शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

भक्तीला ज्ञान व वैराग्याची साथ हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 16:56 IST

मानवाचे मन सुखाचा शोध घेण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असते. या मानवी मनाची सर्वश्रेष्ठता समजून घेण्याचा प्रयत्न अनेक श्रेष्ठ विभूतींनी केला.

-  धर्मभूषण ब्रह्मेशानंद स्वामी   

मानवाचे मन सुखाचा शोध घेण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असते. या मानवी मनाची सर्वश्रेष्ठता समजून घेण्याचा प्रयत्न अनेक श्रेष्ठ विभूतींनी केला. भक्ती, देव, जन आणि संसार म्हणजे काय ? यांचे ज्ञान आपल्याला प्राप्त व्हायला हवे .साधू संतांनी लिहून ठेवले आहे. हरिची भक्ती केली, हरिभक्तीत विश्वास ठेवला तर अलौकिक अशी किमया घडू शकते. आत्मस्वरूपाची ओळख घडते.महान सत्पुरुषांनी हरिभक्ती केली, त्यात कृष्णावतारामध्ये आपली भक्ती भगवान गोपाळकृष्ण यांच्या चरणी समर्पित करणारा उद्धव, प्रभु श्री रामचंद्राचा सेवक अंगद आणि विठ्ठलाच्या ठिकाणी आपली भक्ती समर्पित करणारा संत नामदेव यांचा उल्लेख करता येईल. एकापेक्षा एक सरस जन्म घेऊन अशा महान सत्पुरुषांनी निःस्वार्थ अशी भगवंत भक्ती केली म्हणून आजही त्यांची नावे घेतली जातात. ती सार्थ आहेत.भगवंताची लीला अगाध आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवावा आणि त्यांची भक्ती करावी. एक लक्षात ठेवा भक्तीला कुविचारांचा विकल्प स्पर्श करुच शकत नाही. प्रत्येकाच्या हृदयात भक्ती वास करू शकते. तिला परमेश्वराने निर्माण केली आहे. आणि तिच्या बळावर परमेश्वर माणसांच्या अंतःकरणात राहू शकतो. एवढा या भक्तीचा महिमा आहे. भक्ती ही अशी आहे, मात्र तिला ज्ञान व वैराग्य याची साथ हवी. ती नसेल तर त्या भक्तीला काही अर्थ नाही.जो भक्त प्रत्येक गोष्ट भगवंताला विचारून करतो, त्याचा संसार भगवंताच्या पूर्ण कृपेने चांगला चालतो. मग संसार सुखी करायचा असेल तर इतरांचे गुण ,सद्गुण बघता आले पाहिजेत. ती हातोटी आपल्यामध्ये श्रीकृपेने आली पाहिजे. आपल्यामध्ये सद्गुण जर असेल तर दुर्गुण आपणहून पळून जातात.सद्गुणांच्या प्राप्तीनंतर मनुष्य खऱ्या अर्थाने मनुष्य बनतो. हीन जगणे जगण्यापेक्षा सेवा, भक्ती, त्याग, प्रेम या गुणांनी युक्त होऊन अंगी देवत्व आले की, भगवंताला पाहिजे असलेले चैतन्य आपल्याला प्राप्त होऊ शकते.भगवंत भक्तीसाठी गुरुसेवा फार महत्त्वाची मानलेली आहे. ज्ञानावाचून मन म्हणजे वेसण नसलेला बैल होय. संसारातील प्रेम हे क्षणभंगुर असते. परंतु भगवंतावरील प्रेम हे अविनाशी असते. भगवंत नामाचे धन कोणी हिरावून घेऊच शकत नाही. त्यासाठी भगवंताप्रति निस्सीम भक्ती, श्रध्दा, प्रेम, भाव पाहिजे. मनातली चंचलता रोखण्यासाठी आत्मज्ञानाची जीवनात फार आवश्यकता असते. मन आणि आत्मा यांचे मिलन फक्त सत्संग, भजन पूजन याद्वारे होऊ शकते. आत्मज्ञानाने माणूस कठीण परिस्थितीतून सहजपणे मुक्त होऊ शकतो. त्यासाठी भगवंतभक्ती व सेवा महत्त्वाची आहे.ती अंतःकरणपूर्वक श्रध्देने केली पाहिजे. ज्या घरात भगवंताच्या नामाचा घोष चालू आहे, ते घर मंदिर आहे. भगवंताचा तेथे वास असतो.  देव पावावा म्हणून प्रत्येकजण त्याची भक्ती करीत असतो. तसे पाहिले तर भक्ती म्हणजे भगवंताची आवड असते. मनुष्याला मात्र विषयांची आवड. मनुष्य देहांत विषय पाहतो तर संत विषयांत देव पाहतात. एवढाच माणसात आणि संतात फरक असतो. तात्पर्य सुखी जीवन जगायचे असल्यास भगवंताची निःस्वार्थ भक्ती करा.

(संकलन: किशोर स. नाईक, डोंगरी गोवा) 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक