीवामनराव पै

धर्मांतर हे अज्ञानाचेच लक्षण आहे.

आपण जन्माला येतो तेव्हापासून आपला प्रवास सुरू होतो त्यात आपल्याला जे ज्ञान मिळाले पाहिजे, जी शिकवण मिळाली पाहिजे, जे संस्कार मिळाले पाहिजेत ते मिळत नाहीत व भलतेच संस्कार मिळतात व आपली जीवनाची गाडी चुकते. मी हिंदू आहे  असे म्हटले म्हणजे आपली गाडी चुकली.मी मुस्लिम आहे असे म्हणतो तेव्हा आपली गाडी चुकते.ही गाडी चुकलेली आहे हे देखील आपल्या लक्षात येत नाही.प्रत्येकाला आपला धर्म श्रेष्ठ वाटतो.तुझा धर्म श्रेष्ठ बरोबर आहे पण आमचा धर्म आम्हांला श्रेष्ठ आहे.आमची आई आम्हांला बरी तुमची आई तुम्हांला बरी.नाही माझी आईच चांगली आहे तू तुझ्या आईला सोड व माझ्या आईकडे ये असे म्हटले तर चालेल का? असे म्हटले तर तो म्हणेल तुझी आई चांगली आहे हे ठीक आहे पण माझी आई जशी आहे तशी मला प्रिय आहे.या ठिकाणी वाद करण्याचा प्रश्नच येत नाही.हा हट्ट कशाला की तू आमच्या धर्मात आले पाहिजे.धर्मांतर हे अज्ञानाचेच लक्षण आहे.मानव ही एकच जात आहे व माणूसकी हा एकच धर्म आहे.पण हे कुठे सांगितले जात नाही.कुठे शिकविले जात नाही.आपल्याला चुकलेल्या गाडीत बसविण्याची जी एक सवय झालेली आहे त्यामुळे आपला प्रवास असा खडतर होतो, कष्टाचा होतो, दु:खाचा होतो.त्यासाठी जीवनविद्येच्या ज्ञानाला पर्याय नाही.माणूस दु:खी का होतो याचे कारण शोधून काढणे आवश्यक आहे ज्याला आपण निदान म्हणतो हे निदान होणे आवश्यक आहे.डॉक्टर जसे रोगाचे परिक्षण करतो व त्याचे परिक्षण जर चुकले तर रोगाचे निदान देखील चुकते व रोग बरा होण्याऐवजी तो बळावत जातो व रोगी मरण्याची शक्यता असते.तसे मानवजातीचे झालेले आहे.मी मानवजात म्हणतो तेव्हा हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन असे कोणीही नाही तर अखिल मानवजात डोळ्यासमोर ठेवून माझे प्रबोधन करतो हे लक्षात ठेवा.अखिल मानवजात ही आज दु:खाच्या खाईत आहे असे आपल्या लक्षांत येईल.आपण जर दहशतवाद, दंगेधोपे, तंटेबखेडे, बॉम्बस्फोट हे सर्व पाहिले तर लोक दु:खाच्या खाईत ढकलले गेलेले आहेत हे तुमच्या लक्षात येईल.याचे प्रमुख कारण आपण शोधून काढत नाही तोपर्यंत हे बदलणे कठीण आहे.त्यासाठी अचूक निदान होणे गरजेचे आहे.माणसाच्या सर्व दु:खाचे कारण अज्ञान आहे.हे अज्ञान म्हणजे तरी काय हे अज्ञान वेगवेगळ्या प्रकारचे असते.माणसाला व्यवहारिक ज्ञान नसेल तर तो फसेल.तो बुवाबाबाकडे जातो व फसतो कारण अज्ञान.शेतकरी सावकाराकडे जातात व सावकार त्यांना फसवतो कारण अज्ञान.माणसाला मनशांती मिळत नाही त्याला कारण अज्ञान.