शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

नामाच्या अनुसंधानातूनच होतो भगवंताचा दिव्य साक्षात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 13:13 IST

आत्मनिवेदनात प्रवेश करणाऱ्या भक्ताच्या ठिकाणीच सर्वात्मक भाव निर्माण होतो..!

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

सर्वांभूती भगवद् भाव हेच श्रीमद् भागवताचे प्रधान भक्तिसूत्र आहे. शांतीसागर एकनाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात,

सर्वांभूती भगवद् भावोया नाव मुख्य भक्ती पहा होतो सांगाती झालिया स्वयमेवोकाम क्रोध मोहो न शकती बाधु

आता प्रश्न असा आहे की, हा सर्वात्म भाव कसा प्राप्त होतो..? तो प्राप्त होण्याचे साधन कोणते..? सज्जनहो..! हा सर्वात्म भाव सहजासहजी प्राप्त होत नाही. त्यासाठी अविरत साधना करावी लागते. सामान्य प्रापंचिक माणसाला हा भाव प्राप्त होण्यासाठी पिपीलिका मार्गानेच जावे लागते. हा सर्वात्म भाव प्राप्त होण्यासाठी एकनाथ महाराजांनी सात प्रधान पायर्‍या सांगितल्या आहेत.1)अनुताप2)अनुग्रह3)अनुकरण4)अनुसंधान5)अनुराग 6)अनन्य भाव 7)आत्मनिवेदनयाच त्या पायर्‍या आहेत. आता क्रमशः यांचे थोडक्यात विवरण करू...!परमार्थ साधनेला अनुतापापासून प्रारंभ होतो. त्रिविध तापाने त्रस्त झाल्याने व विषय सुखाचा वीट आल्यानेच साधक भगवद् भक्तीकडे ओढला जातो मग त्याला संत साहित्याचे श्रवण घडते. या श्रवणामुळे साधकात विवेक जागृत होतो. विवेक जागृत झाल्यामुळे संसाराविषयी तिरस्कार व परमेश्वराविषयी परमप्रेम त्याच्यात निर्माण होते. या प्रक्रियेलाच अनुताप असे म्हणतात असा अनुताप निर्माण झाला म्हणजे साधक अनुग्रहाकरिता सद्गुरु कडे जातो व त्यांच्या मार्गदर्शनाखाली परमार्थाची वाटचाल करतो. सद्गुरु साधकाला उपदेश करतात,

तेचिं उपदेश लक्षण वाचेसि माझे नाम कीर्तन शरीरी माझे नित्य भजन मद्रूपी मन निमग्न सदासद्गुरुच्या कृपेने साधकात नामसंकीर्तनाविषयी प्रेम, श्रद्धा, निष्ठा वाढत जाते व परमेश्वराविषयी अनुराग वाढत जातो. सद्गुरु कृपेने भक्ती दृढ, निष्ठ बनली म्हणजे साधक चढत्या वाढत्या प्रेमाने परमार्थ प्राप्तीची साधना करू लागतो. तो सद्गुरुचे अनुकरण करू लागतो. सद्गुरु जसे सदैव आत्मचिंतनात निमग्न असतात तसे साधक देखील वागू लागतो अशा प्रकारे सद्गुरुचे अनुकरण साधकाच्या भक्ती वाढीस पोषकच ठरते. नामाच्या अनुसंधानात त्याला भगवंताचा दिव्य साक्षात्कार होतो. नाम घेता घेता नाम धारकाची प्रतिभा जागृत होते. आणि ह्रदयस्थ परमेश्वराचे त्याला दर्शन होते मग साधक अनन्य भावाने भगवंताचीच भक्ती करू लागतो. अनन्य भक्ती दृढ झाल्यावर भक्त हा आत्मनिवेदनात प्रवेश करतो, असा हा क्रम आहे. आत्मनिवेदनात प्रवेश करणाऱ्या भक्ताच्या ठिकाणीच सर्वात्मक भाव निर्माण होतो..!

( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांचा संपर्क क्रंमांक - 8329878467 ) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक