शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

त्यागावाचून वैराग्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 05:19 IST

मध्ययुगीन संत लौकिकात जन्माला आले, लौकिकात वाढले, पण मुक्कामी पोहोचताना मात्र पारलौकिकाच्या चिरंतन स्थानातील मुक्कामापर्यंत पोहोचले.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेमध्ययुगीन संत लौकिकात जन्माला आले, लौकिकात वाढले, पण मुक्कामी पोहोचताना मात्र पारलौकिकाच्या चिरंतन स्थानातील मुक्कामापर्यंत पोहोचले. सच्चिदानंदाच्या कंदातील ब्रह्मानंदाचा अशब्द अनुभव स्वत: चाखता-चाखता ‘सेवितो हा रस वाटितो आणिका’ या नम्र भावनेने आपल्या अनुभवाचे प्रकटीकरण जनता जनार्दनासमोर केले. हे सारे करीत असताना संतांनी प्रथम समाजाची मनोभूमिका तयार करण्याचे कठीण कार्य केले अन् मगच त्यावर उदात्त जीवनमूल्यांचे संस्कार केले. समता, ममता, मानवतावाद, विश्वबंधुत्व यांसारखी जीवनमूल्ये जर समाज जीवनात रुजायची झाली, तर वैराग्यसंपन्न वा अपरिग्रही सत्पुरुषांची समाजाला गरज आहे. वैयक्तिक पातळीवरील पारमार्थिक हित जर साध्य करायचे असेल, तरीही अपग्रह अथवा त्यागाची गरज आहे. अनुकूल सुखाच्या भोगांचा जाणीवपूर्वक त्याग करण्याच्या मनोवृत्तीला आध्यात्मिक परिभाषेत ‘वैराग्य’ म्हणून संबोधण्यात येते. परमार्थाच्या क्षेत्रात साधकास अधिकारी होण्यासाठी विवेक, वैराग्य, भक्ती, शांती, दमन, बोधवृत्ती, ईश्वरप्रीती आदी सद्गुणांची कास धरावीच लागेल. परमार्थाच्या क्षेत्रात साधकास अधिकाराची पायरी न चढताच, केवळ टिळे, टोपी, माळा यांची भाऊगर्दी वाढू लागली, तर या गर्दीस केवळ देवत्वाचाच नव्हे, तर साध्या मनुष्यत्वाचासुद्धा विसर पडतो. भोगलालसेने बरबटलेला दुसऱ्याच्या श्रमावर डोळा ठेवून श्रम न करताच गर्भश्रीमंत होणारा, ‘न बाप बडा न भैय्या, सबसे बडा रुपय्या’ असे जीवन जगणाºयास अत्यंत पारमार्थिक विचारांचे शोधन तर सोडाच, साधे संसारातसुद्धा सन्मानाने जगता येत नाही. साधकाच्या साधन मार्गाच्या जीवनसूत्रीचे वर्णन करताना संत नामदेव महाराज म्हणाले होते,त्यागेवीण विरक्ति । प्रेमा वाचुनि भक्ति ।शांती नसता ज्ञाप्ती । शोभा न पवे ।दमने वाचुनि यति । मानावीण भूमिपती ।युगी नसता युक्ति । शोभा न पवे ।बहिर्मुख कविमती । नेमावाचुनि कृति ।बोधेवीण महंती । शोभा न पवें ।।जोपर्यंत निस्सीम भावाचा ज्ञानबोध फळाला येत नाही, तोपर्यंत महंतपदास कधीच शोभा येऊ शकत नाही. यासाठीच तर साधकास काही अनुकूल भोगाचा जाणीवपूर्वक त्याग करावा लागतो. कारण त्यागाशिवाय ज्ञानाला काडीचाही अर्थ शिल्लक राहत नाही. यासाठी गरज आहे ती वैराग्य भावनेची.