शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

पहिली कला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 05:43 IST

अध्यात्माच्या आठ कला आहेत. त्यापैकी पहिली कला ही संवादाची आहे. संवाद ही अशी कला आहे, जी मानवाला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकते.

- विजयराज बोधनकरअध्यात्माच्या आठ कला आहेत. त्यापैकी पहिली कला ही संवादाची आहे. संवाद ही अशी कला आहे, जी मानवाला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकते. शब्द सुर हा निसर्गाने मानवाला दिलेला मोठा आशीर्वाद आहे. अक्षरज्ञान हे मानवाला मिळालेले एक वरदान आहे. ज्याला अक्षरज्ञान झाले, तो शब्दांवर प्रभुत्व मिळवू शकतो. जो विचार करून बोलतो तो विचारवंत ठरतो. जो बोलून विचारात पडतो तो हळूहळू जगाला आणि स्वत:ला अप्रिय वाटत राहतो. तारतम्य नावाची एक जाणीव असते. ती जाणीवसुद्धा एक प्रकारची आध्यात्मिक शक्तीच आहे. तुमच्या उत्तम बोलण्याची जाणीव समोरच्या व्यक्तीला झाली की, उत्तम समाज आपोआप त्या व्यक्तीशी जोडला जातो. उत्तम बोलण्याची कला ही आत्मसात करावी लागते. त्यासाठी फक्त रसाळ वाणी असून चालत नाही, तर जागतिक ज्ञान आणि वेगळा विचार करण्याची ऊर्जाही असली पाहिजे. मेंदूतून उत्पन्न होणारे विचार धन-मनाच्या एकाग्रतेवर अवलंबून असतात. मन स्थिर असेल तरच मेंदूच्या ऊर्जाक्षेत्रातून नवा विचार प्रकटू शकतो आणि त्याच नव्या विचारांची मांडणी जगासमोर मांडताना उत्तम संवादाची कला त्या बोलणाऱ्या व्यक्तीला यश प्राप्त करून देऊ शकते. अनेकांना साधे बोलणेही न जमण्याचे कारण म्हणजे ते बोलण्याचा सराव करीत नाहीत. कुठलीही गोष्ट पहिली आत्मचिंतनाच्या पायरीवरून प्रवास करती झाली की तिला मेंदूचा भक्कम आधार मिळतो. मेंदूच्या कपाटात एखादी गोष्ट घर करून बसली की, ती डळमळीत होण्याची भीती नसते. बोलण्याचा सराव मेंदूच्या माध्यमातून केला तर चंचल मनही स्थिर होऊ शकते. उत्तम बोलण्याच्या कलेतून प्रगतीचे अनेक मार्ग मोकळे होतात. जागतिक वैचारिक बळ वाढत जाते. माणूस बोलण्याच्या कलेमुळे अधिक प्रगल्भ होत जातो. माणसे जिंकण्यासाठी गोड शब्द पुरेसा असतो. एकदा का केवळ बोलण्यातून जग जिंकता आले की, मग ईश्वरी शक्ती आपल्या सोबत असते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक