शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग २०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 20:46 IST

मानव जातीचे अज्ञान जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आपण कितीही  म्हटले लोक सुखी व्हावेत तरी ते सुखी होणे शक्य नाही.यासाठी काय केले पाहिजे? यासाठी आपण आपल्या ठिकाणी असलेले अज्ञान दूर केले पाहिजे.

- सदगुरू श्री|वामनराव पै

सुखाचा प्रवास.

मानव जातीचे अज्ञान जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आपण कितीही  म्हटले लोक सुखी व्हावेत तरी ते सुखी होणे शक्य नाही.यासाठी काय केले पाहिजे? यासाठी आपण आपल्या ठिकाणी असलेले अज्ञान दूर केले पाहिजे.जगाचे अज्ञान कोण दूर करणार? जगाचे अज्ञान दूर करणे हे काही आपल्या हातात नाही पण आपले अज्ञान दूर करणे हे आपल्या हातात आहे.आपले अज्ञान तरी आपण दूर करू शकतो.आपले अज्ञान दूर कधी होईल? जेव्हा आपण कुणाकडून तरी ज्ञान घेणार तेव्हा आपले अज्ञान दूर होईल.आम्ही कुणाकडूनच ज्ञान घेणार नाही असे म्हटले तर हा कायमचे अज्ञानीच रहाणार.काही लोक म्हणतात आम्ही व देव यांच्यामध्ये आम्हाला कुणी दलाल नको.थोडक्यात सदगुरुंना ते दलाल म्हणतात.आमचा थेट संबंध देवाकडे असे म्हणतात पण असे होवू शकते का? तर असे होवू शकत नाही.कारण साधे मंत्रालयातील ऑफिसरकडे जायचे तर तिथे दारावर शिपाई असतो.त्याने तुम्हांला आत सोडले तर तुम्ही आत जाऊ शकता.इथे हे असे आहे तर परमेश्वराच्या दरबारात, परमेश्वराच्या प्रांतात थेट प्रवेश कसा होवू शकेल.तिथे कुणी मार्गदर्शक नको का? प्रवासात मार्गदर्शक खूप महत्वाचा असतो.आपण प्रवासाला निघतो तेव्हा पहिले रिझर्वेशन करतो.जे शहाणे असतात ते प्रवासाला निघताना पहिले रिझर्वेशन करतात.रिझर्वेशन शिवाय प्रवास करणे म्हणजे मूर्खपणाचा कळस होय.प्रवासाला निघताना आपण त्या व्यक्तीला सांगतो. पहिले रिझर्वेशन कर,गाडी कुठली हे नीट समजावून घे,ते सुध्दा योग्य माणसाकडून समजावून घेत आहेस हयाची खात्री करून घे,नाहीतर सांगणारा चुकीचे सांगत असेल तर प्रवास चुकीचा होईल.योग्य माणसाकडून गाडी कुठली, प्लॅटफॉर्म कुठला, डबा कुठला हे समजावून घे मग काहीच त्रास नाही, कटकट नाही, प्रवास अगदी आनंदाचा होईल.अगदी झोपायला नाही मिळाले तरी बसून डुलकी तर घेवू शकशील.याउलट गाडी चुकली, डबा चुकला,प्लॅटफॉर्म चुकला, वेळ चुकली तर काही लोक वेळेत जात नाहीत गाडी आठला सुटणार असेल तर हे शेवटपर्यंत गाडीपर्यंत पोहचतच नाहीत आणि मग धावपळ करून गाडी पकडण्याचा प्रयत्न करतात त्यात कधी सामान पडते तर कधी हेच पडतात कधी पायच गाडीखाली जातो.आता हे सर्व व्याप करण्यापेक्षा अर्धातास अगोदर जाऊन बसा ना.घरी बसणार ते तिथे जावून बसा.काही लोक म्हणतात अगोदर कशाला जाऊन बसायचे.घरी बसून तरी काय करणार त्यापेक्षा तिथे अर्धा तास अगोदर जाऊन बस.मी कुठेही जायचे असेल तर अर्धा तास आधी स्टेशनवर जातो.घाई घाईने प्रवास करायचाच नाही.याला म्हणतात सुखाचा प्रवास.