शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

ऋण मोचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 04:06 IST

भारतीय संस्कृतीमध्ये चार प्रकारच्या ऋणांचे वर्णन आढळते. ब्रह्मऋण, देवऋण, ऋषीऋण व पितृऋण. ब्रह्म ही मूळ शक्ती आहे, ज्यामध्ये सृष्टीची उत्पत्ती झाली. ती पूर्णत: शुद्ध व निर्द्वंद्व आहे.

- डॉ. भूषण कुमार उपाध्याय

भारतीय संस्कृतीमध्ये चार प्रकारच्या ऋणांचे वर्णन आढळते. ब्रह्मऋण, देवऋण, ऋषीऋण व पितृऋण. ब्रह्म ही मूळ शक्ती आहे, ज्यामध्ये सृष्टीची उत्पत्ती झाली. ती पूर्णत: शुद्ध व निर्द्वंद्व आहे. म्हणूनच मानवाकडूनही अशी अपेक्षा केली जाते की त्याने स्वत:ला पूर्णत: शुद्ध व निर्द्वंद्व ठेवले पाहीजे व शेवटी त्या परमशक्तीमध्ये लीन झाले पाहीजे. जेव्हा लहान मूल जन्माला येते, तेव्हा ते पूर्णत: शुद्ध व निष्पक्ष असते. परंतु जसजसे ते मोठे होत जाते तसतसे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे विकार निर्माण होत जातात. तो कुठल्यातरी विशेष वर्ग किंवा सिद्धांताशी जोडला जातो. म्हणूनच प्रत्येक मानवावर हे ऋण असते की त्याने आपले मन शुद्ध व निष्पक्ष ठेवले पाहिजे. या विश्वातील प्रत्येकच धर्म मानवाला या दिशेने चालण्याची प्रेरणा देतो व अनेक विधीसुद्धा सांगतो.ब्रह्मऋणानंतर देवऋणाचे स्थान आहे. देव निसर्गातील वेगवेगळया शक्तीचे प्रतिनिधित्व करतात, जसे की ते ऊन, थंडी, पाऊस व विश्वातील इतर गतिविधींचे संचालन करतात. या शक्ती चांगले काम कशा करतील, यासाठी मानवाने या शक्तींना चालना देण्याचे कार्य करायला पाहिजे. पर्यावरणाची सुरक्षा असो वा निसर्गातील अनेक अनुकूल गोष्टींना चालना देण्यासाठी मानवाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.देवऋणानंतर ऋषीऋणाचे स्थान आहे. आपल्या ऋषी, मुनींनी आपले ज्ञान व विज्ञानाद्वारे या विश्वाला समृद्ध केले आहे. या आधुनिक जीवनात जे काही विकसित झाले आहे, ते ऋषी, मुनी, वैज्ञानिक, नेता, समाजशास्त्रज्ञ इ. च्या ज्ञानाचे फलित आहे.सर्वात शेवटी ज्या ऋणाचे वर्णन पाहायला मिळते, ते म्हणजे पितृऋण. आपल्याला माता-पित्यांकडून जन्म मिळतो. आपले सर्व संस्कार, जीवन जगण्याची कला मूलत: आपण आपल्या आई-वडिलांकडून शिकत असतो.अशाप्रकारे आपले संपूर्ण जीवन या चार प्रकारच्या ऋणांवर आधारित आहे. या ऋणांची परतफेड करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. परंतु आपले व्यस्त जीवन, स्वार्थ व षड्दोषांच्या अस्तित्वामुळे मानव या ऋणांना पूर्णत: विसरलेला आहे. यामुळे मानवाचे व्यक्तिगत, सामाजिक व राष्ट्रीय जीवन अत्यंत कष्टमय झालेले आहे. शेवटी आपण आत्मशुद्धीद्वारे ब्रह्मऋण, पर्यावरणाच्या उपासनेद्वारे देवऋण, ज्ञान-विज्ञानाच्या अर्जनाद्वारे ऋषीऋण व माता-पित्यांच्या सेवेद्वारे पितृऋण फेडून सफल किंवा पूर्ण जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकतो.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक