शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - भगवंतांचा विभूतियोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 04:52 IST

‘‘पार्था, तुला एक महत्त्वाचा विचार सांगतो की, माझ्या असंख्य विभूती आहेत.

वामनराव देशपांडेया संपूर्ण विश्वात सर्वत्र भगवंतांचेच अस्तित्व आहे, विविध रूपांत तो प्रकट झाला आहे, सर्व त्याच्याच विभूती पसरलेल्या आहेत हे सांगताना भगवंत म्हणतात,

नान्तो स्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्नप।एष तूद्देशत: प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ।। गीता।।

‘‘पार्था, तुला एक महत्त्वाचा विचार सांगतो की, माझ्या असंख्य विभूती आहेत. असे समज ना की, या पृृथ्वीवर जेवढे गवत आहे, समुद्रावर जेवढ्या लाटा आहेत आणि वरल्या नभांगणात जेवढ्या चांदण्या आणि तारे आहेत, तेवढ्या माझ्या विभूती आहेत. त्यांना अंतच नाही. या माझ्या विभूतींचा विस्तार तुला सांगितला ना तो केवळ मी अगदी संक्षेपाने सांगितला इतकेच. तुला सत्य सांगतो पार्था, जे जे ऐश्वर्यसंपन्न आहे, देखणे आहे, बलाने युक्त आहे त्या माझ्याच परमेश्वरी तेजातून निर्माण झालेल्या माझ्याच अंशाने उत्पन्न झालेल्या असतात. एवढेच फक्त तू प्रथम जाणून घे. भगवंतांच्या सांगण्याचा हेतू एवढाच होता की, साधकाला जिथे जिथे सौंदर्य, शुचित्व, प्रामाणिपणा, सत्यप्रियता, अहिंसक वृत्ती, निखळ प्रेम, वाणीतले आर्जव, शुद्ध सात्त्विक मन भगवंतनामाने गच्च भरलेले अंत:करण प्रतीत होईल ते ते रूप हे भगवंतांचेच स्वरूप आहे हे समजावे. ती भगवंतांची विभूती आहे असे निश्चित समजावे. म्हणजे मग भगवंतांचा विभूतियोग समजून घेणे सोपे जाईल. गीतेमधला दहावा अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे. अर्जुनाच्या निमित्ताने भगवंत सर्वच साधक भक्तांना जणू दिव्यदृष्टी देत म्हणतात की, जे जे उत्तम आहे, उदात्त आहे, त्या सर्वांमध्ये भगवंतांचे स्वरूप आहे. भगवंतच आपले सामर्थ्य जीवसृष्टीला अर्पण करीत असतो. याचे सळसळते भान प्रत्येक जीवाला मात्र येणे आवश्यक आहे. यासाठी देहबुद्धीने जगणे संपुष्टात येणे आवश्यक आहे. एकदा देहबुद्धीने जगणे पूर्णपणे भस्मीभूत झाले की प्रथम ‘मी’पणाने जगणे संपते त्या दिव्य क्षणी भगवंताच्या नामस्मरणात जगणे सुरू होते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक