शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 2

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:11 IST

पुष्कळ वेळी माणूस कारण नसताना दु:खी होतो.पुरातन काळापासून म्हणजे अगदी त्रेतायुग ते द्वापारयुग व आता कलीयुगापर्यंत सर्वांचा हाच अनुभव आहे

- सदगुरू श्री वामनराव पैपुष्कळ वेळी माणूस कारण नसताना दु:खी होतो.पुरातन काळापासून म्हणजे अगदी त्रेतायुग ते द्वापारयुग व आता कलीयुगापर्यंत सर्वांचा हाच अनुभव आहे दु:खी होणे सोपे व सुखी होणे कठीण.असे असताना सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण असे आम्ही सांगतो हयाचे कारण असे की, आपण जीवन जगत असताना ज्या त-हेने जीवन जगले पाहिजे त्या त-हेने आपण जीवन जगत नाही.आपल्या मनात काही विचित्र कल्पना असतात भावना असतात.तसेच काही धारणा झालेल्या असतात व संकल्पना झालेल्या असतात.पूर्वजन्मीच्या हया सर्व गोष्टी घेऊनच आपण या जन्माला आलेले असतो. आत्ताच्या आपल्या जन्मानंतर आपल्यावर विविध संस्कार होतात.हे संस्कार आपल्या पूर्वीच्या संस्कारांना सिमेंट काँक्रिट करतात व मरताना पून्हा आपण हे संस्कारच घेऊन पुढील जन्मामध्ये जातो| पुन्हा जन्माला येतो तेव्हा पुन्हा तेच.म्हणून संत  तुकाराम महाराज म्हणतात,“किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित” हयातून सुटका करून घ्यायची असेल तर आधी माणूस सुखी का होतो? व माणूस दु:खी का होतो? हे समजून घेतले पाहिजे तसेच मनुष्य सुखी केव्हा होतो व दु:खी केव्हा होतो हे देखील समजून घेतले पाहिजे.या सर्वातून एक गोष्ट आपल्या लक्षांत येईल की पुष्कळ क्षणी माणूस कारण नसताना दु:खी होतो. खरंतर कारण काहीच नसते तरी देखील आपण दु:खी होत असतो.घरात सर्व रेलचेल असते.घरात काहीही कमी नसते.श्रीमंती ओतप्रोत भरलेली असते.घरातले कपाट अक्षरश: नोटांनी भरलेले असते.पण तरिही माणूस दु:खी असतो.एका माजी मंत्र्याच्या घरात नोटांनी भरलेल्या गोणी सापडल्या.सांगण्याचा उद्दीष्ट हा की असे सगळं असताना सुध्दा म्हणजे श्रीमंती आहे, मुलेबाळे आहेत,सुनाजावई आहेत तरी माणसे दु:खी असतात.ज्याच्याकडे काही नाही तो जर दु:खी झाला तर एकवेळ आपण समजू शकतो.ज्याला रहायला घर नाही किंवा ज्याला खायला देखील मिळत नाही,ज्याला अगदी प्यायलाही मिळत नाही.आता इथे प्यायला म्हणजे पाणी मिळत नाही हे लक्षात घ्या नाहीतर बाकीचे पिणे कुठेही सहज मिळते.देव सर्वव्यापी आहे असे म्हणतात तसं दारू सर्वव्यापी असे म्हटलं पाहिजे.मला माहित नाही पण लोक असं म्हणतात की,”कुठेही जा दारू तुम्हांला कुठेही सहज मिळेल म्हणजे अगदी जिथे दारूबंदी आहे तिथेसुध्दा दारू मिळू शकते.या जगात आज दारू पिणारे लोक 99 टक्के आहेत व जे लोक दारू पित नाहीत त्यांना हे लोक हसतात, त्यांची निंदा करतात,कुचेष्टा करतात.दारूचे इतके महात्म्य वाढलेले आहे हे आश्चर्य करण्यासारखे आहे.गडकयांच्या एकच प्याला नाटकात तो तळीराम काय म्हणतो की ,मी एक मंडळ स्थापन केलेले आहे व आमच्या मंडळाचे ध्येय काय तर जगांत दारू सर्वत्र पोहचावी.गडकरी हे विनोदी नाटककार होते.त्यांनी जी नाटके लिहिली ती वाचली किंवा पाहिली तर अशी नाटके पुन्हा होणे नाही असे वाटते.त्यांनी लिहीलेले संवाद मोठे असायचे ते आताच्या लोकांना पाठही होणार नाहीत.पण असा माणूस देखील असे लिहून ठेवतो.