शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा भडका ? कोंढव्यात गोळीबार; एकाचा मृत्यू
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
4
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
5
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
6
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
7
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
8
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
9
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
10
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
11
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
12
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
13
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
14
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
15
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
16
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
17
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
18
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
19
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
20
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग २०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 20:46 IST

मानव जातीचे अज्ञान जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आपण कितीही  म्हटले लोक सुखी व्हावेत तरी ते सुखी होणे शक्य नाही.यासाठी काय केले पाहिजे? यासाठी आपण आपल्या ठिकाणी असलेले अज्ञान दूर केले पाहिजे.

- सदगुरू श्री|वामनराव पै

सुखाचा प्रवास.

मानव जातीचे अज्ञान जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आपण कितीही  म्हटले लोक सुखी व्हावेत तरी ते सुखी होणे शक्य नाही.यासाठी काय केले पाहिजे? यासाठी आपण आपल्या ठिकाणी असलेले अज्ञान दूर केले पाहिजे.जगाचे अज्ञान कोण दूर करणार? जगाचे अज्ञान दूर करणे हे काही आपल्या हातात नाही पण आपले अज्ञान दूर करणे हे आपल्या हातात आहे.आपले अज्ञान तरी आपण दूर करू शकतो.आपले अज्ञान दूर कधी होईल? जेव्हा आपण कुणाकडून तरी ज्ञान घेणार तेव्हा आपले अज्ञान दूर होईल.आम्ही कुणाकडूनच ज्ञान घेणार नाही असे म्हटले तर हा कायमचे अज्ञानीच रहाणार.काही लोक म्हणतात आम्ही व देव यांच्यामध्ये आम्हाला कुणी दलाल नको.थोडक्यात सदगुरुंना ते दलाल म्हणतात.आमचा थेट संबंध देवाकडे असे म्हणतात पण असे होवू शकते का? तर असे होवू शकत नाही.कारण साधे मंत्रालयातील ऑफिसरकडे जायचे तर तिथे दारावर शिपाई असतो.त्याने तुम्हांला आत सोडले तर तुम्ही आत जाऊ शकता.इथे हे असे आहे तर परमेश्वराच्या दरबारात, परमेश्वराच्या प्रांतात थेट प्रवेश कसा होवू शकेल.तिथे कुणी मार्गदर्शक नको का? प्रवासात मार्गदर्शक खूप महत्वाचा असतो.आपण प्रवासाला निघतो तेव्हा पहिले रिझर्वेशन करतो.जे शहाणे असतात ते प्रवासाला निघताना पहिले रिझर्वेशन करतात.रिझर्वेशन शिवाय प्रवास करणे म्हणजे मूर्खपणाचा कळस होय.प्रवासाला निघताना आपण त्या व्यक्तीला सांगतो. पहिले रिझर्वेशन कर,गाडी कुठली हे नीट समजावून घे,ते सुध्दा योग्य माणसाकडून समजावून घेत आहेस हयाची खात्री करून घे,नाहीतर सांगणारा चुकीचे सांगत असेल तर प्रवास चुकीचा होईल.योग्य माणसाकडून गाडी कुठली, प्लॅटफॉर्म कुठला, डबा कुठला हे समजावून घे मग काहीच त्रास नाही, कटकट नाही, प्रवास अगदी आनंदाचा होईल.अगदी झोपायला नाही मिळाले तरी बसून डुलकी तर घेवू शकशील.याउलट गाडी चुकली, डबा चुकला,प्लॅटफॉर्म चुकला, वेळ चुकली तर काही लोक वेळेत जात नाहीत गाडी आठला सुटणार असेल तर हे शेवटपर्यंत गाडीपर्यंत पोहचतच नाहीत आणि मग धावपळ करून गाडी पकडण्याचा प्रयत्न करतात त्यात कधी सामान पडते तर कधी हेच पडतात कधी पायच गाडीखाली जातो.आता हे सर्व व्याप करण्यापेक्षा अर्धातास अगोदर जाऊन बसा ना.घरी बसणार ते तिथे जावून बसा.काही लोक म्हणतात अगोदर कशाला जाऊन बसायचे.घरी बसून तरी काय करणार त्यापेक्षा तिथे अर्धा तास अगोदर जाऊन बस.मी कुठेही जायचे असेल तर अर्धा तास आधी स्टेशनवर जातो.घाई घाईने प्रवास करायचाच नाही.याला म्हणतात सुखाचा प्रवास.