शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

आनंदाची सृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 18:18 IST

आपल्या समोर वाढलेल्या जेवणाच्या पानात मीठ आणि लोणचे हे पदार्थ अल्पप्रमाणात वाढलेले असतात. ते त्याच प्रमाणात स्वीकारल्यामुळे ताटातील गर्दी न वाढविता खाल्ल्यानंतर आपल्या जेवणाची रुची वाढवितात.

ठळक मुद्दे तुकोबारायांनी वापरलेला ‘निमाले’ हा शब्द आपण आपल्या जीवनात अंगीकारून मर्यादित भोगांचा स्वीकार करूया व आपण आनंदी बनून आपली सृष्टीही आनंदी बनवूया. आनंद तरंग

इंद्रजित देशमुख-आज वर्तमानात प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी, पण न मिळणारी गोष्ट म्हणजे आनंद. तसं पाहिलं तर आनंद ही एक अवस्था आहे. आपल्या प्रयत्नानंतर प्राप्त होणारी. प्रत्येकाला ज्ञात-अज्ञातपणे ती अवस्था हवी आहे; पण त्यासाठी आवश्यक असणाऱ्या योग्य प्रयत्नांचा प्रकार व दिशा यांची माहिती नसल्यामुळे सगळ्यांनाच ती आनंदानुभूती घेता येत नाही. याच अनुभूतीच्या योग्य व सूत्रबद्ध दिशेचा उल्लेख आमचे तुकोबाराय आपल्या एका अभंगात करताना म्हणतात,‘काम, क्रोध, लोभ निमाले ठायीची।अवघी आनंदाची सृष्टी झाली।।’जीवनात भरभरून आनंद यावा यासाठी तुकोबाराय जो मार्ग सांगत आहेत, त्या मार्गाचा अवलंब केला की स्वत: त्या आनंदाची अनुभूती घेता येतेच; पण आपल्या अस्तित्वाने आपला भोवतालदेखील त्याच आनंद तरंगांनी कंपित करता येतो व त्यामुळे जणू ही अवघी सृष्टीच आनंदी भासू लागते. त्यासाठी काय करावं लागत असेल तर फक्त जीवनातील नियमन वाढवायचं. वास्तविक जीवनात विकार आणि विकारविषयक भोग यांच्या बाबतीत ब-याचदा आपली अपरिहार्यता किंवा नाइलाज असतो, अशा वेळी जीवनातील त्या विकाराचा पूर्णपणे त्याग करता येत नाही. आपल्या समोर वाढलेल्या जेवणाच्या पानात मीठ आणि लोणचे हे पदार्थ अल्पप्रमाणात वाढलेले असतात. ते त्याच प्रमाणात स्वीकारल्यामुळे ताटातील गर्दी न वाढविता खाल्ल्यानंतर आपल्या जेवणाची रुची वाढवितात. तुकोबारायांनी वापरलेला ‘निमाले’ हा शब्द आपण आपल्या जीवनात अंगीकारून मर्यादित भोगांचा स्वीकार करूया व आपण आनंदी बनून आपली सृष्टीही आनंदी बनवूया.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर