शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विकारांचा सहवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 01:48 IST

ज्ञानाची संगत संंस्कार घडवून जागविते व विरक्ती आसक्तीतून सुटका करत असते.

- बा.भो. शास्त्रीआपला मुलगा वा मुलगी हाताच्या बाहेर गेले म्हणून निराश होणारे आईबाप आपण पाहतो. ते हताश होतात. त्यांना दिलासा देणारंं हे सूत्र आहे. जसे आईबाप, जशी शाळा, जसा सहवास तसे संंस्कार त्यांंना मिळतात का? त्याचा ध्वनीचा उच्चार, त्यांंच्या देहबोलीत होणारा बदल लक्षात येतो का? आम्ही मुलांच्या भावभावना समजून घेतो का? हे सगळे प्रश्न आई व बाप यांच्यासाठी आहेत. थोडीशी खराब वस्तू फेकणं शहाणपण नाही. तिला दुरुस्त करायचंं असतंं. टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू तयार केल्या जातात. प्रदर्शनात त्याच बक्षिसं पटकावतात.

स्वामींंनी त्यांच्या चरित्रात अनेक मळलेली माणसंं उजळून टाकली. सहवासाने उजाळा मिळतो, संंस्काराने जीवनाला आकार येतो. संंसारात वावरताना चुका होतच असतात, धूळ उडतेच, डाग पडणार, मळ लागणारच हे कुणालाही चुकवता येत नाही. कर्माचे डाग लागतच असतात, पण ते धुतलेही जातात. चूक होते ही चूक नाही तर क्षमा मागितली जात नाही ही चूक आहे. आधी आपण राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर या सहा विकारांंच्या सहवासात असतो. हे सहाही विकार आपल्याबाहेर नसून आपल्यातच असतात.

हा आतला सहवास आहे. त्यातून ज्याचा आपल्यावर प्रभाव पडतो आपण तसेच होऊन जातो व तशाच लोकांंचा संंग आपल्याला आवडतो. त्यांच्या गुण तसेच अवगुणांचा आपण अजिबात विचार करीत नाही. जणूकाही आपल्या डोळ्यावर झापडेच लागलेली असतात. हा आतून झालेला फार मोठा बिघाड आहे. याचा खुलासा श्रीचक्रधर स्वामींनी अनेक जागी केलेला आहे. उजळणे म्हणजे चमकून जाणे, चकाकणे, ज्याच्या जीवनात आचाराची शुद्धता व विचाराची परिपक्वता आहे, अशांंंचा संंग स्वामींंना अभिप्रेत आहे. ज्ञात आणि विरक्त हे दोन घटक त्यात महत्त्वाचे आहेत. ज्ञानाची संगत संंस्कार घडवून जागविते व विरक्ती आसक्तीतून सुटका करत असते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक