शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

दैवी संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 06:23 IST

पाच कर्मेंद्रियांच्या व्यतिरिक्त कारण हे सत्याचा शोध घेण्याचे प्रमुख अस्त्र असू शकत नाही.

- डॉ. मेहरा श्रीखंडे

स्विस गूढवादी कार्ल जंग जे सीगमंड फ्राइडचे समकालीन होते. त्यांना असे वाटायचे की, एखाद्याची कल्पनाशक्ती व स्वप्न ही त्याला एकत्रित झालेल्या अंतर्मनाशी सुसंवाद घडविते. ज्या वेळी मानव गूढवाद जाणत होता त्या वेळी तो एकत्रितपणे सर्व सांभाळत होता. मेंदूमध्ये खोलवर असलेली वाटाण्यासारखी पिनियल ग्रंथी ही तत्त्वज्ञानी व गूढवादी यांच्या मते भौतिक व अतिंद्रिय जगाशी संपर्क साधणारी एकसारखी आहे. ज्याला तिसरा डोळा किंवा आत्म्याची जागा असे म्हटले जाते, ती ही ग्रंथी ध्यान व दैवी शिक्षण याद्वारे उद्दीपित केली जाते. या तिसऱ्या डोळ्याच्या उद्दीपनाने आपण उच्च प्रतलाशी सरळ संपर्क साधू शकतो. काही माणसांनी ज्यांनी शरीराबाहेर जाण्याची प्रक्रि या सांधली आहे, त्यांचे असे म्हणणे आहे की ते या ग्रंथीच्या दरवाजातून बाहेर गेलेले आहेत.

पाच कर्मेंद्रियांच्या व्यतिरिक्त कारण हे सत्याचा शोध घेण्याचे प्रमुख अस्त्र असू शकत नाही. ज्याप्रमाणे सत्याचे अनेक पैलू आहेत, त्याचप्रमाणे माणसांचेही अनेक पैलू आहेत. भौतिक शरीर हे सात शरीरांपैकी फक्त एकच शरीर आहे. न बघितलेल्या सत्याशी संबंधित असलेली अतिंद्रिय शरीरे ही माणसाच्या भौतिक शरीराचाच भाग आहेत. त्याचा आपण अधिक गंभीरपणे विचार केला पाहिजे व त्याला समजून घेतले पाहिजे.

जीवनात नुसते वाहत जाण्यापेक्षा सत्याच्या पलीकडील भाग उलगडून बघितला पाहिजे. ध्यानधारणा शरीरातील ऊर्जाचक्रे चालू करतात व योग व प्राणायाम यात आपली मदत करतात. जास्त शक्ती प्रदान करताना व तणाव कमी करतानाच ती आपल्याला अंतर्दृष्टी देते व आपणास आपली कामे व्यवस्थित करण्यास मदत करते. ती मेंदू व मज्जासंस्था जागृत करतात व जीवनप्रवाह वाढविण्यास मदत करतात. दैवी जागृतावस्थेत पोहोचलेला माणूस आपल्या व दुसºयांच्या भविष्यात डोकावू शकतो. भौगोलिक संपत्तीपेक्षा दैवी संपत्ती खूप मोठी संपत्ती आहे. हाही एक महत्त्वाचा विचार आहे. तसेच त्या अनुषंगाने आपल्याला एका वेगळ्या मानसिकतेकडे जाण्याची वाट आढळून येते. भौगोलिक संपत्तीमुळे तत्कालिक सुख मिळते तर दैवी संपत्तीमुळे मानसिक समाधानाची परिसीमा गाठली जाते. या मानसिक स्थितीचे मोल त्या अवस्थेचे महत्त्व समजणारेच जाणू शकतात.

गूढवादाला एक चांगली व वाईट बाजूही आहे. त्याच्या अस्तित्वाला नाकारण्यापेक्षा त्याच्या चांगल्या बाजू विचारात घेऊन काम करणे कधीही चांगले. आपल्या जगाच्या आत असंख्य जगे आहेत व भौतिक परिस्थितीपलीकडेच खरे सत्य आहे. आपण मानव या सत्यापासून व दैवी शक्तींपासून फार दूर राहू शकत नाही, हे प्रत्येकाने विचारात घेतले पाहिजे.दैवी शक्तीबाबत आसक्ती असली की मनुष्य त्याबाबत अधिकाधिक जाणून घेण्यास इच्छुक असतो. त्याबाबत सखोल चिंतन केल्यास भौतिक सुखांबाबत फारसा मोह राहत नाही. जसजसे दैवी शक्तींबाबत ज्ञान प्राप्त होत जाते तसतसे मनुष्याचे अवगुण गळून पडू लागतात आणि गुणांचा आविष्कार वाढत जातो. दैवी शक्ती आणि भौतिक सुखांची तुलना करीत गेल्यास त्यातील जमीन-अस्मानाचा फरक स्पष्टपणे जाणवू लागतो.