शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

बुद्धाच्या मुर्तीला अटक

By योगेश मेहेंदळे | Updated: December 6, 2017 17:43 IST

एक व्यापारी कापसाचे 50 गठ्ठे खांद्यावरून विकण्यासाठी वाहून नेत होता. खूप ऊन आणि उकाडा असल्यामुळे त्रासलेल्या त्या व्यापाऱ्यानं थोडी विश्रांती घेण्याचं ठरवलं

ठळक मुद्देसगळं प्रकरण ऐकल्यावर ओ-ओका म्हणाले की बुद्धाच्या मुर्तीनेच कापडाचे गठ्ठे चोरले असावेतलोकांचं रक्षण करणं, त्यांची काळजी घेणं बुद्धाचं काम आहेआपलं कार्य करण्यास बुद्ध अपयशी ठरलेला दिसतोय, तर त्याला अटक करा आणि घेऊन या कोर्टात!

एक व्यापारी कापसाचे 50 गठ्ठे खांद्यावरून विकण्यासाठी वाहून नेत होता. खूप ऊन आणि उकाडा असल्यामुळे त्रासलेल्या त्या व्यापाऱ्यानं थोडी विश्रांती घेण्याचं ठरवलं. त्याला दिसलं की बुद्धाची एक खूप मोठी मूर्ती समोर आहे आणि तिच्या पायाशी चांगली सावली आहे. त्यानं त्या मूर्तीच्या पायाशी डेरा टाकला आणि मस्त झोपी गेला. ज्यावेळी त्याला जाग आली त्यावेळी आढळलं की त्याचे कापडाचे गठ्ठे गायब झाले आहेत.

अत्यंत वैतागलेल्या मनस्थितीत तो पोलीस चौकीत गेला आणि त्यानं चोरीची तक्रार केली. प्रकरण न्यायालयात गेलं. ओ-ओका नावाचे न्यायाधीश होते त्यांनी सुनावणी सुरू केली. सगळं प्रकरण ऐकल्यावर ओ-ओका म्हणाले की बुद्धाच्या मुर्तीनेच कापडाचे गठ्ठे चोरले असावेत. लोकांचं रक्षण करणं, त्यांची काळजी घेणं बुद्धाचं काम आहे. आपलं कार्य करण्यास बुद्ध अपयशी ठरलेला दिसतोय, तर त्याला अटक करा आणि घेऊन या कोर्टात!पोलिसांनी बुद्धाच्या मूर्तीला अटक केली आणि कोर्टात आणलं. हे सगळं बघत असलेला व प्रचंड आरडाओरड करत असलेला जमावही पोलिसांच्या मागोमाग कोर्टात आला. बुद्धाच्या मूर्तीला काय शिक्षा ठोठावणार अशीच उत्सुकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर होती.

हसत्या खिदळत्या जमावाला बघून भडकलेल्या न्यायाधीश ओ-ओकांनी न्यायालयामध्ये असा गोंधळ घालायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला अशी विचारणा केली. तुम्ही न्यायालयाच अवमान केला आहे आणि तुम्हाला दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते असा सज्जड दमही दिला.लोकांनी दिलगिरी व्यक्त करण्यास दिरंगाई केल्याचं बघून न्यायाधीशांनी लोकांना दंड करत असल्याचं सांगितलं. परंतु, जर तुमच्यापैकी प्रत्येकानं कापसाचा प्रत्येकी एक गठ्ठा तीन दिवसांत आणून दिला तर तुमचा दंड माफ करीन असंही सांगितलं. जे कुणी कापसाचा एक गठ्ठा आणणार नाहीत, त्यांना अटक करण्यात येईल असा आदेशही ओ-ओकांनी दिला.

ज्यावेळी कापसाचे गठ्ठे जमा व्हायला लागले, त्यावेळी त्या व्यापाऱ्याने एक गठ्ठा आपला असल्याचे ओळखले आणि चोर पकडला गेला. उरलेल्या लोकांना त्यांचे गठ्ठे परत देण्यात आले.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक