शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

मन:शांतीचा सुलभ मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 5:42 PM

मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ।।१।।

अशोकानंद महाराज कर्डिलेमन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारणमोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ।।१।।मने प्रतिमा स्थापिली । मने मना पूजा केली ।मने इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ।।२।।मन गुरू आणि शिष्य । करी आपुलाचे दास्य ।प्रसन्न आपआपणास । गती अथवा अधोगती ।।३।।साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात ।नाही नाही आन दैवत । तुका म्हणे दुसरे ।।४।।परमार्थ असो अथवा प्रपंच असो या दोन्ही ठिकाणी एक समान गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे ‘मन’. मन जर अशांत असेल तर मनुष्य समाधानी राहू शकत नाही. पंचदशीमध्ये म्हटले आहे की, ‘मन एवं मनुष्याणाम् बंधमोक्षयो :।। बंध आणि मोक्ष या दोन्हीसाठी फक्त मनच कारण आहे. दुसरे काहीही नाही.बहिणाबाई म्हणतात, मन वढाय वढाय। उभ्या पिकातलं ढोर।। किती हाकला हाकला। फिरी येतं पिकांवर।। मन मोठे चंचल आहे. म्हणून या मनालाच वळवावयाचे आहे. हल्ली आपल्या आसपास कोठेही बघितले तर माणसे ताण-तणावाखाली जगतांना दिसतात. त्यांना मानसिक शांती नाही. म्हणून मानसोपचार तज्ज्ञांचे दवाखाने जास्त दिसू लागले आहेत. कुटुंबात तणाव वाढलेले दिसतात. सर्वत्र तणावाखाली लोक दिसतात, याचे कारण म्हणजे मनाचा कमकुवतपणा ! या मनाला स्थिर करता आले तरच प्रतिकूल स्थितीतही तणाव वाढणार नाही. माणसाचे जीवन सुखमय होईल, यासाठीच जगद्गुरू श्री. तुकाराम महाराज फार सुंदर उपाय सांगतात. तो म्हणजे, मनाला प्रसन्न करा. मन जर प्रसन्न असेल तर सर्व काही सध्या करता येईल. याचा अर्थ मनाप्रमाणेच वागायचे असे नाही, तर मनाला योग्य दिशा द्यायची. मनाचा स्वभाव असा आहे की,ते ज्या गोष्टीला पाहिलं तिथे ते सोकते. तिकडे ओढ घेते, या करिता काय करावे. मनाला अध्यात्म मार्गाकडे न्यावे. त्याला ध्यान, चिंतनाची थोडी सवय लावावी. मन:शांती मिळण्याचा अध्यात्म हा एक चांगला मार्ग आहे.सुख, समाधान मनाच्या प्रसन्नतेमुळेच मिळते. मनानेच प्रतिमा स्थापित केली व मनानेच पूजा कल्पिली. मनोमय पूजा हेचि पढिये केशिराजा ।।तु. म. ।। मानसिक पूजा भगवंताला आवडते. बहिरंग केलेली पूजा सुद्धा देवाला आवडत नसते. म्हणून हे मनच माउली आहे. मनाला माउली म्हणणारे तुकाराम महाराज एक वेगळे संत आहेत. गुरु आणि शिष्य सुद्धा आपले मनच आहे. कारण सर्व क्रियेचे साक्षी मनच असते. जर मन प्रसन्न असेल तरच आपली प्रगती होते आणि अप्रसन्न मन अधोगतीला कारण ठरते. म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, साधक, विद्वान, वक्ते, पंडित, कोणीही असा पण, एक लक्षात घ्या,या मनासारखे दुसरे दैवत नाही. संत तुकाराम महाराजांनी मनाचे थोडक्यात आणि यथार्थ विवेचन व निदान केले आहे. हाच एक मन:शांतीचा सुलभ मार्ग आहे.

( लेखक भागवताचार्य असून अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यामधील चिचोंडी पाटील येथे  गुरुकुल भगवंताश्रम ते चालवितात.)

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर