शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

ताणमुक्त मनाचा व तणावमुक्त जीवनाचा कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 20:23 IST

अजय नि अभय, दोघे जिवलग मित्र. नावं ऐकायला एकसारखी वाटली तरी अर्थ मात्र विरुद्ध. अजय म्हणजे जय नाही तो पराजय तर अभय म्हणजे भय नसलेला, निर्भय. गंमत म्हणजे दोघांच्या विचार करण्याच्या नि कृती करण्याच्या पद्धतीही भिन्न होत्या.

रमेश सप्रे

अजय नि अभय, दोघे जिवलग मित्र. नावं ऐकायला एकसारखी वाटली तरी अर्थ मात्र विरुद्ध. अजय म्हणजे जय नाही तो पराजय तर अभय म्हणजे भय नसलेला, निर्भय. गंमत म्हणजे दोघांच्या विचार करण्याच्या नि कृती करण्याच्या पद्धतीही भिन्न होत्या.

अजयला सगळ्या गोष्टी मंदगतीनं करायला आवडायच्या. जेवण, आंघोळ सोडाच ऑफीसमधलं कामही मंदगतीनं करायचा. कामं पुरी व्हायची नाहीत. पुढे ढकलली जायची. ती गोगलगायीची गोष्ट आपल्याला माहीत असेलच. अतिशय धीम्यागतीनं चालणारी गोगलगाय नि भुर्रकन इकडून तिकडे उडणारी चिमणी यांची होती मैत्री. पहिल्यांदा चिऊताई असलेली नंतर चिऊबाई झाली आणि नंतर चिऊआईही बनली. आपल्या सुंदर गुबगुबीत पिलाचं बारसं करायचं तिनं ठरवलं. सगळ्यांना आमंत्रणं दिली. गोगलगाईला सुद्धा. ‘वेळेवर पोचीन हं’ असं वचनही गोगलगायीनं दिलं. तयारी करून ती निघाली सुद्धा. चिऊताईचं घरटं जरा दूर होतं.

अखेर ज्यावेळी ती तिथं पोचली तेव्हा कार्यक्रमाची धामधूम, वाजंत्री ताशे, अनेक जण जमलेयत, सर्वजण उत्साहात आहेत. आपण अगदी योग्य वेळी पोचले या आनंदात ती आपल्या मैत्रिणीला भेटली. ‘पोचले किनई वेळेवर बारशाला?’ या गोगलगायीच्या प्रश्नावर सारे हसू लागले. तेव्हा चिऊताई म्हणाली, ‘बरं झालं बारशाला म्हणून निघालात म्हणून लग्नाला तरी पोचलात. आज माझ्या मुलाचं चिमण्याचं लग्न आहे.’ असो. अतिशय मंदगतीनं, आळशी बनून काम करणा-या व्यक्तीचं आजच्या काळात हसूच होतं.

आता अभयकडे वळूया. त्याचं सारं जगणं, काम हे संथ, स्थिर असायचं. तो एका लयीत काम करत राहायचा. त्यामुळे थकायचा नाही आणि कामही वेळेवर उरकली जायची. त्याचा आदर्श होतं कासव. तेच ‘ससा नि कासव’ यांच्या शर्यतीतलं. संथ पण सतत चालून शर्यत जिंकली होती कासवानं. इंग्रजीत जी म्हण आहे. ‘स्लो बट् स्टेडी विन्स द रेस’ तिचा अर्थ हाच आहे.कासवाच्या या गतीचे अनेक फायदे आहेत.

* एका गतीने चालल्याने (काम करत राहिल्यानं) थकायला, दमायला होत नाही.* आपल्या चालण्याची किंवा काम करण्याची गती एका लयीत असल्यानं कामाचा दर्जा सुधारतो. आपली कौशल्य, कार्यक्षमता यांचा विकास होतो.* सतत काळाशी स्पर्धा नसल्यानं मनावर अनावश्यक ताण, दडपण येत नाही. यामुळे शरीरमनाचं आरोग्य सुस्थितीत राहतं. एकूणच आयुष्याची मर्यादा वाढते.* याच बरोबर बुद्धी स्थिर शांत राहिल्यान आपत्कालिन व्यवस्था करणं सोपं जातं. केवळ घाईगडबडीमुळे निर्णय घेणं आणि त्यानुसार कार्यवाही करणं सहज सोपं होऊन जातं. संकट आल्यावर कासव आपले चारी पाय, डोकं, शेपूटसुद्धा आत ओढून आपल्या कवचाखाली सुरक्षित राहतं.या सर्व गुणांचं स्मरण दर्शन व्हावं म्हणून अनेक मंदिरात दगडाच्या किंवा पितळेच्या मूर्तीची स्थापना केलेली असते. केवळ भगवान विष्णूचा दुसरा कूर्मावतार म्हणून नव्हे.

या संथ, शांतपणाच्या जोडीला हातात असलेल्या कामांची नि त्यासाठी उपलब्ध काळाचा विचार आवश्यक असतो. यालाच काळाचं व्यवस्थापन (टाईम मॅनेजमेंट) असं म्हणतात. या संदर्भात दोन मैत्रिणींचं उदाहरण लक्षात ठेवण्यासारखं आहे.

अनुश्री नि अनुराधा दोघींना सारेजण ‘अनू’ या नावानंच हाक मारत. दोघीही एकाच ठिकाणी कामाला होत्या. एकाच वाहनातनं कामाला जायच्या; पण दोघींची काम करण्याची पद्धत मात्र एकमेकीपेक्षा अगदी निराळी होती. तसं पाहिलं तर अनुश्री अधिक वेगानं काम करायची तर अनुराधा अतिशय पद्धतशीरपणो, व्यवस्थित नियोजन करून कामं उरकायची. दोघींचा कामासाठी निघण्यापूर्वीचा कार्यक्रम भिन्न होता. सगळ्यांची सगळी कामं करून घाईगडबडीत स्वत:ची तयारी करून अनुश्री काहीशी वैतागून घराबाहेर पडायची. तर अनुराधाचा कामांचा क्रम उलटा असायचा. उठल्यावर ती शांतपणे आधी स्वत:ची तयारी करायची अगदी कामासाठी बाहेर निघताना करावयाची वेशभूषा, केशभूषा करून इतर कामं करायची. अंगभर एप्रन घालून काम केल्याने कपडे खराब व्हायचे नाहीत. स्वयंपाकाची सारी पूर्वतयारी तिनं आदल्या रात्रीच करून ठेवलेली असायची. सर्वाचे जेवणाचे डबे, मुलांचा गणवेश, पतीराजांची कपडे, बॅग इत्यादीची सारी तयारी केलेली असायची. शांतपणे सारं उरकून पंधरा मिनिटं शांत राहून श्वासाकडे लक्ष देत ध्यान करून आजचा कामाचा दिवस अतिशय यशस्वी नि आनंदी जाणार आहे हे स्वत:ला स्पष्ट सांगून सावकाश घराबाहेर पडायची. नेहमी मजेत असायची. चेह-यावर कायम हास्य, स्वत:चं काम उरकून इतरांना मदत केल्यामुळे सर्वाची आवडती बनली होती.

आपल्यालाही असा प्रयोग स्वत:च्या जीवनात करता येईल, ताणमुक्त मन नि तणावमुक्त जीवनाचा कानमंत्रच आहे हा! करून पाहायला काय हरकत आहे. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक