शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

शाश्वत सुखासाठी करावा संतसंगतीचा धावा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 19:03 IST

संतसंगतीत वासनेचं बीजंच जळून जातं आणि हे घडताच रामनामाची आवड निर्माण होऊन आपलं सुख हे क्षणोक्षणी वाढायला लागतं.

- ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी (बीड)

मनुष्याला जीवनात शाश्वत सुख हवं असेल, तर त्याने संतसंग करावा, सज्जनांचा संग करावा. असंगाशी संग केल्यास श्रीरंग प्राप्त होत नाही..! विषयाच्या संगाने मानवी जीवनाचं अधःपतन होतं. भगवान श्रीकृष्ण श्रीमद् भगवद् गीतेत म्हणतात -

ध्यायतो विषयान्पुंसः संगस्तेषूप जायते ।

विषयसंगाच्या स्टेशनवरुन सुटलेली देहरुपी गाडी, विवेकाचा ब्रेक तुटल्यामुळे, सर्वनाश घाटात कोसळून पडते._ विषयसंगाने परमोप्रत जाताच येत नाही. संतांच्या, सज्जनांच्या संगतीत मात्र वासना जळून जाते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात -

संतचरण रज लागता सहज । वासनेचे बीज जळोनि जाय ॥मग रामनामे उपजे आवडी । सुख घडोघडी वाढो लागे ॥

संतसंगतीत वासनेचं बीजंच जळून जातं आणि हे घडताच रामनामाची आवड निर्माण होऊन आपलं सुख हे क्षणोक्षणी वाढायला लागतं. आमच्या संतांनी शब्द किती तोलूनमापून वापरले आहेत बघा _बीज जळोनि जाय_ म्हणजे एखादं बीज जेव्हा जळून जातं तेव्हा ते परत कधीच उगवत नाही, उत्पन्न होत नाही म्हणून एकदा का मनुष्य संतसंगतीत गेला की, त्याची वासना संपूर्णतः जळते, नामशेष होते. संतसंगतीत मानवी जीवनाचं कल्याणच होतं.

एकदा तुकाराम महाराजांची स्वारी विठ्ठलाचे भजन करीत एका झाडाखाली बसली होती. त्याच रस्त्याने ४ चोर जात होते. त्यांनी विचार केला, आपल्याला टेहळणी करण्यासाठी अगदी योग्य माणूस मिळाला. त्यांच्यापैकी एकजण पुढे आला आणि म्हणाला, महाराज! तुम्ही आमच्याबरोबर याल का?महाराज म्हणाले, हो! चोर म्हणाले, चला मग! आणि त्या चोरांबरोबर तुकाराम महाराज सावकार वाड्याजवळ आले. चोर म्हणाले, आमच्याबरोबर आत चला. आम्ही आमचे चोरीचे काम करु आणि तुम्ही समोर दालनात बसा. जर सावकार वाड्यातील कोणी जागं झालं तर फक्त विठ्ठल-विठ्ठल म्हणा आम्ही पळून जाऊ किंवा लपून बसू! चोर आत शिरुन चोरी करु लागले आणि महाराज दालनात आले. पाहतात तर काय? त्या सावकाराच्या दालनात सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती शोभत होती. समोर मंदतेजाने समई तेवत होती. फुलांचा, तुळशीचा, धूपाचा सुगंध दरवळत होता अशा त्या मूर्ती पाहताच लगेच महाराजांनी भजन करायला सुरूवात केली.

रुप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी ।तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा ।।

भजनाचा आवाज ऐकताच सावकार आणि सारी मंडळी जागी झाली. समोर तुकाराम महाराजांना पाहताच त्या सावकाराला पराकोटीचा आनंद झाला कारण तो खरा वैष्णव होता. त्याने महाराजांचे पाय धरले. दूध-फळे महाराजांसमोर ठेवून ते खाण्याचा आग्रह तो त्यंना करु लागला. एवढ्यात महाराजांच्या लक्षात आलं आणि ते म्हणाले, अहो.! मी एकटा नाही माझ्याबरोबर आणखी चार जण आहेत. सावकार म्हणाला, कुठे आहेत ते.? बोलवा त्यांना..! आणि हे सगळं संभाषण ऐकून लपलेले चोर बाहेर आले. त्यांनी सावकाराची माफी मागितली, महाराजांचे चरण धरले आणि ते त्यांच्या भजनी मंडळात सामील झाले. 

तुकाराम महाराजांसारख्या संताच्या संगतीने चोरही सज्जन बनले. चोरीचा व्यवसाय सोडून भक्तिमार्गाला लागले. एका क्षणाच्या संतसंगाने चोरांच्या जीवनाचे कल्याण झाले म्हणून इतरांचा संग नकोच फक्त संतसंग हवा..!श्रीसमर्थ रामदास स्वामी आपल्याला मनोबोधात हेच सांगतात  -मना सर्वही संग सोडोनि द्यावा । अति आदरे सज्जनांचा करावा ।जयाचेनी संगे महादु:ख भंगे । जनी साधनेवीण सन्मार्ग लागे ।।

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी  8793030303 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक