शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 1

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:10 IST

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण हा विषय अगदी आगळा व वेगळा असा आहे.सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण हे वाचल्यानंतर माझी खात्री आहे की तुम्हांला असे वाटले असेल की वामनराव कुठेतरी चुकत आहेत.

- सदगुरू श्री वामनराव पैसुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण हा विषय अगदी आगळा व वेगळा असा आहे.सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण हे वाचल्यानंतर माझी खात्री आहे की तुम्हांला असे वाटले असेल की वामनराव कुठेतरी चुकत आहेत. दु:खी होणे सोपे सुखी होणे कठीण असे म्हणायला पाहिजे होते त्या ऐवजी वामनराव चुकून उलट सांगत आहेत असे तुम्हांला वाटण्याची शक्यता आहे. तुम्हांला असे वाटण्याचे कारण असे की आपण आतापर्यंत जे काही वाचत आलो ऐकत आलो ते असे की सुख पहाता जवापाडे दु:ख पर्वताएवढे. सुख किती जवाएवढे व दु:ख किती पर्वताएवढे पण जीववविद्या असे सांगते की सुख पर्वताएवढे व दु:ख जवाएवढे असे व्हायला पाहिजे. असे होवू शकते पण त्यासाठी काय  करायला हवे ते फार महत्वाचे आहे. दु:ख हे जन्मापासूनच माणसाच्या पाठीमागे लागते असे म्हटले जाते. जन्म दु:खम जरा दु:खम असे कोणीतरी एके ठिकाणी म्हटलेले आहे. जन्माला आल्यापासून दु:ख जे मागे लागते ते अगदी मरेपर्यंत असे म्हणण्याचा त्यांचा हेतू आहे.एके ठिकाणी असेही म्हटलेले आहे की “संसारा मानी जो सुख तो परम मुर्ख” “संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची” असेही काही ठिकाणी म्हटलेले आहे.कुणी काय काय म्हटलेले आहे हयाची मला जाणीव आहे.तरीही मी सांगतो सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण.आता यावर तुम्ही म्हणाल,”वामनराव आम्ही जे काही आतापर्यंत ऐकले त्याच्या नेमके उलट तुम्ही सांगता हे कसे काय? तसेच आम्ही आतापर्यंत ऐकत आलो की परमेश्वर कॄपा करतो किंवा कोप करतो पण तुम्ही म्हणता परमेश्ववर कोणावरही कृपाही करत नाही व कोपही करत नाही.तुमच्या जीवनविद्येत सगळंच कसे आगळं आणि वेगळं.”जीवनविद्येचे तत्वज्ञान खरेच आगळेवेगळे आहे.आणि तुम्ही ते आधी समजावून घ्यावे व तसे आचरण करण्याचा प्रयत्न करावा व तुम्ही सुखी व्हावे.किंबहूना तुम्ही आम्ही सारेच या तत्वज्ञानाने सुखी व्हावे अशी जीवनविद्येची संकल्पना आहे.यासाठी जीवनविद्येला असे मनापासून वाटते आपण सर्वांनी सुखी होऊ या.जगात काही जण सुखी तर काही जण दु:खी हे काही बरोबर नाही.आपण सर्व सुखी होऊ या. ही जीवनविद्येची भावना व धारणा आहे.जीवनविद्येची ही धारणा लक्षात घेवून जर तुम्ही जीवनविद्येचे तत्वज्ञान समजून घेतले तर तुम्हांला जीवनविद्येचे महत्व महात्म्य नक्कीच कळेल.पण त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण असे जर जीवनविद्या सांगते तर ते  नेमके कसे काय? कारण आमचा आतापर्यंतचा लोकांचा अनुभव असा आहे की दु:खी होणे सोपे सुखी होणे कठीण.बरे हा अनुभव फक्त आत्ताच्या लोकांचा आहे असा नव्हे तर पुरातन काळापासून तर  सर्वांचाच हा अनुभव आहे.