शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

देवाविना भक्त दिसे रिकामा । भावाविना देव नयेचि कामा ॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 14:29 IST

ईश्वर प्राप्तीसाठी साधक जी काही साधना करीत असेल त्या साधनेत भाव हा हवाच..! भावातच तर खरं ईश्वराचं अस्तित्व दडलेलं आहे.

- ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी (बीड)

भाव असल्याशिवाय त्या साधनेला किंमत नाहीअध्यात्मशास्त्रात साधकाच्या अंत:करणांत जसा भाव असेल तसा ईश्वरी सत्तेचा अनुभव त्याला येतो. भाव अनन्य साधारण, दृढ असेल तर अशा भक्ताची देव कधीही उपेक्षा करीत नाही. ईश्वर प्राप्तीसाठी साधक जी काही साधना करीत असेल त्या साधनेत भाव हा हवाच..! भावातच तर खरं ईश्वराचं अस्तित्व दडलेलं आहे. साधनेमध्ये भावाचाच अभाव असेल तर भगवंताचा प्रभाव कधीही प्रत्ययास येणार नाही..! 

सुभाषितकार म्हणतात -न काष्ठे विद्यते देवो न पाषाणे न मृण्मये ।भावे हि विद्यते देवो तस्मात् भावो हि कारणम् ॥

ईश्वरी अस्तित्व हे काही फक्त लाकूड, पाषाण, मृत्तिका एवढ्यापुरते मर्यादित नाही तर साधकाच्या भावातच देव आहे. भक्तीशास्त्रात भावाला नितांत महत्व आहे. मुक्तीचा आत्मा आहे भक्ती आणि भक्तीचा आत्मा आहे भाव..! भक्तीशिवाय मुक्ती नाही हे जितकं खरं तितकंच भावाशिवाय भक्ती नाही हे ही तितकेच खरं..! आमची ज्ञानराज माऊली म्हणते -

भक्ती एक जाणे । तेथे साने थोर न म्हणे ॥आम्ही भावाचे पाहुणे । भलतेया ॥

भावविरिहत साधनेची किंमत शून्य आहे. भावाशिवाय भक्ती ही निष्प्रभ आहे. वामनपंडित म्हणतात -

शून्याविना अंक दिसे रिकामा । अंकाविना शून्य नयेचि कामा ॥देवाविना भक्त दिसे रिकामा । भावाविना देव नयेचि कामा ॥

गणिती शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे शून्याच्या मागे एखादा अंक असल्याशिवाय त्या शून्याला किंमत नाही त्याप्रमाणे भक्ती साधनेत भाव असल्याशिवाय त्या साधनेला किंमत नाही. वरील सर्व विवेचनावरुन आपल्या सहज लक्षात येईल की, साधनेत, भक्ती शास्त्रात भावाला किती अनन्य साधारण महत्व आहे.आता आपण म्हणाल की, भक्तीत भाव हवा हे खरं पण हा भाव म्हणजे तरी नक्की काय..? तर याचे चिंतन आपण आपल्या पुढील लेखांकात पाहूया..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत,त्यांचा भ्रमणध्वनी  8793030303 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक