शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

भावभक्ती आणि कृतिभक्ती

By appasaheb.patil | Updated: October 18, 2019 19:49 IST

आपले जीवनही आज गोल गोल फिरत आहे.

भावभक्ती आणि कृतिभक्ती ही मानवाच्या जीवन नौकेची दोन वल्ही आहेत. ही दोन्ही वल्ही चालवली, तर ती नाव पुढे जाईल. यातले एकच वल्हे चालवले आणि दुसरे चालवलेच नाही तर काय होईल ? नाव पुढे जाते आहे असे वाटेल, पण प्रत्यक्षात ती गोल गोल फिरेल! आपले जीवनही आज असे गोल गोल फिरत आहे.

आपल्याला ही दोन्ही वल्ही मारायला शिकायला हवे. भावभक्ती आणि कृतिभक्ती ही परस्परपूरक आहेत. भक्तीची बैठक ठेवून केलेल्या कृतीतून भाव खुलतो, भक्तिरस जागृत होतो. भावपूर्णता येते, भाव गतिमान झाला की, चित्त एकाग्र होते. त्यातून परत कृतीची प्रेरणा मिळते. हे दोन्ही करत करत हळूहळू चित्तशुद्धी होत जाते व माणूस परिपूर्ण बनतो.

भक्ती माणसामध्ये दोन शक्ती आहेत. क्रियाशक्ती आणि भावशक्ती या दोन्ही शक्ती सतत भोगासाठी वापरल्या जातात. या शक्तींमागे आपली भोगासक्ती काम करत असते. भोगासक्ती काय करते ? क्रियाशक्ती आणि भावशक्ती या दोहोंना मारून टाकते. शरीर आणि मन लवकर म्हातारे बनते. त्यावेळी कळते की , भोगा न भुक्ता वयमेव भुक्ता! मी भोग भोगतो आहे , या कल्पनेत जगत होतो ,पण भोग आहे तिथेच आहेत. मी मात्र त्या भोगांकडूनच भोगला गेलो !

माझ्या सगळ्या शक्ती त्यातून क्षीण झाल्या. क्रियाशक्ती आणि भावशक्ती यांच्यामागे आपण ' भोग ' ठेवला आहे. त्याऐवजी ' भक्ती ' ला ठेवले, तर या दोन्ही शक्ती वाढतात, जीवनात जोम आणि जोश येतो. म्हणूनच भक्तीची दोन अंगे आहेत. भावभक्ती आणि कृतिभक्ती आपल्या कृतीमागे भक्तीची बैठक आणून तशी कृती करणे ही कृतिभक्ती. क्रियाशक्तीला ही भक्ती चालना देते. आपले जीवन जो चालवतो , जो आपल्यावर निरपेक्ष प्रेम करतो , त्या देवाबद्दलचा भाव वाढवून त्यात मन एकाग्र करणे म्हणजे भावभक्ती. मुर्तीपूजा ही भावभक्ती आहे.  - ह. भ़. प सुखदेव धारेराव महाराज, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक