शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पहिली कला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 05:43 IST

अध्यात्माच्या आठ कला आहेत. त्यापैकी पहिली कला ही संवादाची आहे. संवाद ही अशी कला आहे, जी मानवाला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकते.

- विजयराज बोधनकरअध्यात्माच्या आठ कला आहेत. त्यापैकी पहिली कला ही संवादाची आहे. संवाद ही अशी कला आहे, जी मानवाला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकते. शब्द सुर हा निसर्गाने मानवाला दिलेला मोठा आशीर्वाद आहे. अक्षरज्ञान हे मानवाला मिळालेले एक वरदान आहे. ज्याला अक्षरज्ञान झाले, तो शब्दांवर प्रभुत्व मिळवू शकतो. जो विचार करून बोलतो तो विचारवंत ठरतो. जो बोलून विचारात पडतो तो हळूहळू जगाला आणि स्वत:ला अप्रिय वाटत राहतो. तारतम्य नावाची एक जाणीव असते. ती जाणीवसुद्धा एक प्रकारची आध्यात्मिक शक्तीच आहे. तुमच्या उत्तम बोलण्याची जाणीव समोरच्या व्यक्तीला झाली की, उत्तम समाज आपोआप त्या व्यक्तीशी जोडला जातो. उत्तम बोलण्याची कला ही आत्मसात करावी लागते. त्यासाठी फक्त रसाळ वाणी असून चालत नाही, तर जागतिक ज्ञान आणि वेगळा विचार करण्याची ऊर्जाही असली पाहिजे. मेंदूतून उत्पन्न होणारे विचार धन-मनाच्या एकाग्रतेवर अवलंबून असतात. मन स्थिर असेल तरच मेंदूच्या ऊर्जाक्षेत्रातून नवा विचार प्रकटू शकतो आणि त्याच नव्या विचारांची मांडणी जगासमोर मांडताना उत्तम संवादाची कला त्या बोलणाऱ्या व्यक्तीला यश प्राप्त करून देऊ शकते. अनेकांना साधे बोलणेही न जमण्याचे कारण म्हणजे ते बोलण्याचा सराव करीत नाहीत. कुठलीही गोष्ट पहिली आत्मचिंतनाच्या पायरीवरून प्रवास करती झाली की तिला मेंदूचा भक्कम आधार मिळतो. मेंदूच्या कपाटात एखादी गोष्ट घर करून बसली की, ती डळमळीत होण्याची भीती नसते. बोलण्याचा सराव मेंदूच्या माध्यमातून केला तर चंचल मनही स्थिर होऊ शकते. उत्तम बोलण्याच्या कलेतून प्रगतीचे अनेक मार्ग मोकळे होतात. जागतिक वैचारिक बळ वाढत जाते. माणूस बोलण्याच्या कलेमुळे अधिक प्रगल्भ होत जातो. माणसे जिंकण्यासाठी गोड शब्द पुरेसा असतो. एकदा का केवळ बोलण्यातून जग जिंकता आले की, मग ईश्वरी शक्ती आपल्या सोबत असते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक