शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग १६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 8:32 PM

धर्म,वर्ण, प्रांत, राष्ट्र यामुळे मानवजातीची जी विभागणी झाली तिचे परिणाम पाहिले तर उपाय करायला जायचे व तोच अपाय व्हावा असे दिसून येते.सोय म्हणून जे केली ती गैरसोय झाली व ती गैरसोयच आपल्या मानगुटीवर बसलेली आहे.

- सदगुरू श्रीवामनराव पै

माणूस ही जात व माणुसकी हाच धर्म

धर्म,वर्ण, प्रांत, राष्ट्र यामुळे मानवजातीची जी विभागणी झाली तिचे परिणाम पाहिले तर उपाय करायला जायचे व तोच अपाय व्हावा असे दिसून येते.सोय म्हणून जे केली ती गैरसोय झाली व ती गैरसोयच आपल्या मानगुटीवर बसलेली आहे.अखिल मानवजातीच्या दु:खाला हेच अज्ञान कारणीभूत आहे.आपल्याला जर कुणी विचारले तुमची जात कोणती तर माणूस ही जात.धर्म कोणता तर माणुसकी हाच धर्म.देव कोणता माझ्या ह्रदयात नांदणारा ईश्वर व जो सर्व भूतमात्रात नांदतो तो ईश्वर हाच खरा देव.अशा रितीने मानवी संस्कृतीचे संस्कार झाले तर जगात नंदनवन झाल्याशिवाय रहाणार नाही.सांगायचा मुद्दा असा हे अज्ञान सर्व दु:खाचे मूळ आहे व या अज्ञानातून किती गोष्टी निर्माण होतात.अज्ञानातून अहंकार निर्माण होतो,अभिमान निर्माण होतो, असूया निर्माण होते,अंधश्रध्दा निर्माण होते,अविचार निर्माण होतो व अतिरेक निर्माण होतो.अज्ञानातून या सात गोष्टी निर्माण झाल्या.एका अज्ञानातून या इतक्या गोष्टी निर्माण होतात.अज्ञान हे एक आहे असे नव्हे तर या अज्ञानाची ही सर्व पिलावळ आहे व ती एकापेक्षा एक भयानक आहे.यापेक्षा राक्षस परवडले असे म्हणण्याची वेळ येते.जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत मानवजात सुखी होणे शक्य नाही असा जीवनविद्येचा सिध्दांत आहे.कितीही सुधारणा केल्या तरी काहीच उपयोग होत नाही.बघा तुम्ही आज धार्मिक, शैक्षणिक, वैज्ञानिक किती सुधारणा केल्या तरी परिस्थिती अधिकच बिघडत आहे,कधीकधी त्यामुळे पूर्वीचे बरे होते असे देखील म्हणण्याची वेळ येते.ब्रिटीशांच्या काळात आनंदी आनंद होता असे म्हणणारे लोक आहेत.त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे.जरी तो काळ पारतंत्र्याचा होता तरी लोक सुखी होते.लोकांना बाहेर पडताना भिती वाटत नव्हती.गोव्यात पोर्तुगीजांनी पाचशे वर्षे राज्य केले पण तिथेही लोक सुखी होते. त्यावेळी चो-या होत नव्हत्या,खून होत नव्हते.मी पूर्वी बायकोच्या घरी गोव्याला जायचो तेव्हा तिथले लोक आपल्या घराला कुलूप लावत नसत.पण आज बघा अगदी अलिकडे गोव्यात किती खून पडले.हिंदुस्थानातही आज बजबजपुरी माजलेली आहे.कुठल्याही प्रकारची स्थिरता नाही, सर्वत्र अशांतता आहे, कुठलीही सुरक्षितता नाही याला प्रगती म्हणायची का? याला प्रगती म्हणता येणार नाही.याला कोण जबाबदार आहे तर याला आपण सर्वच जबाबदार आहोत.माणसाची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हे असेच चालत रहाणार.सुख कमी व दु:ख जास्त हे जे चाललेले आहे हे असेच चालत रहाणार जोपर्यंत माणसाची मानसिकता बदलत नाही म्हणून माणसाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे.आम्ही जीवनविद्या मिशनमध्ये माणसांची मानसिकता बदलतो.त्यांना आम्ही ज्ञान देतो व हे ज्ञान वेगवेगळया प्रकारचे असते.