शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

ढेकणाच्या संगे हिरा जों भंगला; कुसंगे नाडला साधू जैसा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 00:34 IST

खळांना कितीही कुरवाळण्याचा प्रयत्न केला तरी साधूने विचंवास कुरवाळल्यासारखे आहे.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेमाणसाच्या भोवतीने असलेल्या गोतावळ्यात सुविचार आणि सुसंस्कारांची जोड असणारा एक जरी मित्र असेल तर जीवन स्वर्ग बनते आणि प्रचंड आघात होत असतानासुद्धा मित्र नावाचा सारथी तोल सावरण्यासाठी धावून येतो. ‘वाटेवरील काटे वेचत आणि खड्डे भरतच तुला पुढे जायचे आहे,’ या कटू सत्याची जाणीव करून देतो तोच खरा मित्र. जो आपल्या रसदृष्टीने कुरूपतेमध्येही सुरूपता निर्माण करून जीवनाची वेल हिरवीगार करण्याचा प्रयत्न करतो असा सज्जन सखा केवळ अभावानेच भेटतो, अन्यथा चोहीकडे भेटतात ती सायंकाळची जोडणी लावणारी, कुणाचा तरी कार्यक्रम करणारी आणि समाजजीवन ‘अस्वस्थ’ करणारी ‘दुर्जन’ मंडळी. ही जर आपल्या भोवतीने सापासारखी वळवळत असतील तर लोक आपलीही गणना या दुर्जनांतच करतात. म्हणून या दुर्जनांत मी असलो तरी त्यांच्यासारखा जगत नाही, असे म्हणण्यात काहीच पुरुषार्थ नाही. मी दुर्जनांच्या संगतीत राहतो, पण मी तसा नाही असा किती जरी डंका पिटला तरी लोक आपल्याला खळ दुर्जनांचा साथीदार म्हणूनच ओळखणार. त्यापेक्षा खळांची संगतीच नको. या संगतीच्या दुष्परिणामाचे वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात -काय ढोरांपुढे घालुनी मिष्टान्न,खरासी विलेपन चंदनाचे।नको-नको देवा खळांची संगती,रस ज्या पंगती नाही कथे ।काय सेज बाज माकडा विलास,आळंकारा नाश करूनि टाकी।तुका म्हणे काय पाजूनी नवनीत,सर्पाविष थीत अमृताचे॥खळांना कितीही कुरवाळण्याचा प्रयत्न केला तरी साधूने विचंवास कुरवाळल्यासारखे आहे. कोणे एके काळी वाल्या कोळ्याचा वाल्मीकी ऋषी झाला असेल, पण आज शेकडो वाल्या कोळी नारदाचीच शिकार करण्यासाठी टपून बसले आहेत. अशा परिस्थितीत खळांना खड्यासारखे बाजूला करावे यासाठी एकापेक्षा एक सरस दृष्टांत देताना तुकोबा म्हणतात, ढोरांपुढे अथवा रेड्यापुढे पंचपक्वान्नाचे ताट मांडून काहीच उपयोग नाही. रेडा आपल्या मस्तीने त्याला उधळून लावून गावाबाहेरची नरकाडी करायला जाणारच. गाढवाच्या सर्वांगाला चंदनाचा लेप लावला तरी हुक्की आल्यानंतर ते उकिरडा घोळायला जाणारच. माकडाच्या गळ्यात माणिक बांधून सुंदर कॉटवर त्याला गुबगुबीत अंथरूणे दिली तरी ते झाडाच्या या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारायला जाणारच. अगदी तसेच या खळांचे आहे. यांना सात्त्विक, ऋजू, संस्कारी, सत्त्वगुणी भाषा कळत नाही तर त्यांना तमोगुणी भाषेच्या जोड्यातच उत्तर द्यावे लागते, पण असे उत्तर देण्यासाठी सज्जन माणसे पुढे जात नाहीत. कारण आज सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक क्षेत्रांत वेगवेगळे मुखवटे धारण करून खळांचा राजरोस संचार होत आहे. सज्जनास दुर्बळ ठरवून खळांचे साम्राज्य जेव्हा निर्माण होते तेव्हा सज्जनांनो! नेभळटपणाने खळांचे अत्याचार सहन करीत ‘आता आपण उगी राहावे, जे-जे होईल ते-ते पाहावे’ ही भूमिका सोडून देऊन सज्जन शक्तीने संघटित होऊन खळांचा प्रतिकार केला तर खळांची कोल्हेकुई निश्चित थांबणार आहे. म्हणूनच तुकोबाराय म्हणाले होते -ढेकणाच्या संगे हिरा जों भंगलाकुसंगे नाडला साधू जैसा ।भावे तुका म्हणे सत्संग बराकुसंग हा फेरा चौऱ्यांशिचा ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक