शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

त्यागावाचून वैराग्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 05:19 IST

मध्ययुगीन संत लौकिकात जन्माला आले, लौकिकात वाढले, पण मुक्कामी पोहोचताना मात्र पारलौकिकाच्या चिरंतन स्थानातील मुक्कामापर्यंत पोहोचले.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेमध्ययुगीन संत लौकिकात जन्माला आले, लौकिकात वाढले, पण मुक्कामी पोहोचताना मात्र पारलौकिकाच्या चिरंतन स्थानातील मुक्कामापर्यंत पोहोचले. सच्चिदानंदाच्या कंदातील ब्रह्मानंदाचा अशब्द अनुभव स्वत: चाखता-चाखता ‘सेवितो हा रस वाटितो आणिका’ या नम्र भावनेने आपल्या अनुभवाचे प्रकटीकरण जनता जनार्दनासमोर केले. हे सारे करीत असताना संतांनी प्रथम समाजाची मनोभूमिका तयार करण्याचे कठीण कार्य केले अन् मगच त्यावर उदात्त जीवनमूल्यांचे संस्कार केले. समता, ममता, मानवतावाद, विश्वबंधुत्व यांसारखी जीवनमूल्ये जर समाज जीवनात रुजायची झाली, तर वैराग्यसंपन्न वा अपरिग्रही सत्पुरुषांची समाजाला गरज आहे. वैयक्तिक पातळीवरील पारमार्थिक हित जर साध्य करायचे असेल, तरीही अपग्रह अथवा त्यागाची गरज आहे. अनुकूल सुखाच्या भोगांचा जाणीवपूर्वक त्याग करण्याच्या मनोवृत्तीला आध्यात्मिक परिभाषेत ‘वैराग्य’ म्हणून संबोधण्यात येते. परमार्थाच्या क्षेत्रात साधकास अधिकारी होण्यासाठी विवेक, वैराग्य, भक्ती, शांती, दमन, बोधवृत्ती, ईश्वरप्रीती आदी सद्गुणांची कास धरावीच लागेल. परमार्थाच्या क्षेत्रात साधकास अधिकाराची पायरी न चढताच, केवळ टिळे, टोपी, माळा यांची भाऊगर्दी वाढू लागली, तर या गर्दीस केवळ देवत्वाचाच नव्हे, तर साध्या मनुष्यत्वाचासुद्धा विसर पडतो. भोगलालसेने बरबटलेला दुसऱ्याच्या श्रमावर डोळा ठेवून श्रम न करताच गर्भश्रीमंत होणारा, ‘न बाप बडा न भैय्या, सबसे बडा रुपय्या’ असे जीवन जगणाºयास अत्यंत पारमार्थिक विचारांचे शोधन तर सोडाच, साधे संसारातसुद्धा सन्मानाने जगता येत नाही. साधकाच्या साधन मार्गाच्या जीवनसूत्रीचे वर्णन करताना संत नामदेव महाराज म्हणाले होते,त्यागेवीण विरक्ति । प्रेमा वाचुनि भक्ति ।शांती नसता ज्ञाप्ती । शोभा न पवे ।दमने वाचुनि यति । मानावीण भूमिपती ।युगी नसता युक्ति । शोभा न पवे ।बहिर्मुख कविमती । नेमावाचुनि कृति ।बोधेवीण महंती । शोभा न पवें ।।जोपर्यंत निस्सीम भावाचा ज्ञानबोध फळाला येत नाही, तोपर्यंत महंतपदास कधीच शोभा येऊ शकत नाही. यासाठीच तर साधकास काही अनुकूल भोगाचा जाणीवपूर्वक त्याग करावा लागतो. कारण त्यागाशिवाय ज्ञानाला काडीचाही अर्थ शिल्लक राहत नाही. यासाठी गरज आहे ती वैराग्य भावनेची.