शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

नामाच्या अनुसंधानातूनच होतो भगवंताचा दिव्य साक्षात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 13:13 IST

आत्मनिवेदनात प्रवेश करणाऱ्या भक्ताच्या ठिकाणीच सर्वात्मक भाव निर्माण होतो..!

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

सर्वांभूती भगवद् भाव हेच श्रीमद् भागवताचे प्रधान भक्तिसूत्र आहे. शांतीसागर एकनाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात,

सर्वांभूती भगवद् भावोया नाव मुख्य भक्ती पहा होतो सांगाती झालिया स्वयमेवोकाम क्रोध मोहो न शकती बाधु

आता प्रश्न असा आहे की, हा सर्वात्म भाव कसा प्राप्त होतो..? तो प्राप्त होण्याचे साधन कोणते..? सज्जनहो..! हा सर्वात्म भाव सहजासहजी प्राप्त होत नाही. त्यासाठी अविरत साधना करावी लागते. सामान्य प्रापंचिक माणसाला हा भाव प्राप्त होण्यासाठी पिपीलिका मार्गानेच जावे लागते. हा सर्वात्म भाव प्राप्त होण्यासाठी एकनाथ महाराजांनी सात प्रधान पायर्‍या सांगितल्या आहेत.1)अनुताप2)अनुग्रह3)अनुकरण4)अनुसंधान5)अनुराग 6)अनन्य भाव 7)आत्मनिवेदनयाच त्या पायर्‍या आहेत. आता क्रमशः यांचे थोडक्यात विवरण करू...!परमार्थ साधनेला अनुतापापासून प्रारंभ होतो. त्रिविध तापाने त्रस्त झाल्याने व विषय सुखाचा वीट आल्यानेच साधक भगवद् भक्तीकडे ओढला जातो मग त्याला संत साहित्याचे श्रवण घडते. या श्रवणामुळे साधकात विवेक जागृत होतो. विवेक जागृत झाल्यामुळे संसाराविषयी तिरस्कार व परमेश्वराविषयी परमप्रेम त्याच्यात निर्माण होते. या प्रक्रियेलाच अनुताप असे म्हणतात असा अनुताप निर्माण झाला म्हणजे साधक अनुग्रहाकरिता सद्गुरु कडे जातो व त्यांच्या मार्गदर्शनाखाली परमार्थाची वाटचाल करतो. सद्गुरु साधकाला उपदेश करतात,

तेचिं उपदेश लक्षण वाचेसि माझे नाम कीर्तन शरीरी माझे नित्य भजन मद्रूपी मन निमग्न सदासद्गुरुच्या कृपेने साधकात नामसंकीर्तनाविषयी प्रेम, श्रद्धा, निष्ठा वाढत जाते व परमेश्वराविषयी अनुराग वाढत जातो. सद्गुरु कृपेने भक्ती दृढ, निष्ठ बनली म्हणजे साधक चढत्या वाढत्या प्रेमाने परमार्थ प्राप्तीची साधना करू लागतो. तो सद्गुरुचे अनुकरण करू लागतो. सद्गुरु जसे सदैव आत्मचिंतनात निमग्न असतात तसे साधक देखील वागू लागतो अशा प्रकारे सद्गुरुचे अनुकरण साधकाच्या भक्ती वाढीस पोषकच ठरते. नामाच्या अनुसंधानात त्याला भगवंताचा दिव्य साक्षात्कार होतो. नाम घेता घेता नाम धारकाची प्रतिभा जागृत होते. आणि ह्रदयस्थ परमेश्वराचे त्याला दर्शन होते मग साधक अनन्य भावाने भगवंताचीच भक्ती करू लागतो. अनन्य भक्ती दृढ झाल्यावर भक्त हा आत्मनिवेदनात प्रवेश करतो, असा हा क्रम आहे. आत्मनिवेदनात प्रवेश करणाऱ्या भक्ताच्या ठिकाणीच सर्वात्मक भाव निर्माण होतो..!

( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांचा संपर्क क्रंमांक - 8329878467 ) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक