शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आनंद तरंग - भगवंतांचा विभूतियोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 04:52 IST

‘‘पार्था, तुला एक महत्त्वाचा विचार सांगतो की, माझ्या असंख्य विभूती आहेत.

वामनराव देशपांडेया संपूर्ण विश्वात सर्वत्र भगवंतांचेच अस्तित्व आहे, विविध रूपांत तो प्रकट झाला आहे, सर्व त्याच्याच विभूती पसरलेल्या आहेत हे सांगताना भगवंत म्हणतात,

नान्तो स्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्नप।एष तूद्देशत: प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ।। गीता।।

‘‘पार्था, तुला एक महत्त्वाचा विचार सांगतो की, माझ्या असंख्य विभूती आहेत. असे समज ना की, या पृृथ्वीवर जेवढे गवत आहे, समुद्रावर जेवढ्या लाटा आहेत आणि वरल्या नभांगणात जेवढ्या चांदण्या आणि तारे आहेत, तेवढ्या माझ्या विभूती आहेत. त्यांना अंतच नाही. या माझ्या विभूतींचा विस्तार तुला सांगितला ना तो केवळ मी अगदी संक्षेपाने सांगितला इतकेच. तुला सत्य सांगतो पार्था, जे जे ऐश्वर्यसंपन्न आहे, देखणे आहे, बलाने युक्त आहे त्या माझ्याच परमेश्वरी तेजातून निर्माण झालेल्या माझ्याच अंशाने उत्पन्न झालेल्या असतात. एवढेच फक्त तू प्रथम जाणून घे. भगवंतांच्या सांगण्याचा हेतू एवढाच होता की, साधकाला जिथे जिथे सौंदर्य, शुचित्व, प्रामाणिपणा, सत्यप्रियता, अहिंसक वृत्ती, निखळ प्रेम, वाणीतले आर्जव, शुद्ध सात्त्विक मन भगवंतनामाने गच्च भरलेले अंत:करण प्रतीत होईल ते ते रूप हे भगवंतांचेच स्वरूप आहे हे समजावे. ती भगवंतांची विभूती आहे असे निश्चित समजावे. म्हणजे मग भगवंतांचा विभूतियोग समजून घेणे सोपे जाईल. गीतेमधला दहावा अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे. अर्जुनाच्या निमित्ताने भगवंत सर्वच साधक भक्तांना जणू दिव्यदृष्टी देत म्हणतात की, जे जे उत्तम आहे, उदात्त आहे, त्या सर्वांमध्ये भगवंतांचे स्वरूप आहे. भगवंतच आपले सामर्थ्य जीवसृष्टीला अर्पण करीत असतो. याचे सळसळते भान प्रत्येक जीवाला मात्र येणे आवश्यक आहे. यासाठी देहबुद्धीने जगणे संपुष्टात येणे आवश्यक आहे. एकदा देहबुद्धीने जगणे पूर्णपणे भस्मीभूत झाले की प्रथम ‘मी’पणाने जगणे संपते त्या दिव्य क्षणी भगवंताच्या नामस्मरणात जगणे सुरू होते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक