शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

कायम दु:खाची ‘वजाबाकी’ करावी! म्हणजे सुखाची ‘बेरीज’ होते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 11:38 IST

माणसानं कायम दु:खाची ‘वजाबाकी’ करावी! म्हणजे सुखाची ‘बेरीज’ होते. हेही आपली डोळस उपासना आपल्याला सांगते! दया, प्रेम हीच पूजा-उपासना अंश शिकवते. आज चौकोनी कुटुंब आपापल्या बेटावर स्वत:चं साम्राज्य उभारू पाहत आहे. ज्येष्ठांच्या-आई, वडिलांच्या नात्यातील दुरावा वृद्धाश्रमाची त्यांना वाट दाखवू लागला आहे. नात्यातील विश्वासार्हता टिकविण्यासाठीही आज दृढ उपासना उपयुक्तच ठरणार आहे.

ठळक मुद्दे व्रत-वैकल्ये त्यासाठी करायची उपासना ही ‘विशेष’ धर्म होत! आज संगणक युगातही मंत्रशक्तीचा, तिच्यातील तादात्म्याचा पाश्चात्त्य शास्त्रज्ञांकडूनही शोध घेतला जात आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्यानुसार उपासनेला दृढ चालवणं सोयीचं ठरतं! मंत्र ही एक स्वयंभू शक्ती आहे! सिद्धमंत्र, वरदमंत्र यासह ती सिद्धीप्रत नेणारी आहे.ज्या शक्तीनं अनुभवता येतं त्या शक्तीच्या अभ्यासाचं शास्त्र म्हणजे ‘अध्यात्म’ होय. म्हणून तर ‘उपासना’ करताना कोणत्याही काल्पनिक देवदेवतांमध्ये अडकता कामा नये! उपासना ‘डोळस’च हवी!

