शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

विरहभक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 03:12 IST

कृष्ण मथुरेला गेला. कंसाचा वध केला, पण गोकुळात परत आला नाही. तरी गोपींबद्दल त्याच्या मनात काळजी होतीच.

- शैलजा शेवडेकृष्ण मथुरेला गेला. कंसाचा वध केला, पण गोकुळात परत आला नाही. तरी गोपींबद्दल त्याच्या मनात काळजी होतीच. त्या आपल्या विरहात वेड्या झाल्या असतील, ही जाणीव होतीच. म्हणून त्याने आपल्या मित्राला, उद्धवाला, जो खूप ज्ञानी-थोडा अहंकारी होता. त्याला गोकुळात पाठविले. हेतू हाच की, त्याला भक्ती म्हणजे नेमके काय, ते कळावे. उद्धव गोकुळात आला. गोपींना भेटला. कृष्णाचा सखा आपल्यासमोर असल्याचे पाहताच त्यांच्या भावनांचा बंध सुटला. त्या रडू लागल्या. रडता-रडता म्हणू लागल्या, ‘कृष्ण मथुरेला जाऊन आम्हाला विसरला. तिथे त्याला सुंदर स्त्रिया भेटल्या असतील, ज्या त्याच्यावर मोहीत झाल्या असतील. तो का आमची आठवण काढेल.’ तेवढ्यात तिथे एक भुंगा आला. कृष्णविरहात दग्ध गोपीला तो भुंगा कृष्णाचा दूत वाटला. त्याला उद्देशून उपरोधिक स्वरात म्हणू लागली,जा जा जा मधुकरा, कृष्णदूता भ्रमरा,स्पर्शू नको चरणांना अमुच्या, चंचला भ्रमरा,गुंजारव की गीत तुझे हे, गुणवर्णन कृष्णाचे,दाखव गाऊनी त्याच्या सांप्रतच्या प्रियतमांनाकृष्णापरी तू कपटी चंचल, समजले आम्हाला,सुमनामधला सेवून मधु तो, सहजच त्यागी त्यालामधुर बोलुनी, अनुनय करसी, ओळखले परी तुला,त्या कृष्णाचा दूत तू असशी, तशाच तुझ्याही लीलागोपींचा तो उत्कंठीत भाव बघून उद्धवाने त्यांची स्तुती केली. कृष्णाचा निरोप दिला. ‘गोपींनो, मी सर्वत्र आत्मरूपाने असल्यामुळे तुमचा आणि माझा वियोग संभवत नाही. विरहामुळे तुम्हाला माझा अहर्निश ध्यास लागून तुमचे मन वेगाने माझ्याकडे ओढले जावे. तुम्ही अहर्निश माझे स्मरण करा. म्हणजे लवकरच माझ्या स्वरूपाला प्राप्त व्हाल.’ कृष्णाचा तो संदेश ऐकून गोपींचे विरहदु:ख नाहीसे झाले. श्रीकृष्ण आपल्या अंतर्यामी नित्य आहे, हे जाणून त्यांनी गुरुबुद्धीने उद्धवाची पूजा केली.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक