शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 2

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:11 IST

पुष्कळ वेळी माणूस कारण नसताना दु:खी होतो.पुरातन काळापासून म्हणजे अगदी त्रेतायुग ते द्वापारयुग व आता कलीयुगापर्यंत सर्वांचा हाच अनुभव आहे

- सदगुरू श्री वामनराव पैपुष्कळ वेळी माणूस कारण नसताना दु:खी होतो.पुरातन काळापासून म्हणजे अगदी त्रेतायुग ते द्वापारयुग व आता कलीयुगापर्यंत सर्वांचा हाच अनुभव आहे दु:खी होणे सोपे व सुखी होणे कठीण.असे असताना सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण असे आम्ही सांगतो हयाचे कारण असे की, आपण जीवन जगत असताना ज्या त-हेने जीवन जगले पाहिजे त्या त-हेने आपण जीवन जगत नाही.आपल्या मनात काही विचित्र कल्पना असतात भावना असतात.तसेच काही धारणा झालेल्या असतात व संकल्पना झालेल्या असतात.पूर्वजन्मीच्या हया सर्व गोष्टी घेऊनच आपण या जन्माला आलेले असतो. आत्ताच्या आपल्या जन्मानंतर आपल्यावर विविध संस्कार होतात.हे संस्कार आपल्या पूर्वीच्या संस्कारांना सिमेंट काँक्रिट करतात व मरताना पून्हा आपण हे संस्कारच घेऊन पुढील जन्मामध्ये जातो| पुन्हा जन्माला येतो तेव्हा पुन्हा तेच.म्हणून संत  तुकाराम महाराज म्हणतात,“किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित” हयातून सुटका करून घ्यायची असेल तर आधी माणूस सुखी का होतो? व माणूस दु:खी का होतो? हे समजून घेतले पाहिजे तसेच मनुष्य सुखी केव्हा होतो व दु:खी केव्हा होतो हे देखील समजून घेतले पाहिजे.या सर्वातून एक गोष्ट आपल्या लक्षांत येईल की पुष्कळ क्षणी माणूस कारण नसताना दु:खी होतो. खरंतर कारण काहीच नसते तरी देखील आपण दु:खी होत असतो.घरात सर्व रेलचेल असते.घरात काहीही कमी नसते.श्रीमंती ओतप्रोत भरलेली असते.घरातले कपाट अक्षरश: नोटांनी भरलेले असते.पण तरिही माणूस दु:खी असतो.एका माजी मंत्र्याच्या घरात नोटांनी भरलेल्या गोणी सापडल्या.सांगण्याचा उद्दीष्ट हा की असे सगळं असताना सुध्दा म्हणजे श्रीमंती आहे, मुलेबाळे आहेत,सुनाजावई आहेत तरी माणसे दु:खी असतात.ज्याच्याकडे काही नाही तो जर दु:खी झाला तर एकवेळ आपण समजू शकतो.ज्याला रहायला घर नाही किंवा ज्याला खायला देखील मिळत नाही,ज्याला अगदी प्यायलाही मिळत नाही.आता इथे प्यायला म्हणजे पाणी मिळत नाही हे लक्षात घ्या नाहीतर बाकीचे पिणे कुठेही सहज मिळते.देव सर्वव्यापी आहे असे म्हणतात तसं दारू सर्वव्यापी असे म्हटलं पाहिजे.मला माहित नाही पण लोक असं म्हणतात की,”कुठेही जा दारू तुम्हांला कुठेही सहज मिळेल म्हणजे अगदी जिथे दारूबंदी आहे तिथेसुध्दा दारू मिळू शकते.या जगात आज दारू पिणारे लोक 99 टक्के आहेत व जे लोक दारू पित नाहीत त्यांना हे लोक हसतात, त्यांची निंदा करतात,कुचेष्टा करतात.दारूचे इतके महात्म्य वाढलेले आहे हे आश्चर्य करण्यासारखे आहे.गडकयांच्या एकच प्याला नाटकात तो तळीराम काय म्हणतो की ,मी एक मंडळ स्थापन केलेले आहे व आमच्या मंडळाचे ध्येय काय तर जगांत दारू सर्वत्र पोहचावी.गडकरी हे विनोदी नाटककार होते.त्यांनी जी नाटके लिहिली ती वाचली किंवा पाहिली तर अशी नाटके पुन्हा होणे नाही असे वाटते.त्यांनी लिहीलेले संवाद मोठे असायचे ते आताच्या लोकांना पाठही होणार नाहीत.पण असा माणूस देखील असे लिहून ठेवतो.