शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग २०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 20:46 IST

मानव जातीचे अज्ञान जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आपण कितीही  म्हटले लोक सुखी व्हावेत तरी ते सुखी होणे शक्य नाही.यासाठी काय केले पाहिजे? यासाठी आपण आपल्या ठिकाणी असलेले अज्ञान दूर केले पाहिजे.

- सदगुरू श्री|वामनराव पै

सुखाचा प्रवास.

मानव जातीचे अज्ञान जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आपण कितीही  म्हटले लोक सुखी व्हावेत तरी ते सुखी होणे शक्य नाही.यासाठी काय केले पाहिजे? यासाठी आपण आपल्या ठिकाणी असलेले अज्ञान दूर केले पाहिजे.जगाचे अज्ञान कोण दूर करणार? जगाचे अज्ञान दूर करणे हे काही आपल्या हातात नाही पण आपले अज्ञान दूर करणे हे आपल्या हातात आहे.आपले अज्ञान तरी आपण दूर करू शकतो.आपले अज्ञान दूर कधी होईल? जेव्हा आपण कुणाकडून तरी ज्ञान घेणार तेव्हा आपले अज्ञान दूर होईल.आम्ही कुणाकडूनच ज्ञान घेणार नाही असे म्हटले तर हा कायमचे अज्ञानीच रहाणार.काही लोक म्हणतात आम्ही व देव यांच्यामध्ये आम्हाला कुणी दलाल नको.थोडक्यात सदगुरुंना ते दलाल म्हणतात.आमचा थेट संबंध देवाकडे असे म्हणतात पण असे होवू शकते का? तर असे होवू शकत नाही.कारण साधे मंत्रालयातील ऑफिसरकडे जायचे तर तिथे दारावर शिपाई असतो.त्याने तुम्हांला आत सोडले तर तुम्ही आत जाऊ शकता.इथे हे असे आहे तर परमेश्वराच्या दरबारात, परमेश्वराच्या प्रांतात थेट प्रवेश कसा होवू शकेल.तिथे कुणी मार्गदर्शक नको का? प्रवासात मार्गदर्शक खूप महत्वाचा असतो.आपण प्रवासाला निघतो तेव्हा पहिले रिझर्वेशन करतो.जे शहाणे असतात ते प्रवासाला निघताना पहिले रिझर्वेशन करतात.रिझर्वेशन शिवाय प्रवास करणे म्हणजे मूर्खपणाचा कळस होय.प्रवासाला निघताना आपण त्या व्यक्तीला सांगतो. पहिले रिझर्वेशन कर,गाडी कुठली हे नीट समजावून घे,ते सुध्दा योग्य माणसाकडून समजावून घेत आहेस हयाची खात्री करून घे,नाहीतर सांगणारा चुकीचे सांगत असेल तर प्रवास चुकीचा होईल.योग्य माणसाकडून गाडी कुठली, प्लॅटफॉर्म कुठला, डबा कुठला हे समजावून घे मग काहीच त्रास नाही, कटकट नाही, प्रवास अगदी आनंदाचा होईल.अगदी झोपायला नाही मिळाले तरी बसून डुलकी तर घेवू शकशील.याउलट गाडी चुकली, डबा चुकला,प्लॅटफॉर्म चुकला, वेळ चुकली तर काही लोक वेळेत जात नाहीत गाडी आठला सुटणार असेल तर हे शेवटपर्यंत गाडीपर्यंत पोहचतच नाहीत आणि मग धावपळ करून गाडी पकडण्याचा प्रयत्न करतात त्यात कधी सामान पडते तर कधी हेच पडतात कधी पायच गाडीखाली जातो.आता हे सर्व व्याप करण्यापेक्षा अर्धातास अगोदर जाऊन बसा ना.घरी बसणार ते तिथे जावून बसा.काही लोक म्हणतात अगोदर कशाला जाऊन बसायचे.घरी बसून तरी काय करणार त्यापेक्षा तिथे अर्धा तास अगोदर जाऊन बस.मी कुठेही जायचे असेल तर अर्धा तास आधी स्टेशनवर जातो.घाई घाईने प्रवास करायचाच नाही.याला म्हणतात सुखाचा प्रवास.