शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 1

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:10 IST

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण हा विषय अगदी आगळा व वेगळा असा आहे.सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण हे वाचल्यानंतर माझी खात्री आहे की तुम्हांला असे वाटले असेल की वामनराव कुठेतरी चुकत आहेत.

- सदगुरू श्री वामनराव पैसुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण हा विषय अगदी आगळा व वेगळा असा आहे.सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण हे वाचल्यानंतर माझी खात्री आहे की तुम्हांला असे वाटले असेल की वामनराव कुठेतरी चुकत आहेत. दु:खी होणे सोपे सुखी होणे कठीण असे म्हणायला पाहिजे होते त्या ऐवजी वामनराव चुकून उलट सांगत आहेत असे तुम्हांला वाटण्याची शक्यता आहे. तुम्हांला असे वाटण्याचे कारण असे की आपण आतापर्यंत जे काही वाचत आलो ऐकत आलो ते असे की सुख पहाता जवापाडे दु:ख पर्वताएवढे. सुख किती जवाएवढे व दु:ख किती पर्वताएवढे पण जीववविद्या असे सांगते की सुख पर्वताएवढे व दु:ख जवाएवढे असे व्हायला पाहिजे. असे होवू शकते पण त्यासाठी काय  करायला हवे ते फार महत्वाचे आहे. दु:ख हे जन्मापासूनच माणसाच्या पाठीमागे लागते असे म्हटले जाते. जन्म दु:खम जरा दु:खम असे कोणीतरी एके ठिकाणी म्हटलेले आहे. जन्माला आल्यापासून दु:ख जे मागे लागते ते अगदी मरेपर्यंत असे म्हणण्याचा त्यांचा हेतू आहे.एके ठिकाणी असेही म्हटलेले आहे की “संसारा मानी जो सुख तो परम मुर्ख” “संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची” असेही काही ठिकाणी म्हटलेले आहे.कुणी काय काय म्हटलेले आहे हयाची मला जाणीव आहे.तरीही मी सांगतो सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण.आता यावर तुम्ही म्हणाल,”वामनराव आम्ही जे काही आतापर्यंत ऐकले त्याच्या नेमके उलट तुम्ही सांगता हे कसे काय? तसेच आम्ही आतापर्यंत ऐकत आलो की परमेश्वर कॄपा करतो किंवा कोप करतो पण तुम्ही म्हणता परमेश्ववर कोणावरही कृपाही करत नाही व कोपही करत नाही.तुमच्या जीवनविद्येत सगळंच कसे आगळं आणि वेगळं.”जीवनविद्येचे तत्वज्ञान खरेच आगळेवेगळे आहे.आणि तुम्ही ते आधी समजावून घ्यावे व तसे आचरण करण्याचा प्रयत्न करावा व तुम्ही सुखी व्हावे.किंबहूना तुम्ही आम्ही सारेच या तत्वज्ञानाने सुखी व्हावे अशी जीवनविद्येची संकल्पना आहे.यासाठी जीवनविद्येला असे मनापासून वाटते आपण सर्वांनी सुखी होऊ या.जगात काही जण सुखी तर काही जण दु:खी हे काही बरोबर नाही.आपण सर्व सुखी होऊ या. ही जीवनविद्येची भावना व धारणा आहे.जीवनविद्येची ही धारणा लक्षात घेवून जर तुम्ही जीवनविद्येचे तत्वज्ञान समजून घेतले तर तुम्हांला जीवनविद्येचे महत्व महात्म्य नक्कीच कळेल.पण त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण असे जर जीवनविद्या सांगते तर ते  नेमके कसे काय? कारण आमचा आतापर्यंतचा लोकांचा अनुभव असा आहे की दु:खी होणे सोपे सुखी होणे कठीण.बरे हा अनुभव फक्त आत्ताच्या लोकांचा आहे असा नव्हे तर पुरातन काळापासून तर  सर्वांचाच हा अनुभव आहे.