शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग १९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 20:41 IST

आपल्या जीवनात ज्या-ज्या वेळी आपली फसवणूक होते त्या-त्या वेळी त्या प्रत्येक गोष्टीत फसण्याचे कारण अज्ञान असते.डॉक्टर, वकिल, इंजिनियर या सर्वांकडे त्या-त्या विषयाचे ज्ञान असते व त्या ज्ञानाच्या बळावर ते लोकांचे काम ही करतात

- सदगुरू श्री वामनराव पै

प्रत्येक गोष्टीत फसण्याचे कारण अज्ञान असते.

आपल्या जीवनात ज्या-ज्या वेळी आपली फसवणूक होते त्या-त्या वेळी त्या प्रत्येक गोष्टीत फसण्याचे कारण अज्ञान असते.डॉक्टर, वकिल, इंजिनियर या सर्वांकडे त्या-त्या विषयाचे ज्ञान असते व त्या ज्ञानाच्या बळावर ते लोकांचे काम ही करतात पण ते ज्ञान जर अर्धवट असेल तर माणसे सुखी होण्याऐवजी दु:खी होतील.पुष्कळदा डॉक्टर चुकीचे औषध देतात व रोगी मरतो.आत्मज्ञान हे सर्वात श्रेष्ठ असे आपण म्हणतो पण आत्मज्ञान झाले म्हणजे माणूस सुखी होईल असेही नाही.आत्मज्ञान आहे पण व्यवहारिक ज्ञान नाही तर माणूस दु:खी होण्याची शक्यता जास्त असते.अशी माणसे मला माहित आहेत म्हणून मी हे सांगतो.अध्यात्मात त्यांची प्रगती झालेली होती पण व्यवहारिक ज्ञान नसल्यामुळे ते फसले.मी नेहमी सांगतो अध्यात्म,अध्यात्म किंवा फक्त देव,देव करत बसू नका.देव हा एक घटक आहे व तो अतिशय महत्वाचा आहे पण दुसरा महत्वाचा घटक म्हणजे पैसा.पैशांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.पुष्कळ लोक असे म्हणतात की आम्ही परमार्थात पडलो.परमार्थात पडलो की आमची सर्व जबाबदारी त्या बुवावर किंवा त्या बाबावर पडते.मी सांगतो तो बाबा जेवला तर तुझे पोट भरणार आहे का? तुझे पोट भरायचे असेल तर तुलाच जेवले पाहिजे आणि तुला जेवले पाहिजे तर तू काम केले पाहिजेस,कष्ट केले पाहिजेस नाहीतर शेवटी भीक मागितली पाहिजेस.कारण काम केले नाहीतर शेवटी भीक मागण्याची वेळ येते.“भिक्षापात्र अवलंबणे जडो जीणे लाजिरवाणे”.भीक मागण्यापेक्षा मेलेले बरे असे संतांनी म्हटलेले आहे.लोक आधीच अज्ञानी व त्यांचे अज्ञान वाढविणारे अनेक लोक आहेत.आधीच मर्कट त्यात मद्य प्याला अशी त्यांची स्थिती होते.जी स्थिती ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेली आहे तसे लोकांचे होते.लोकांना जर ज्ञानी केले तर ते लोक सुखी होतील पण तोडा आणि राज्य करा ही ब्रिटीशांची जी निती आहे ती आमच्या लोकांनी अवलंबिलेली आहे.हिंदु मुस्लिम एैक्य होणे कठीण आहे का? खरंतर हे सोपे आहे.अजिबात कठीण नाही पण आपल्याच लोकांची तशी इच्छा नाही.अनेकांना असे वाटते की हे जर एक झाले तर आम्हांला कोण विचारणार?यांच्यात भांडणे होवू लागली तर आपल्या पोळीवर तूप ओढून घ्यायला बरे.धर्ममार्तंड सुध्दा लोकांचे अज्ञान वाढविण्याचे काम करतात.दहशतवादी लोकांना सांगितले जाते की मेलास तर स्वर्गात जाशील व जगलास तर आमच्याकडून तुला खूप पैसा मिळेल.हे सगळे घडते ते अज्ञानामुळेच.अज्ञान हेच मानवजातीच्या सर्व समस्यांचे,दु:खाचे मूळ आहे यासाठी ज्ञान महत्वाचे आहे.