डॉ. कुमुद गोसावीसृष्टीतील चैतन्य पानापानांतून ओसंडत असताना एखाद्या उपासनेत मन जर स्थिर होत नसेल, तर आधी त्या निसर्गदेवतेशी मनमुराद संवाद साधणं हीदेखील एक उपासनाच होय! पावसाची लडिवाळ सर, डोंगरमाथ्यावरून ओघळणारा दुधाळ धबधबा! त्याचे सुखावणारे असंख्य तुषार! हे सारं सारं आस्वादताना साधलेली आंतरिक भावलय यातूनही ‘तादात्म्य’ अनुभवता येतं!माणसाला जे जे काही अनुभवयाला येतं त्याच्या अभ्यासाचं शास्त्र म्हणजे ‘विज्ञान!’ नि ज्या शक्तीनं अनुभवता येतं त्या शक्तीच्या अभ्यासाचं शास्त्र म्हणजे ‘अध्यात्म’ होय. म्हणून तर ‘उपासना’ करताना कोणत्याही काल्पनिक देवदेवतांमध्ये अडकता कामा नये! उपासना ‘डोळस’च हवी! नसता-‘माला बनाई काष्ट की। बीच में ड़ाला सुत।माला बेचारी क्या करे। जपनेवाला कुपुत! ।।मुरत बनाई पत्थर की। सुंदर सजाई बहुत ।मुरत बेचारी क्या करे। पुजनेवाला कुपुत!।।’संत कबीरांचा हा दोहा उपासनेसंबंधी खूप काही सांगून जातो. दिशा दाखवतो. आपल्या आराध्य दैवताशी संपूर्ण एकतानतेनं साधायचं अनुसंधान म्हणजे ‘उपासना!’ नित्य एक साधनामार्ग स्वीकारून करायची वाटचाल. त्यात मंत्र, जप-जाप्य, ध्यान-धारणा, पूजा-अर्चना आदी साधनांचा उपयोग केला जातो. अशा साधनांचीही सजगतेनं निवड केल्यास समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्यानुसार उपासनेला दृढ चालवणं सोयीचं ठरतं!मंत्र ही एक स्वयंभू शक्ती आहे! सिद्धमंत्र, वरदमंत्र यासह ती सिद्धीप्रत नेणारी आहे. एकदा एका परधर्मीय प्रचारकानं हिंदू धर्माची चालवलेली निंदा सहन न होऊन एका अस्पृश्य समाजातील सामान्य माणसानं जवळच्याच एका दगडावर मंत्रोच्चारपूर्वक विंचवाचं एक चित्र काढलं! नि त्या निंदकाला त्या चित्राला हात लावण्यास सांगितले. त्यानं अत्यंत कुचेष्टेने त्या चित्रावर बोट ठेवताच प्रचंड वेदना होऊन तो जमिनीवर लोळायला लागला!जोवर अनुभव-प्रतीती येत नाही तोवर शास्त्र हे संशोधन अवस्थेत असतं. धार्मिक विधिनिषेधांचा पाया ‘योगशास्त्र’ हा आहे. हे सिद्ध असताना वेगळी सिद्धता कशाला? व्रत-वैकल्ये त्यासाठी करायची उपासना ही ‘विशेष’ धर्म होत! आज संगणक युगातही मंत्रशक्तीचा, तिच्यातील तादात्म्याचा पाश्चात्त्य शास्त्रज्ञांकडूनही शोध घेतला जात आहे. उपासकाला उपाधीरहित उपासनेतील ध्यानस्थितीत दिव्य श्रुती-रामरक्षा-मंत्रांसारख्या ऐकू येतात! त्यात कार्यशक्ती असते. या अवस्थेत ईश्वर साधकाशी बोलतो! ते शब्द खरे असतात. त्यातील एकही अक्षर वाया जात नाही! असं साक्षात्कार शास्त्र सांगतं. (साक्षात्कार शास्त्र- अंडरहिल पृ. क्र . ३०४)उपासनेतील तादात्म्यभाव उपासकाला ‘स्व’ विसरायला लावतो! अशी उपासना म्हणजे ‘ज्ञानोत्तर भक्ती!’ जिची महती ‘श्रुती’नं गायिली आहे. तिच्यातून उत्पन्न होणारी त्रिज्या तोच खरा ‘उपासना धर्म’ होय! तो समजून घेतल्यास ‘हरी ओम’ असो, वा अन्य जप असो, तो नितळ मनानं चालू ठेवता येतो.‘जे माझ्यात आहे ते सारं काही भगवंतांचंच आहे. हा मनाचा दृढभाव योेग्य उपासनेतून येतो. एकदा राधेनं मुरलीला विचारलं,‘तू कृष्णाला इतकी प्रिय का आहेस?’मुरली म्हणाली, ‘राधे, माझ्यात ही पोकळी आहे. माझ्यातलं असं दुसरं काही नाही!त्यामुळे माझ्यातून सर्व आवाज कृष्णाचाच येतो!तुमच्यात तर सारं तुमचंच भरलं आहे!तिथं कृष्णाला जागाच कुठं आहे?राधिके, म्हणून तर तो तुमच्यापासून दूर राहतो. नि मला मात्र ओठांना लावतो बरं का!!’उपासनेचंही अगदी असंच आहे. ‘अहं’धूप जळल्याशिवाय खरी उपासना येत नाही! मग ती देवाची असो वा एखाद्या कलेची!कला आणि साहित्य तर समाजाच्या आतल्या आवाजाचं कुलूप असतं. ज्यांचा संबंध मनाशी, मन:स्वास्थ्याशी असल्यानं उपासनेतही अहंतारहित असणं मोलाचं असतं. निर्मळ मनानं, विनम्र भावानं, प्रसन्न चित्तानं दृढ उपासना चालू ठेवल्यास उपासकाचे हातही चंदनी होतात! दीन-दुबळ्यांच्या सेवेसाठी ते सदैव सज्ज असतात! त्यातून समाजाचं उन्नयन होतं. विचारांतून ‘प्रगल्भता’ आचारातून ‘सहजता’ नि उच्चारातून ‘विनम्रता’ साधण्यास हवी असलेली मनाची ‘शुद्धता’ उपासनेतून मिळते.‘संसारातील त्सुनामी लाटा! भ्रमिष्ट करिती अज्ञ जीवा!आधाराची उपासना ही! अतर्क्य घडवी सारी किमया!!’माणसानं कायम दु:खाची ‘वजाबाकी’ करावी! म्हणजे सुखाची ‘बेरीज’ होते. हेही आपली डोळस उपासना आपल्याला सांगते! दया, प्रेम हीच पूजा-उपासना अंश शिकवते. आज चौकोनी कुटुंब आपापल्या बेटावर स्वत:चं साम्राज्य उभारू पाहत आहे. ज्येष्ठांच्या-आई, वडिलांच्या नात्यातील दुरावा वृद्धाश्रमाची त्यांना वाट दाखवू लागला आहे. नात्यातील विश्वासार्हता टिकविण्यासाठीही आज दृढ उपासना उपयुक्तच ठरणार आहे.‘निर्वैर व्हावे भुतांसवे,साधन बरवे हेचि एक।’जगद्गुरू तुकोबांनी सांगितलेलं उपासनेचं असं ‘निर्वैर’ साधन स्वीकारल्यास साधकाला आत्मसुखाचा लाभ का नाही होणार?