शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग २०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 20:46 IST

मानव जातीचे अज्ञान जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आपण कितीही  म्हटले लोक सुखी व्हावेत तरी ते सुखी होणे शक्य नाही.यासाठी काय केले पाहिजे? यासाठी आपण आपल्या ठिकाणी असलेले अज्ञान दूर केले पाहिजे.

- सदगुरू श्री|वामनराव पै

सुखाचा प्रवास.

मानव जातीचे अज्ञान जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आपण कितीही  म्हटले लोक सुखी व्हावेत तरी ते सुखी होणे शक्य नाही.यासाठी काय केले पाहिजे? यासाठी आपण आपल्या ठिकाणी असलेले अज्ञान दूर केले पाहिजे.जगाचे अज्ञान कोण दूर करणार? जगाचे अज्ञान दूर करणे हे काही आपल्या हातात नाही पण आपले अज्ञान दूर करणे हे आपल्या हातात आहे.आपले अज्ञान तरी आपण दूर करू शकतो.आपले अज्ञान दूर कधी होईल? जेव्हा आपण कुणाकडून तरी ज्ञान घेणार तेव्हा आपले अज्ञान दूर होईल.आम्ही कुणाकडूनच ज्ञान घेणार नाही असे म्हटले तर हा कायमचे अज्ञानीच रहाणार.काही लोक म्हणतात आम्ही व देव यांच्यामध्ये आम्हाला कुणी दलाल नको.थोडक्यात सदगुरुंना ते दलाल म्हणतात.आमचा थेट संबंध देवाकडे असे म्हणतात पण असे होवू शकते का? तर असे होवू शकत नाही.कारण साधे मंत्रालयातील ऑफिसरकडे जायचे तर तिथे दारावर शिपाई असतो.त्याने तुम्हांला आत सोडले तर तुम्ही आत जाऊ शकता.इथे हे असे आहे तर परमेश्वराच्या दरबारात, परमेश्वराच्या प्रांतात थेट प्रवेश कसा होवू शकेल.तिथे कुणी मार्गदर्शक नको का? प्रवासात मार्गदर्शक खूप महत्वाचा असतो.आपण प्रवासाला निघतो तेव्हा पहिले रिझर्वेशन करतो.जे शहाणे असतात ते प्रवासाला निघताना पहिले रिझर्वेशन करतात.रिझर्वेशन शिवाय प्रवास करणे म्हणजे मूर्खपणाचा कळस होय.प्रवासाला निघताना आपण त्या व्यक्तीला सांगतो. पहिले रिझर्वेशन कर,गाडी कुठली हे नीट समजावून घे,ते सुध्दा योग्य माणसाकडून समजावून घेत आहेस हयाची खात्री करून घे,नाहीतर सांगणारा चुकीचे सांगत असेल तर प्रवास चुकीचा होईल.योग्य माणसाकडून गाडी कुठली, प्लॅटफॉर्म कुठला, डबा कुठला हे समजावून घे मग काहीच त्रास नाही, कटकट नाही, प्रवास अगदी आनंदाचा होईल.अगदी झोपायला नाही मिळाले तरी बसून डुलकी तर घेवू शकशील.याउलट गाडी चुकली, डबा चुकला,प्लॅटफॉर्म चुकला, वेळ चुकली तर काही लोक वेळेत जात नाहीत गाडी आठला सुटणार असेल तर हे शेवटपर्यंत गाडीपर्यंत पोहचतच नाहीत आणि मग धावपळ करून गाडी पकडण्याचा प्रयत्न करतात त्यात कधी सामान पडते तर कधी हेच पडतात कधी पायच गाडीखाली जातो.आता हे सर्व व्याप करण्यापेक्षा अर्धातास अगोदर जाऊन बसा ना.घरी बसणार ते तिथे जावून बसा.काही लोक म्हणतात अगोदर कशाला जाऊन बसायचे.घरी बसून तरी काय करणार त्यापेक्षा तिथे अर्धा तास अगोदर जाऊन बस.मी कुठेही जायचे असेल तर अर्धा तास आधी स्टेशनवर जातो.घाई घाईने प्रवास करायचाच नाही.याला म्हणतात सुखाचा प्रवास.