शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

धर्मग्लानी हा मधुमेह तर विषयासक्ती हे रक्तदाब..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 18:54 IST

वाढत्या चंगळवादाने आमचे जीवन जगण्याचे संदर्भच बदलले आहेत. आम्हाला धर्म म्हणजे अफूची गोळी आहे असे वाटते. धर्म जीवनाची व्यवस्था आहे.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

धर्म म्हणजे काय..? धर्म का हवा..? आजच्या प्रगतीच्या काळात धर्माची खरंच गरज आहे का..? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. आजच्या लेखमालेत आपण या प्रश्नांवर थोडे चिंतन करु यात. महाभारतकार धर्माची व्याख्या करतांना म्हणतात -धारणात् धर्म इत्याहु: । धर्मो धारयते: प्रजा: ॥यस्यात् धारण संयुक्त:। सधर्म: इति निश्चय: ॥ज्यायोगे प्रजेची धारणा होते, त्याला धर्म म्हणा. आता आपण म्हणाल, धारणा म्हणजे काय..? तर धारणा म्हणजे व्यवस्था. व्यवस्था म्हणजे नियम, नियम म्हणजे विधी आणि निषेध, विधी म्हणजे हे करा अशी आज्ञा आणि  निषेध म्हणजे हे करु  नका अशी आज्ञा. अशी विधीनिषेधात्मक जीवन जगण्याची जी घटना त्याला धर्म म्हणावे. देश चालावा म्हणून जशी घटनेची गरज असते तसे मानवी जीवन समृद्ध व सुखी होण्यासाठी धर्म नावाच्या घटनेची नितांत गरज आहे. धर्म आम्हाला नीती शिकवतो मग नीतीशिवाय जीवन असते का.? तात्पर्य काय तर नीती म्हणजेच धर्म. अध्यात्माच्या मार्गानेच हा जीवन प्रवास सुखकर होईल. जर या नीतिरथाची चाके विवेक आणि संयम असतील तर कधीच अपघात होणार नाही. धर्म हा सारथी असावा. पुरु षार्थ हे घोडे असावेत. भक्ती हा लगाम असावा आणि ईश्वरश्रद्धा हा ब्रेक असावा, मगच जीवनाचा रथ हा योग्य मार्गाने जाईल. 

आज धर्मग्लानीचा काळ आहे. वाढत्या चंगळवादाने आमचे जीवन जगण्याचे संदर्भच बदलले आहेत. आम्हाला धर्म म्हणजे अफूची गोळी आहे असे वाटते. धर्म जीवनाची व्यवस्था आहे. धर्म नको वाटणं म्हणजे व्यवस्था अमान्य केल्यासारखे आहे. आम्हाला विकारविवशतेने ग्रासले आहे. धर्मग्लानी हा मधुमेह तर विषयासक्ती हा रक्तदाब (ब्लडप्रेशर) आहे. या दोन व्याधींनी ज्यांना ग्रासले आहे, त्यांना धर्माच्या अतिदक्षता विभागात ठेवले पाहिजे. धर्म तर गंगाजलासारखा पवित्र आहे. आपण फक्त कर्म कांडालाच धर्म समजतो. माझे प्रत्येक कर्म हे ईश्वराला आवडणारे असले पाहिजे, हे धर्मच सांगतो. धर्माची व्याप्ती खूप व्यापक आहे, फक्त देवळातले कर्म म्हणजेच धर्म नाही. तो धर्मशास्त्रा अंतर्गत छोटासा भाग आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, संडासपासून ते राजसिंहासनापर्यंत आणि जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जेवढे कर्म आम्ही करतो तेवढे कर्म म्हणजे धर्म होय. सुरांशिवाय संगीत असते का.? पाण्याशिवाय नदी असते का.? सुगंधाशिवाय फुले असतात का.? अगदी तसं आणि तसंच धर्माशिवाय माणसाचे जीवन असते का..? समाज धारणेसाठी धर्माची नितांत गरज आहे. धर्म कधी हिंसा, द्वेष, मत्सर, असूया, वैरभाव करायला शिकवत नाही. धर्म तर मानवी जीवनात दया, दाक्षिण्य, परोपकार, समता, बंधुता, एकता, या जीवन मूल्यांची शिकवण देतो, म्हणून धर्म हवा आहे.

(लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत.मोबाईल क्र. 9421344960 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक