शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

शाश्वत सुखासाठी करावा संतसंगतीचा धावा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 19:03 IST

संतसंगतीत वासनेचं बीजंच जळून जातं आणि हे घडताच रामनामाची आवड निर्माण होऊन आपलं सुख हे क्षणोक्षणी वाढायला लागतं.

- ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी (बीड)

मनुष्याला जीवनात शाश्वत सुख हवं असेल, तर त्याने संतसंग करावा, सज्जनांचा संग करावा. असंगाशी संग केल्यास श्रीरंग प्राप्त होत नाही..! विषयाच्या संगाने मानवी जीवनाचं अधःपतन होतं. भगवान श्रीकृष्ण श्रीमद् भगवद् गीतेत म्हणतात -

ध्यायतो विषयान्पुंसः संगस्तेषूप जायते ।

विषयसंगाच्या स्टेशनवरुन सुटलेली देहरुपी गाडी, विवेकाचा ब्रेक तुटल्यामुळे, सर्वनाश घाटात कोसळून पडते._ विषयसंगाने परमोप्रत जाताच येत नाही. संतांच्या, सज्जनांच्या संगतीत मात्र वासना जळून जाते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात -

संतचरण रज लागता सहज । वासनेचे बीज जळोनि जाय ॥मग रामनामे उपजे आवडी । सुख घडोघडी वाढो लागे ॥

संतसंगतीत वासनेचं बीजंच जळून जातं आणि हे घडताच रामनामाची आवड निर्माण होऊन आपलं सुख हे क्षणोक्षणी वाढायला लागतं. आमच्या संतांनी शब्द किती तोलूनमापून वापरले आहेत बघा _बीज जळोनि जाय_ म्हणजे एखादं बीज जेव्हा जळून जातं तेव्हा ते परत कधीच उगवत नाही, उत्पन्न होत नाही म्हणून एकदा का मनुष्य संतसंगतीत गेला की, त्याची वासना संपूर्णतः जळते, नामशेष होते. संतसंगतीत मानवी जीवनाचं कल्याणच होतं.

एकदा तुकाराम महाराजांची स्वारी विठ्ठलाचे भजन करीत एका झाडाखाली बसली होती. त्याच रस्त्याने ४ चोर जात होते. त्यांनी विचार केला, आपल्याला टेहळणी करण्यासाठी अगदी योग्य माणूस मिळाला. त्यांच्यापैकी एकजण पुढे आला आणि म्हणाला, महाराज! तुम्ही आमच्याबरोबर याल का?महाराज म्हणाले, हो! चोर म्हणाले, चला मग! आणि त्या चोरांबरोबर तुकाराम महाराज सावकार वाड्याजवळ आले. चोर म्हणाले, आमच्याबरोबर आत चला. आम्ही आमचे चोरीचे काम करु आणि तुम्ही समोर दालनात बसा. जर सावकार वाड्यातील कोणी जागं झालं तर फक्त विठ्ठल-विठ्ठल म्हणा आम्ही पळून जाऊ किंवा लपून बसू! चोर आत शिरुन चोरी करु लागले आणि महाराज दालनात आले. पाहतात तर काय? त्या सावकाराच्या दालनात सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती शोभत होती. समोर मंदतेजाने समई तेवत होती. फुलांचा, तुळशीचा, धूपाचा सुगंध दरवळत होता अशा त्या मूर्ती पाहताच लगेच महाराजांनी भजन करायला सुरूवात केली.

रुप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी ।तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा ।।

भजनाचा आवाज ऐकताच सावकार आणि सारी मंडळी जागी झाली. समोर तुकाराम महाराजांना पाहताच त्या सावकाराला पराकोटीचा आनंद झाला कारण तो खरा वैष्णव होता. त्याने महाराजांचे पाय धरले. दूध-फळे महाराजांसमोर ठेवून ते खाण्याचा आग्रह तो त्यंना करु लागला. एवढ्यात महाराजांच्या लक्षात आलं आणि ते म्हणाले, अहो.! मी एकटा नाही माझ्याबरोबर आणखी चार जण आहेत. सावकार म्हणाला, कुठे आहेत ते.? बोलवा त्यांना..! आणि हे सगळं संभाषण ऐकून लपलेले चोर बाहेर आले. त्यांनी सावकाराची माफी मागितली, महाराजांचे चरण धरले आणि ते त्यांच्या भजनी मंडळात सामील झाले. 

तुकाराम महाराजांसारख्या संताच्या संगतीने चोरही सज्जन बनले. चोरीचा व्यवसाय सोडून भक्तिमार्गाला लागले. एका क्षणाच्या संतसंगाने चोरांच्या जीवनाचे कल्याण झाले म्हणून इतरांचा संग नकोच फक्त संतसंग हवा..!श्रीसमर्थ रामदास स्वामी आपल्याला मनोबोधात हेच सांगतात  -मना सर्वही संग सोडोनि द्यावा । अति आदरे सज्जनांचा करावा ।जयाचेनी संगे महादु:ख भंगे । जनी साधनेवीण सन्मार्ग लागे ।।

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी  8793030303 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक