शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिवंत देह जाणार सकळ; आयुष्य खातो काळ सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 18:38 IST

जन्माचे सार्थक होण्याकरिता व समाजाचे ऋण फेडण्याच्या दृष्टीने आपले काही कर्तव्य आहे, हेदेखील विसरून चालणार नाही.

- डॉ. भालचंद्र ना. संगनवार 

देहाची व्याख्या व त्याचे अस्तित्व अत्यंत मोजक्या शब्दात यापेक्षा चांगले सांगता येणे अवघडच. मानवी देह हा अत्यंत नाशिवंत असून क्षणोक्षणाने तो काळाच्या स्वाधीन होत आहे. याच मानवी देहावर किती प्रेम केले जाते, हे आपण अनुभवतोच. भौतिक सुखाची लालसा या नश्वर देहांची चोचले पुरविण्यासाठी केली जाते. आजच्या कालखंडात प्रत्येक व्यक्ती अमरत्वाचा पट्टा बांधून आल्याच्या आविर्भावात वागत असून व्यक्तिकेंद्रित विचार प्रबळ होत आहेत. व्यक्तिपूजा वाढत असून क्षणाक्षणाने कमी होणाऱ्या आयुष्याचे महत्त्व विसरत चाललो आहोत. ‘मरावे परि कीर्तिरुपे उरावे...’ या वाक्याचा जवळ जवळ विसर पडल्याचे दिसून येत आहे. जन्माला आल्यानंतर उपजीविकेचे साधन म्हणून अर्थार्जन करावे लागते हे खरे आहेच; परंतु जन्माचे सार्थक होण्याकरिता व समाजाचे ऋण फेडण्याच्या दृष्टीने आपले काही कर्तव्य आहे, हेदेखील विसरून चालणार नाही.

‘देह प्रपंचाचा दास... सुखे करो काम...’ हे त्रिकालाबाधित सत्य आहे. परंतु त्यासोबतच ‘तुझे रुप चित्ती राहो... मुखी तुझे नाम...’ अशी याचना संत गोरा कुंभार यांनी केली, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. निष्काम भक्तीचे उत्तम उदाहरण संत गोरोबांनी दिले आहे. देहभान विसरून आत्मा ईश्वरचरणी समर्पित केला असून प्रपंच आणि परमार्थ या दोघांत किंचितही गफलत होऊ दिली नाही. ईश्वर प्राप्तीचा धोपट मार्ग हा भक्ती आणि नामस्मरण आहे. सर्वव्यापी ईश्वर हा अनेक रुपांत एकरूप असून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ हीच खरी शिकवण अंगीकारणे आवश्यक आहे. 

प्रपंचात आसक्ती जागृत राहणे म्हणजे प्रत्यक्षात अग्नीस आलिंगण देणे असे आहे. प्रपंच करावा नेटका याचा गूढ अर्थच असा आहे की, या मानवी देहाच्या माध्यमातून ईश्वररूपी चेतनेस विलीन होणे शक्य आहे. प्रपंचाने सुखी झाला... ऐसा ना कुणी ऐकला वा देखिला... असे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात. मानवी देहाने सजविलेल्या संसाररूपी रथास अनेक अडचणी आणि संकटे आहेतच. परंतु या रथाचा सारथी विवेकरूपी ईश्वर झाल्यास सद्गतीस प्राप्त होणे सहज शक्य आहे. 

कोण दिवस येईल कैसा...नाही देहाचा भरवसा...इतके स्पष्ट असतानादेखील माणसे आपपर भाव सोडण्यास तयार नाहीत. मानव रूपाने मिळालेली संधी वाया घालविली जाते. संत कबिरांनी देखील मानवी देहाबाबतीत अगदी सुंदर विचार दोह्यात मांडले आहेत. ते म्हणतात...

काह भरोसा देह का, बिनस जात छान मारही ।सांस सांस सुमिरन करो, और यतन कुछ नाही ।।

संत कबीर म्हणतात, या देहाचा यत्किंचितही भरवसा नाही. कारण याचा अंत केव्हाही होऊ शकतो. परंतु प्रत्येक क्षण आणि श्वासागणिक केलेले ईश्वर स्मरण माणसास अमरत्व व देवरूपास विलीन करू शकतो. ईश्वररूपी विधात्याचे स्मरण माणसास या ८४ लक्ष फेऱ्यातून मुक्त करू शकतो. परंतु आपली ईश्वरप्राप्तीची आसक्ती उदात्त असावी लागते. जन्मभराच्या श्वासाइतके मोजीयले हरिनाम बाई मी विकत घेतला श्याम... हे गीत आपणास ईश्वरप्राप्तीचा संदेश देऊन जाते. मानवी देह असो वा कोणत्याही भूतलावरील सजीव यांनी कितीही प्रयत्न केले तरी मृत्यू हा अटळ आहेच. तेव्हा श्वाश्वत काय तर ती कीर्ती मानवाची कीर्ती शतकानुशतके अमर राहते. जर त्यांनी ईश्वरप्राप्तीचा व समाजोद्धारकाचा मार्ग स्वीकारला तर अन्यथा किती आले किती गेले प्रमाणे आपली जन्म-मरणाची वारी अटळ आहेच. अत्यंत निर्विकारपणे भक्तपंथांची स्वीकृती केली तरच अगाध शक्तिदात्याच्या समिप पोहोचण्याचा मार्ग सापडतो. 

( लेखक लातूर येथे जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक