शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 1

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:10 IST

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण हा विषय अगदी आगळा व वेगळा असा आहे.सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण हे वाचल्यानंतर माझी खात्री आहे की तुम्हांला असे वाटले असेल की वामनराव कुठेतरी चुकत आहेत.

- सदगुरू श्री वामनराव पैसुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण हा विषय अगदी आगळा व वेगळा असा आहे.सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण हे वाचल्यानंतर माझी खात्री आहे की तुम्हांला असे वाटले असेल की वामनराव कुठेतरी चुकत आहेत. दु:खी होणे सोपे सुखी होणे कठीण असे म्हणायला पाहिजे होते त्या ऐवजी वामनराव चुकून उलट सांगत आहेत असे तुम्हांला वाटण्याची शक्यता आहे. तुम्हांला असे वाटण्याचे कारण असे की आपण आतापर्यंत जे काही वाचत आलो ऐकत आलो ते असे की सुख पहाता जवापाडे दु:ख पर्वताएवढे. सुख किती जवाएवढे व दु:ख किती पर्वताएवढे पण जीववविद्या असे सांगते की सुख पर्वताएवढे व दु:ख जवाएवढे असे व्हायला पाहिजे. असे होवू शकते पण त्यासाठी काय  करायला हवे ते फार महत्वाचे आहे. दु:ख हे जन्मापासूनच माणसाच्या पाठीमागे लागते असे म्हटले जाते. जन्म दु:खम जरा दु:खम असे कोणीतरी एके ठिकाणी म्हटलेले आहे. जन्माला आल्यापासून दु:ख जे मागे लागते ते अगदी मरेपर्यंत असे म्हणण्याचा त्यांचा हेतू आहे.एके ठिकाणी असेही म्हटलेले आहे की “संसारा मानी जो सुख तो परम मुर्ख” “संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची” असेही काही ठिकाणी म्हटलेले आहे.कुणी काय काय म्हटलेले आहे हयाची मला जाणीव आहे.तरीही मी सांगतो सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण.आता यावर तुम्ही म्हणाल,”वामनराव आम्ही जे काही आतापर्यंत ऐकले त्याच्या नेमके उलट तुम्ही सांगता हे कसे काय? तसेच आम्ही आतापर्यंत ऐकत आलो की परमेश्वर कॄपा करतो किंवा कोप करतो पण तुम्ही म्हणता परमेश्ववर कोणावरही कृपाही करत नाही व कोपही करत नाही.तुमच्या जीवनविद्येत सगळंच कसे आगळं आणि वेगळं.”जीवनविद्येचे तत्वज्ञान खरेच आगळेवेगळे आहे.आणि तुम्ही ते आधी समजावून घ्यावे व तसे आचरण करण्याचा प्रयत्न करावा व तुम्ही सुखी व्हावे.किंबहूना तुम्ही आम्ही सारेच या तत्वज्ञानाने सुखी व्हावे अशी जीवनविद्येची संकल्पना आहे.यासाठी जीवनविद्येला असे मनापासून वाटते आपण सर्वांनी सुखी होऊ या.जगात काही जण सुखी तर काही जण दु:खी हे काही बरोबर नाही.आपण सर्व सुखी होऊ या. ही जीवनविद्येची भावना व धारणा आहे.जीवनविद्येची ही धारणा लक्षात घेवून जर तुम्ही जीवनविद्येचे तत्वज्ञान समजून घेतले तर तुम्हांला जीवनविद्येचे महत्व महात्म्य नक्कीच कळेल.पण त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण असे जर जीवनविद्या सांगते तर ते  नेमके कसे काय? कारण आमचा आतापर्यंतचा लोकांचा अनुभव असा आहे की दु:खी होणे सोपे सुखी होणे कठीण.बरे हा अनुभव फक्त आत्ताच्या लोकांचा आहे असा नव्हे तर पुरातन काळापासून तर  सर्वांचाच हा अनुभव आहे.