शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

देवा तुझा मी सोनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 18:18 IST

संत नरहरी महाराजांनी आपला सुवर्णव्यवसाय कारागिरी सांभाळून भक्ती मार्ग अवलंबविला.

महाराष्ट्रामध्ये संत परंपरा ही अनेक वर्षापूर्वीच्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक जातीमध्ये वारकरी संप्रदायात अनेक संत होवून गेले. प्रत्येक संतांनी जनतेला भक्ती मार्गाचाच आग्रह धरला. संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत नामदेव महाराज याश्विाय अनेक संतांनी या महाराष्ट्र भूमिला पावन केले आणि वारकरी संप्रदायाची परंपरा आजपर्यंत कायम आहे.अशाच संत माळेतील एक संत म्हणजे संत नरहरी सोनार. संत नरहरी महाराजांनी आपला सुवर्णव्यवसाय कारागिरी सांभाळून भक्ती मार्ग अवलंबविला. सुवर्ण व्यवसायात अगदी तरबेज, कलात्मक दागिने घडविणे महाराजांना चांगलेच अवगत होते. त्यामुळे महाराजांचा पंढपुरात व्यवसायात चांगला जम बसला होता. पंढरपुरात राहत असून सुद्धा संत नरहरी महाराज हे कट्टर शिवभक्त होते. त्यांची भगवान शंकरावर एकनिष्ठ भक्ती होती. महाराजांच्या दिनचर्येनुसार सकाळी शिव आराधना. बेलपुजन आदी पुजनाला वेळ ठरलेला असे. संत नरहरी महाराज शिवभक्त असल्यामुळे दुसऱ्या देवावर त्यांची फारशी श्रद्धा नव्हती. त्यामुळे त्यांच्या या वृत्तीचा अनेकांना रागही येत असे. असे म्हटले जाते की एके दिवश्ी पांडूरंगाने या शिवभक्ताची म्हणजे नरहरी महाराजांची परिक्षा घेण्याचे ठरविले. एकदा एका सावकाराने पांडूरंगासाठी सोन्याचा करदोडा करण्यास सांगितला. सावकारांनी दिलेल्या मापानुसार महाराजांनी तो अतिशय सुबक, सुंदर बनवून दिला. जेव्हा आपल्या नवसपुर्तीनुसार सावकाराने तो करदोडा विठ्ठल पांडूरंगाच्या कमरेस बांधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो मापापेक्षा खुपच मोठा झाला. अशी प्रक्रिया खुप चालली. एकदा करदोळा कधी पांडूरंगाच्या कमरेला लांब, कधी आखुड होत असे. शेवटी सावकाराने कंटाळून संत नरहरी महाराजांना सांगितले की, आता तुम्हीच योग्य ते माप स्वत: विठ्ठलाच्या कमरेचे घ्या आणि करदोडा लांब, आखुड मापाचा करुन द्या, परंतु सावकाराची मागणी महाराजांनी फेटाळून लावली.‘मी शिवोपासक, शिवभक्त असल्यामुळे मी कुठल्याही इतर देवाचे मुखही पाहू शकत नाही. त्यामुळे पांडूरंगाच्या कमरेचे माप मी कसे घेणार?’ आता आपला नवसपुर्तीकडे जाणार नाही. या चिंतेने महाराजांना सावकार विनवणी करु लागले. पण आपल्या मतावर ठाम असलेल्या नरहरी महाराजांनी नकारच दिला. सावकारानीच मग एक युक्ती सुचवली.‘अरे नरहरी तुम्ही जरी शिवभक्त असले तरी मी सांगितल्याप्रमाणे आपण डोळ्यावर पट्टी बांधून विठ्ठलाचे मुख न बघता कमरेचे माप घेवून यावे.’सावकाराचा हा विचार महाराजांना पटला. म्हणून महाराजांनी डोळ्यावर पट्टी बांधून विठ्ठल पांडूरंगाच्या कमरेचे माप घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आपण भगवान शंकराच्या पिंडीचेच माप घेतो की काय? असा स्पर्श महाराजांना वारंवार झाला. त्यामुळे शहानिशा करण्यासाठी पट्टी काढूनच पाहणे गरजेचे होते. म्हणूनच महाराजांनी जशी डोळ्याची पट्टी काढली, तरी समोरील स्मित वदनी पांडूरंगाची मुर्तीचे नरहरी महाराजांना दर्शन झाले. पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधून माप घेण्याचा प्रयत्न केला, तर पिंडीला स्पर्श करण्याचा वारंवार भास होत होता. असे बºयाच वेळा केल्यामुळे महाराजांना शिव, विष्णू, विठ्ठल एकच यांच्यात द्वैत नाही. याची साक्ष पटली आणि तेव्हापासून महाराज विठ्ठलाचे निस्सीम भक्त झाले.तसा संत नरहरी महाराजांचा जन्म हा देवगिरीचा महाराजांचे वडील दिनानाथ परंपरागत सोनारकाम करत असत. पुढे नंतर ते पंढरपूर येथे स्थायिक झाले. संत नरहरी महाराजांचे मोजकेच काही अभंग आहेत.

‘सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताबाईशिव आणि विष्णू एकची माझे प्रेम तुझ्या पायी’‘देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचा व्यवहार...’

अशा या संत माळेतील संतास पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन- राजेश एस. काटोलेकौलखेड अकोला

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक