शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण् - भाग १७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 17:35 IST

जीवनविद्या मिशनमध्ये येणा-यांना जीवन जगणे ही कला आहे हे आम्ही सर्वात आधी शिकवितो.आणि हे आता शिकवितो असे नाही तर गेले कित्येक वर्षे हे आम्ही लोकांना शिकवित आहोत.मी नेहमी सांगतो जीवन जगणे

- सदगुरू श्रीवामनराव पै

जन्मापासूनच प्रवास सुरू आहे.

जीवनविद्या मिशनमध्ये येणा-यांना जीवन जगणे ही कला आहे हे आम्ही सर्वात आधी शिकवितो.आणि हे आता शिकवितो असे नाही तर गेले कित्येक वर्षे हे आम्ही लोकांना शिकवित आहोत.मी नेहमी सांगतो जीवन जगणे ही कला आहे हे तू आधी शिकून घे.कारण जीवन जगणे ही कला आहे हे आज कुणीच सांगत नाही. ना आईवडिल, ना शिक्षक, ना प्रोफेसर, ना धर्ममार्तंड, ना राजकारणी कुणीच असे सांगत नाही.हे फक्त जीवनविद्या मिशनच सांगते.जीवन जगणे ही कला आहे व या कलेत फक्त ध्यान लावणे एवढीच गोष्ट शिकवली जात नाही.लोकांना वाटते की ध्यान लावले, मेडिटेशन केले, डोळे मिटून बसले किंवा मौन धारण केले की जीवनातले सगळे प्रश्न सुटतील.याने तुमच्या जीवनातले प्रश्न सुटणार नाहीत हे नेहमी लक्षात ठेवा.जीवनातले प्रश्न सुटण्यासाठी ज्ञानच पाहिजे.हे ज्ञान कसले तर हे ज्ञान व्यवहारिक, पुस्तकी, आत्मज्ञान असे सर्व प्रकारचे ज्ञान पाहिजे.ज्ञान म्हणजे माहिती इतके ते मर्यादित नसू नये.ज्ञान म्हणजे माहिती व ती सर्वांना मिळालीच पाहिजे कारण ही माहिती जितकी अधिक तितके त्याचे जीवन सुसह्य होते.माहितीज्ञान नसेल तर त्या माणसाला परिस्थितीकडून मार मिळण्याची शक्यता अधिक जास्त असते.उदाहरण द्यायचे झाले तर एखादयाला दिल्लीला जायचे असेल व कुठल्या गाडीत बसायची ही जर माहिती त्याला नसेल तर त्याची जी वाट लागते.असे खरंतर आपले झालेले आहे.आपण प्रवासाला निघालेले आहोत व अज्ञानाच्या गाडीत बसलेले आहोत.कुठे जायचे आहे, कसे जायचे आहे, कधी पोहचायचे आहे याचे काहीच ज्ञान नाही आणि आम्ही प्रवास करतो आहोत.लोक म्हणतात एकेक दिवस ढकलतो आहे. कोणाला जर विचारले की  काय गोविंदराव कसे चाललेले आहे?यावर ते काय सांगतात काय सांगू वामनराव एकेक दिवस ढकलतो आहोत.दुसरे रामराव त्यांना विचारले कसे काय रामराव?तर ते म्हणतात मरत नाही म्हणून जगतो आहोत.याला काय जीवन म्हणतात का? आपण जर नीट विचार केला तर माणूस जन्माला येतो तिथून त्याचा प्रवास सुरू होतो.पुर्नजन्म जर मानला तर असा अनेक जन्मापासून प्रवास सुरू आहे.किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित असे म्हटले जाते.पुर्नजन्म जावू दे आपण सध्याच्या जन्माचा विचार केला तरी जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याचा प्रवास सुरू असतो.हा प्रवास मी कशासाठी करायचा आहे? मी जन्माला आलोच का? मला जन्माला घातले ते का घातले? इथे परमेश्वराचा संबंध काय?जर त्याने आम्हांला जन्माला घातले तर तो आमची बाकीची सोय का करत नाही ? असे परमेश्ववराला दोष देणारे अनेक लोक आहेत.